शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"स्वतःचं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं पाहायचं वाकून"; कृषी मंत्र्यांचा टिकैतना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 14:20 IST

farmers protest - केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर टीका केली आहे.

ठळक मुद्देकृषी मंत्र्यांची राकेश टिकैत यांच्यावर टीकाशेतकऱ्यांशी चर्चेसाठी दारं खुली असल्याचा पुनरुच्चारकेंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांचीही टीका

मुरैना : वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला (farmers protest) १०० दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. यावरून आता राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते राकेश टिकैत (rakesh tikait) यांनी महापंचायतीला संबोधित केले. यावरून केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (narendra singh tomar) यांनी टोला लगावला आहे. (agriculture minister narendra singh tomar criticise rakesh tikait over farm laws)

मध्य प्रदेशातील मुरैना येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर टीका केली. किसान युनियनचे नेते शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांचे मुद्दे यावर तोडगा काढू शकत नाही आणि जगाचे प्रश्न सोडवण्यावर पुढाकार घेत आहेत, असा टोला तोमर यांनी लगावला.

काँग्रेस सर्वांत भ्रष्ट पक्ष; योजनांचे लाभ घेण्यासाठी भाजपला मत द्या: स्मृति इराणी

चर्चेसाठी अजूनही तयार

केंद्र सरकारकडून कृषी कायद्यावर चर्चा करण्यासाठी अजूनही दारे खुली आहेत. सरकार आजही चर्चा करण्यासाठी तयार आहे. चर्चेतून निश्चित मार्ग निघू शकेल. यात सर्वांचा फायदा आहे. बाकी दगडावर डोके आपटून घेण्यात काही अर्थ नाही, असे तोमर यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचा केवळ वापर केला जातोय

शेतकी आंदोलनाच्या मुद्यावर केंद्रीय मुख्तार अब्बास नकवी यांनीही शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली जात आहे. शेतकरी आंदोलनासंदर्भात सरकार अद्यापही चर्चेला तयरा आहे, असे नकवी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, भाजप हा फसवणूक करणारा पक्ष आहे. आम्ही भाजपचा विरोध करणाऱ्यांसोबत आणि शेतकरी, गरिबांसोबत उभे राहणाऱ्यांसोबत आहोत, असे सांगत पश्चिम बंगालमध्ये शेतकरी महापंचायत आयोजित करण्याचा अर्थ कोणत्याही पक्षाला समर्थन देणार नसल्याचे राकेश टिकैत यांनी स्पष्ट केले आहे. कृषी कायदे मागे घेण्याच्या आणि एमएसपीवर कायदा करण्याच्या आपल्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. आतापर्यंत शेतकरी नेते आणि सरकारमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या परंतु यातून कोणताही तोडगा निघालेला नाही.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनNarendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमरrakesh tikaitराकेश टिकैतPoliticsराजकारणCentral Governmentकेंद्र सरकार