शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

“प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नका”; भागवतांच्या विधानाला ओवेसींचे १७ ट्विटमधून उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 14:46 IST

संघाचे गुंड आता ना पंतप्रधान मोदींचे ऐकत ना मोहन भागवतांचे, अशी घणाघाती टीका असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.

नवी दिल्ली: ज्ञानवापी मशिदीच्या वादासंदर्भात मोहन भागवत यांनी दोन्ही समाजाचे कान टोचले. ज्ञानवापी प्रकरण श्रद्धेचा विषय असून न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे. प्रत्येक मशिदीत ‘शिवलिंग’ शोधण्याची, तसेच दरदिवशी नवा वाद निर्माण करण्याची गरज नाही, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले होते. याला एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी उत्तर दिले आहे. एकामागून एक १७ ट्विट करत १७ मुद्द्यांवर ओवेसी यांनी भाष्य केले आहे. 

मोहन भागवत यांचे हे वक्तव्य प्रक्षोभक आणि दुर्लक्षित केले जाऊ नये. एखादी गोष्ट लोकप्रिय नसताना त्यापासून स्वत:ला दूर सारायचं आणि ती लोकप्रिय झाल्यानंतर स्वीकारायची हा संघाचा जुना डावपेच आहे. बाबरीच्या आंदोलनानदरम्यानही संघाने आधी आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करु असे म्हटले होते, अशी आठवण ओवेसींनी करुन दिली. मात्र कोणत्याही संवैधानिक पदावर नसणाऱ्या मोहन भागवत आणि जे. पी. नड्डांसारख्या व्यक्तींऐवजी पंतप्रधान मोदींनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत १९९१ च्या धर्मस्थळांसंदर्भातील कायद्याच्या आधारे स्पष्ट संदेश द्यावा, अशी मागणी ओवेसी यांनी केली आहे.

भारतामध्ये इस्लाम धर्म हा व्यापारी आणि बुद्धीजीवींमुळे आला

भारतामध्ये इस्लाम धर्म हा व्यापारी आणि बुद्धीजीवींमुळे आला. हे सर्वजण इस्लाम धर्म मुस्लीमांनी या भूमीवर केलेल्या आक्रमणांच्या फार पूर्वीच घेऊन आले होते. आजच्या मुस्लिमांचे पूर्वज कुठून आलेत हे सध्या महत्वाचं नाही. जरी त्यांचे पूर्वज हिंदू असले तरी भारतीय संविधानानुसार हे भारतीयच आहेत. भागवत यांच्या पूर्वजांनी बळजबरीमुळे बौद्ध धर्मामधून धर्मांतर केले, असे उद्या कोणी म्हणून लागले तर काय करणार, असा सवाल ओवेसी यांनी केला आहे. 

अयोध्येचा मुद्दा संघाच्या अजेंड्यावर नव्हता

विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेआधी अयोध्येचा मुद्दा संघाच्या अजेंड्यावर नव्हता. १९८९ च्या पालनपूरमधील ठरवानंतरच अयोध्या हा संघाच्या अजेंड्याच्या भाग झाला. संघाने राजकीय विषयावर एकाचवेळी दोन वेगवेगळ्या भूमिका घेण्यात निपुणता मिळवली आहे. काशी, मथुरा, कुतूबमिनार संदर्भातील विषयांवर बोलणाऱ्या सर्व विदूषकांचा थेट संबंध संघाशी आहे, असा दावा ओवेसी यांनी केला. तसेच अन्य एक स्पष्टीकरण म्हणजे संघाचे गुंड आता ना मोदींचे ऐकत ना भागवतांचे. दोघांनाही झुंडबळींचा निषेध केला होता. मात्र त्यामुळे हे प्रकार थांबले का? उलट, त्यांनी रामनवमीच्या यात्रांदरम्यान काय केले आपण पाहिले. याचा अर्थ या गोष्टी पुढेही घडत राहणार. हे फक्त ढोंग आहे, असा आरोप ओवेसी यांनी केला.

दरम्यान, तेलंगणमधील भाजपचे बंडी संजय कुमार यांनी दिलेल्या इशाऱ्यासंदर्भात ओवेसी म्हणाले की, काहींनी आम्हाला बाबरी द्या इतर कोणत्याही मशिदींनी हात लावणार नाही, असे म्हटले होते. इतरांनी केवळ अयोध्या, काशी आणि मथुरा आणि अनेकांनी मध्यकालीन सर्वच मशिदींचा उल्लेख केला. तेलंगण भाजपाच्या अध्यक्षांनी राज्यातील प्रत्येक मशिदीमध्ये खोदकाम करुन पाहिले पाहिजे असे म्हटले. त्यांचे शब्द तर कागदावर लिहिण्याच्या लायकही नाहीत, असे ओवेसी म्हणाले.  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीMohan Bhagwatमोहन भागवत