शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"खोटं, खोटं आणि खोटं, महालाबाहेर येऊन पाहा देश..."; पंतप्रधान मोदींवर ओवेसींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 13:24 IST

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर आता AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. (Asaduddin Owaisi)

नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. अशात लसीकरणाला (Vaccination)  महामारीवरील परिणामकारक शस्त्र मानले जात आहे. देशात लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. मात्र, लसीकरणाच्या मंदावलेल्या वेगावरून विरोधक केंद्रातील मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर आता AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. एवढेच नाही, तर मोदी सरकार खोटारडेपणावर बनले आहे, असेही ओवैसी म्हणाले.

Coronavirus: साथीला रोखण्यासाठी मोदी सरकारकडे रणनीतीच नाही, राहुल गांधी यांचा घणाघात

एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान कार्यालयाला (PMO) टॅग करत आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, "खोटं, खोटं आणि खोटं. मोदी सरकार खोटारडेपणावर बनले आहे. पंतप्रधान ख्वाब-ए-गफलतीतून बाहेर पडा. आपल्या महालातून बाहेर येऊन पाहा, देशातील गरीबांची काय परिस्थिती आहे."

ओवेसींचा सरकारवर हल्लाबोल - भारतात कोरोनाविरोधात लसीकरण अभियान सुरू आहे. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत करोरोना लसीचे 20,89,02,445 (20 कोटींहून अधिक) लशी दिल्या गेल्या आहेत. तर गेल्या 24 तासांत 30,62,747 डोसे देण्यात आले आहेत.

"...पण मोदी सरकारला काळजीच नाही!" राहुल गांधींनी सांगितली कोरोनाला कंट्रोलमध्ये आणायची 'की'

लशीसंदर्भात राहुल गांधींचाही मोदींवर निशाणा -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी पंतप्रधान मोदींना जबाबदार धरत, राहुल गांधी म्हणाले. कोरोना साथीचे निर्मूलन करायचे असेल तर लसीकरण हाच एकमात्र उपाय आहे. लॉकडाऊन, मास्क घालणे, शारीरिक अंतर राखणे यामुळे कोरोना साथ संपणार नाही. तिचे निर्मूलन करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविला पाहिजे. कोरोना लस देण्यात आपण जितका उशीर करू तितके या विषाणूची नवनवीन उत्परिवर्तने व प्रकार अस्तित्वात येऊन माणसांवर हल्ला करतील. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढण्याचीही भीती आहे. कोरोना विषाणू आपले रूप सतत पालटत असतो.  राहुल गांधी यांनी सांगितले की, कोरोना साथ भीषण रूप धारण करू शकते, असा इशारा मी पहिल्यापासून देत होतो, पण त्याकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केले. देशातील लोकसंख्येपैकी फक्त तीन टक्के लोकांनाच कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. 

तसेच, जगातील अनेक देशांत कोरोना प्रतिबंधक लशी तयार होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लशी भारतात शक्य तितक्या लवकर आणाव्यात, असेही राहुल म्हणाले. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या