शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 17:51 IST

मुंबईहून जोधपूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या 'एआय ६४५' विमानाला शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी मुंबई विमानतळावर परत आणण्यात आलं.

मुंबईहून जोधपूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या 'एआय ६४५' विमानाला शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी मुंबईविमानतळावर परत आणण्यात आलं. उड्डाण घेतल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली.

प्रवक्त्याने सांगितलं की, विमानाच्या उड्डाणानंतर तांत्रिक समस्या लक्षात आल्या. त्यानंतर वैमानिकांनी नियमांनुसार, उड्डाण थांबवण्याचा निर्णय घेतला आणि विमान मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आलं. विमानात असलेल्या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

अहमदाबादमधील दुर्दैवी घटनायापूर्वी जून महिन्यात अहमदाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या एका विमानाचा मोठा अपघात झाला होता. या अपघातात वैमानिकांसह २४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे केवळ भारतातच नाही, तर जगभरात खळबळ माजली होती.

या भीषण अपघातानंतर विमानात तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणं रद्द होण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मुंबईहून जोधपूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ते मुंबईला परत आल्याची बातमी देखील याच पार्श्वभूमीवर समोर आली आहे.

मुंबईतील वैमानिकाचं कौतुकअलीकडेच, मुंबई विमानतळावरील आणखी एक व्हिडीओ समोर आला, ज्यात वैमानिकाचं खूप कौतुक केलं जात आहे. मुंबईत सध्या मान्सूनचा जोर वाढला आहे. जोरदार पाऊस, वादळी वारे आणि पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

अशा बिघडलेल्या हवामानात एअर इंडियाच्या एका वैमानिकाने आपल्या बुद्धीमत्तेने विमान उतरवताना एक मोठा अपघात टाळला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये, 'मुंबईत मुसळधार पाऊस असतानाही कॅप्टन नीरज सेठी यांनी त्यांच्या प्रसंगावधानामुळे विमान अगदी सहज उतरवलं, त्यांना सलाम!' असं लिहिण्यात आलं होतं. त्यांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाMumbaiमुंबईAirportविमानतळ