शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! २६ वर्षीय शास्त्रज्ञ पुरात गेली वाहून; स्वप्न राहिलं अपूर्ण, भावुक करणारी गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 14:14 IST

अश्विनीने समाजाच्या जुन्या विचारसरणीशी लढा देत असं काहीतरी साध्य केलं, ज्याचा क्वचितच कोणीतरी विचार केला असेल. जेव्हा ती तिच्या गावची पहिली शास्त्रज्ञ बनली, तेव्हा सर्वांनाच खूप आनंद झाला होता.

तिची स्वप्नं मोठी होती, तिची जिद्द मोठी होती... तिला असं काही करायचं होतं ज्यामुळे तिलाच नाही तर संपूर्ण गावाचं नाव मोठं होईल... तिने अनेक संकटांना धैर्याने तोंड दिलं आणि तिच्या जिद्दीच्या जोरावर अगदी लहान वयातच तिने यश मिळवत मोठी झेप घेतली, पण कदाचित नियतीला हे मान्य नाही. वयाच्या २६ व्या वर्षी तिने हे जग सोडलं. तिच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण गावाला धक्का बसला आहे. ही तरुणी म्हणजे पुरस्कार विजेती कृषी शास्त्रज्ञ डॉ. नुनावथ अश्विनी.

अश्विनीने समाजाच्या जुन्या विचारसरणीशी लढा देत असं काहीतरी साध्य केलं, ज्याचा क्वचितच कोणीतरी विचार केला असेल. जेव्हा ती तिच्या गावची पहिली शास्त्रज्ञ बनली, तेव्हा सर्वांनाच खूप आनंद झाला होता. रविवारी सकाळी तेलंगणातील महबूबाबाद जिल्ह्यात आलेल्या पुरात अश्विनी आणि तिचे वडील एन. मोतीलाल हे वाहून गेले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. घटना घडली त्यावेळी ते आपल्या वडिलांसोबत कारमधून हैदराबादला जात होते.

अश्विनीचा मोठा चुलत भाऊ एन. हरीने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, आम्ही आमच्या कुटुंबातील सर्वात प्रेमळ सदस्य गमावली आहे. ती महत्वाकांक्षी आणि हुशार होती. तिला तिची स्वप्नं पूर्ण करण्याची इच्छा होती. तिला तिचं करियर करायचं होतं. संपूर्ण घराला तिचा अभिमान वाटत होता. 

जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंगमध्ये पीएचडी केलेली अश्विनी, ICAR च्या क्रॉप रेझिस्टन्स सिस्टम्स रिसर्च स्कूलमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करत होती. एप्रिलमध्ये रायपूर येथे झालेल्या कृषी परिषदेत तिला यंग सायंटिस्ट पुरस्कार मिळाला. कुटुंबीयांनी सांगितलं की, अश्विनी गेल्या आठवड्यातच तिचा भाऊ अशोक कुमारच्या साखरपुड्यासाठी घरी आली होती. तिला रविवारी रायपूरला परतायचं होतं आणि सोमवारी ड्युटीवर जायचं होतं. 

रविवारी पहाटे तिचे वडील मोतीलाल यांनी मुसळधार पावसात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिला सोडण्याचा निर्णय घेतला. दोघेही महबूबाबाद जिल्ह्यातील मरीपेडा येथील पुलावर जात असताना त्यांची कार वाहून गेली. तो पूल आधीच पाण्याखाली गेला होता, त्यांची कार जोरदार प्रवाहात वाहून गेली आणि दोघांचाही बुडून मृत्यू झाला. 

टॅग्स :foodअन्नRainपाऊस