शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सात दिवसांपूर्वी पत्नीचा मृत्यू, अस्थी विसर्जिनासाठी भारतात आले; विमान अपघातात मृत्यू, चिमुरड्या झाल्या पोरक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:58 IST

अहमदाबाद येथील विमान अपघातात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून त्यामध्ये पटोलिया यांचाही समावेश आहे

Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोईंग ७८७ विमान कोसळून मोठा अपघात झाला. या दुर्घटनेनंतर जगभरात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत विमानातील प्रवाशांसह २५ निवासी डॉक्टरांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. अहमदाबादमध्ये झालेल्या या भीषण विमान अपघाताच्या घटनेत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. तर या अपघाताने काही कुटुंबांना असे आघात दिले आहेत जे कधीही भरुन निघणार नाहीत. यामध्ये पटोलिया यांचाही समावेश आहे. अमरेलीतील वाडिया येथील रहिवासी अर्जुनभाई मनुभाई पटोलिया यांचे या अपघातात निधन झाले. पटोलिया त्यांच्या पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतात आले होते.

अर्जुन पटोलिया यांच्या पत्नी भारतीबेन यांचे सात दिवसांपूर्वी लंडनमध्ये निधन झालं होतं. त्यांच्या पत्नीची इच्छा होती की त्यांच्या अस्थी फुलांच्या कलशासह अमरेली जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावातील तलाव आणि नदीत विसर्जित केल्या जाव्यात. अर्जुन त्यांच्या पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतात आले होते. त्यांनी अमरेलीतील त्यांच्या गावी त्यांच्या नातेवाईकांसह अंत्यसंस्कार विधी पूर्ण केले. मात्र ते लंडनला परत जाऊ शकले नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे अर्जुन यांना दोन मुली आहेत. ते त्यांना तिथेच सोडून भारतात आले होते. मात्र आता त्यांच्या डोक्यावरील आई वडीलांचे छत्र हरवलं आहे.

लंडन जाणाऱ्या एअर इंडियाच्या एआय १७१ विमानाच्या अपघातात अर्जुन यांचा मृत्यू झाला. विमान अपघाताची बातमी मिळताच अर्जुन यांच्या नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांच्या घरात शोककळा पसरली. अर्जुन आपल्या मुलांना लंडनमध्ये सोडून वाडिया येथे आले. दोन्ही मुलींनी त्यांच्या आई आणि वडिलांना गमावले. अर्जुन यांच्या वडिलांचे आधीच निधन झाले आहे. त्यांची आई सुरतमध्ये राहत होती.

दरम्यान, अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टी क्रमांक २३ वरून उड्डाण घेतल्यानंतर एअर इंडियाचे विमान लगेचच कोसलळे. विमान विमानतळाजवळील बीजे मेडिकल कॉलेजच्या मेसच्या इमारतीशी आदळले आणि पुढच्या काही सेकंदातच स्फोट झाला. ही धडक इतकी जोरदार होती की इमारतीच्या मध्यभागी बांधलेली पाण्याची टाकी दुसऱ्या बाजूला पोहोचली. यानंतर, विमानाचा मागील भाग या इमारतीत अडकला, तर उर्वरित भाग पुढे पडला. त्यानंतर झालेल्या स्फोटात विमानाचे तुकडे झाले. वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात उभ्या असलेल्या वाहनांनाही आग लागली. या अपघातात २५ निवासी डॉक्टरांचाही मृत्यू झाला.  

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडिया