शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

Triple Talaq: मुस्लिम महिलांना रस्त्यावर आणण्याचा घाट; ओवैसींचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 20:32 IST

'सबरीमालावेळी प्रथा परंपरा आठवल्या, मग आता का आठवत नाहीत', असा प्रश्न ओवैसींनी उपस्थित केला

नवी दिल्ली: तिहेरी तलाक कायदा फक्त आणि फक्त मुस्लिम महिलांना रस्त्यावर आणण्यासाठी तयार केला जात असल्याचा आरोप एमआयएमचे प्रमुख आणि खासदार यांनी केला. आज लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झालं. यानंतर ओवैसींनी सरकारवर घणाघाती टीका केली. मुस्लिम पुरुषांना तुरुंगात टाकण्यासाठी, मुस्लिम महिलांना कमजोर करण्यासाठी तिहेरी तलाक कायदा आणण्याचा घाट सरकारनं घातल्याचा दावादेखील त्यांनी केला. या कायद्याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होईल, अशी भीती ओवैसींनी व्यक्त केली. लोकसभेत आज तिहेरी तलाकविरोधी विधेयकावर आज वादळी चर्चा झाली. भाजपा खासदार आणि मंत्र्यांनी या विधेयकाबद्दलची सरकारची बाजू मांडली. तर काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह अनेक पक्षांनी हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी केली. या विधेयकावर एमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार यांनी आपलं मत स्पष्ट करताना आस्था आणि श्रद्धेचा मुद्दा उपस्थित केला. सबरीमाला प्रकरण चर्चेत होतं. सर्वोच्च न्यायालयानं त्या प्रकरणात निकाल सुनावला. त्यावेळी आस्थेचा, प्रथा-परंपरेचा मुद्दा चर्चेत आला. मग आता तिहेरी तलाक आमच्या आस्थेचा, परंपरेचा विषय नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.एक पुरुष कितीही महिलांशी संबंध ठेवू शकतो. त्यात कोणताही गुन्हा नाही. पण तिहेरी तलाक गुन्हा ठरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मी या विधेयकाला विरोध करतो, असं ओवैसी म्हणाले. सबरीमालामध्ये सर्व वयाच्या महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय न्यायालयानं दिला. त्यावेळी अनेकांनी आस्था, प्रथा, परंपरांचा मुद्दा उपस्थित करत महिलांना मंदिरात प्रवेश करू दिला नाही. तुमची ती आस्था असते. मग आमची आस्था नसते का? ती का मान्य केली जात नाही?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. व्यभिचाराबद्दलचा कायदा रद्द करण्यात आला. त्यामुळे व्यभिचार गुन्हा नाही. मात्र तिहेरी तलाकला गुन्ह्यांचं स्वरुप देण्याचा प्रयत्न होत आहे. या कायद्याचा प्रचंड प्रमाणात गैरवापर होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनlok sabhaलोकसभा