शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

सात दिवसांपूर्वी पत्नीचा मृत्यू, अस्थी विसर्जिनासाठी भारतात आले; विमान अपघातात मृत्यू, चिमुरड्या झाल्या पोरक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:58 IST

अहमदाबाद येथील विमान अपघातात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून त्यामध्ये पटोलिया यांचाही समावेश आहे

Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोईंग ७८७ विमान कोसळून मोठा अपघात झाला. या दुर्घटनेनंतर जगभरात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत विमानातील प्रवाशांसह २५ निवासी डॉक्टरांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. अहमदाबादमध्ये झालेल्या या भीषण विमान अपघाताच्या घटनेत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. तर या अपघाताने काही कुटुंबांना असे आघात दिले आहेत जे कधीही भरुन निघणार नाहीत. यामध्ये पटोलिया यांचाही समावेश आहे. अमरेलीतील वाडिया येथील रहिवासी अर्जुनभाई मनुभाई पटोलिया यांचे या अपघातात निधन झाले. पटोलिया त्यांच्या पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतात आले होते.

अर्जुन पटोलिया यांच्या पत्नी भारतीबेन यांचे सात दिवसांपूर्वी लंडनमध्ये निधन झालं होतं. त्यांच्या पत्नीची इच्छा होती की त्यांच्या अस्थी फुलांच्या कलशासह अमरेली जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावातील तलाव आणि नदीत विसर्जित केल्या जाव्यात. अर्जुन त्यांच्या पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतात आले होते. त्यांनी अमरेलीतील त्यांच्या गावी त्यांच्या नातेवाईकांसह अंत्यसंस्कार विधी पूर्ण केले. मात्र ते लंडनला परत जाऊ शकले नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे अर्जुन यांना दोन मुली आहेत. ते त्यांना तिथेच सोडून भारतात आले होते. मात्र आता त्यांच्या डोक्यावरील आई वडीलांचे छत्र हरवलं आहे.

लंडन जाणाऱ्या एअर इंडियाच्या एआय १७१ विमानाच्या अपघातात अर्जुन यांचा मृत्यू झाला. विमान अपघाताची बातमी मिळताच अर्जुन यांच्या नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांच्या घरात शोककळा पसरली. अर्जुन आपल्या मुलांना लंडनमध्ये सोडून वाडिया येथे आले. दोन्ही मुलींनी त्यांच्या आई आणि वडिलांना गमावले. अर्जुन यांच्या वडिलांचे आधीच निधन झाले आहे. त्यांची आई सुरतमध्ये राहत होती.

दरम्यान, अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टी क्रमांक २३ वरून उड्डाण घेतल्यानंतर एअर इंडियाचे विमान लगेचच कोसलळे. विमान विमानतळाजवळील बीजे मेडिकल कॉलेजच्या मेसच्या इमारतीशी आदळले आणि पुढच्या काही सेकंदातच स्फोट झाला. ही धडक इतकी जोरदार होती की इमारतीच्या मध्यभागी बांधलेली पाण्याची टाकी दुसऱ्या बाजूला पोहोचली. यानंतर, विमानाचा मागील भाग या इमारतीत अडकला, तर उर्वरित भाग पुढे पडला. त्यानंतर झालेल्या स्फोटात विमानाचे तुकडे झाले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात उभ्या असलेल्या वाहनांनाही आग लागली. या अपघातात २५ निवासी डॉक्टरांचाही मृत्यू झाला.  

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडिया