शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
3
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
4
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
5
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
6
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
7
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
8
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
9
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
10
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
11
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
12
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
13
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
14
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
15
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
16
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
17
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
18
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
19
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
20
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...

जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 17:51 IST

मुंबईहून जोधपूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या 'एआय ६४५' विमानाला शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी मुंबई विमानतळावर परत आणण्यात आलं.

मुंबईहून जोधपूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या 'एआय ६४५' विमानाला शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी मुंबईविमानतळावर परत आणण्यात आलं. उड्डाण घेतल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली.

प्रवक्त्याने सांगितलं की, विमानाच्या उड्डाणानंतर तांत्रिक समस्या लक्षात आल्या. त्यानंतर वैमानिकांनी नियमांनुसार, उड्डाण थांबवण्याचा निर्णय घेतला आणि विमान मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आलं. विमानात असलेल्या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

अहमदाबादमधील दुर्दैवी घटनायापूर्वी जून महिन्यात अहमदाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या एका विमानाचा मोठा अपघात झाला होता. या अपघातात वैमानिकांसह २४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे केवळ भारतातच नाही, तर जगभरात खळबळ माजली होती.

या भीषण अपघातानंतर विमानात तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणं रद्द होण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मुंबईहून जोधपूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ते मुंबईला परत आल्याची बातमी देखील याच पार्श्वभूमीवर समोर आली आहे.

मुंबईतील वैमानिकाचं कौतुकअलीकडेच, मुंबई विमानतळावरील आणखी एक व्हिडीओ समोर आला, ज्यात वैमानिकाचं खूप कौतुक केलं जात आहे. मुंबईत सध्या मान्सूनचा जोर वाढला आहे. जोरदार पाऊस, वादळी वारे आणि पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

अशा बिघडलेल्या हवामानात एअर इंडियाच्या एका वैमानिकाने आपल्या बुद्धीमत्तेने विमान उतरवताना एक मोठा अपघात टाळला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये, 'मुंबईत मुसळधार पाऊस असतानाही कॅप्टन नीरज सेठी यांनी त्यांच्या प्रसंगावधानामुळे विमान अगदी सहज उतरवलं, त्यांना सलाम!' असं लिहिण्यात आलं होतं. त्यांच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाMumbaiमुंबईAirportविमानतळ