शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

धक्कादायक! २६ वर्षीय शास्त्रज्ञ पुरात गेली वाहून; स्वप्न राहिलं अपूर्ण, भावुक करणारी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 14:14 IST

अश्विनीने समाजाच्या जुन्या विचारसरणीशी लढा देत असं काहीतरी साध्य केलं, ज्याचा क्वचितच कोणीतरी विचार केला असेल. जेव्हा ती तिच्या गावची पहिली शास्त्रज्ञ बनली, तेव्हा सर्वांनाच खूप आनंद झाला होता.

तिची स्वप्नं मोठी होती, तिची जिद्द मोठी होती... तिला असं काही करायचं होतं ज्यामुळे तिलाच नाही तर संपूर्ण गावाचं नाव मोठं होईल... तिने अनेक संकटांना धैर्याने तोंड दिलं आणि तिच्या जिद्दीच्या जोरावर अगदी लहान वयातच तिने यश मिळवत मोठी झेप घेतली, पण कदाचित नियतीला हे मान्य नाही. वयाच्या २६ व्या वर्षी तिने हे जग सोडलं. तिच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण गावाला धक्का बसला आहे. ही तरुणी म्हणजे पुरस्कार विजेती कृषी शास्त्रज्ञ डॉ. नुनावथ अश्विनी.

अश्विनीने समाजाच्या जुन्या विचारसरणीशी लढा देत असं काहीतरी साध्य केलं, ज्याचा क्वचितच कोणीतरी विचार केला असेल. जेव्हा ती तिच्या गावची पहिली शास्त्रज्ञ बनली, तेव्हा सर्वांनाच खूप आनंद झाला होता. रविवारी सकाळी तेलंगणातील महबूबाबाद जिल्ह्यात आलेल्या पुरात अश्विनी आणि तिचे वडील एन. मोतीलाल हे वाहून गेले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. घटना घडली त्यावेळी ते आपल्या वडिलांसोबत कारमधून हैदराबादला जात होते.

अश्विनीचा मोठा चुलत भाऊ एन. हरीने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, आम्ही आमच्या कुटुंबातील सर्वात प्रेमळ सदस्य गमावली आहे. ती महत्वाकांक्षी आणि हुशार होती. तिला तिची स्वप्नं पूर्ण करण्याची इच्छा होती. तिला तिचं करियर करायचं होतं. संपूर्ण घराला तिचा अभिमान वाटत होता. 

जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंगमध्ये पीएचडी केलेली अश्विनी, ICAR च्या क्रॉप रेझिस्टन्स सिस्टम्स रिसर्च स्कूलमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करत होती. एप्रिलमध्ये रायपूर येथे झालेल्या कृषी परिषदेत तिला यंग सायंटिस्ट पुरस्कार मिळाला. कुटुंबीयांनी सांगितलं की, अश्विनी गेल्या आठवड्यातच तिचा भाऊ अशोक कुमारच्या साखरपुड्यासाठी घरी आली होती. तिला रविवारी रायपूरला परतायचं होतं आणि सोमवारी ड्युटीवर जायचं होतं. 

रविवारी पहाटे तिचे वडील मोतीलाल यांनी मुसळधार पावसात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिला सोडण्याचा निर्णय घेतला. दोघेही महबूबाबाद जिल्ह्यातील मरीपेडा येथील पुलावर जात असताना त्यांची कार वाहून गेली. तो पूल आधीच पाण्याखाली गेला होता, त्यांची कार जोरदार प्रवाहात वाहून गेली आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला. 

टॅग्स :foodअन्नRainपाऊस