शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

कृषी विधेयके ही २१ व्या शतकाची गरज; नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 06:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : संसदेने कृषी क्षेत्रात सुधारणांसाठी संमत केलेली विधेयके ही २१ व्या शतकाची गरज आहे, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : संसदेने कृषी क्षेत्रात सुधारणांसाठी संमत केलेली विधेयके ही २१ व्या शतकाची गरज आहे, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. मोदी यांनी शेतकऱ्यांना पुन्हा खात्री दिली की, कृषी माल हा किमान आधारभूत भावाने सरकार खरेदी करणे सुरूच ठेवेल.मोदी बिहारमधील नऊ महामार्गांच्या व्हर्च्युअल पायाभरणी समारंभात बोलत होते. या विधेयकांवर विरोधी पक्षांनी ती ‘शेतकरीविरोधी’ असल्याची जोरदार टीका कायम ठेवली व पंजाब व हरयाणात त्याविरोधात आंदोलनही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी विधेयकांसारख्या उपायांचे जोरदार समर्थन केले.ते म्हणाले, यामुळे आता शेतकरी त्यांचा कृषी माल/उत्पादन त्यांना हव्या त्या ठिकाणी व हव्या त्या किमतीत विकायला स्वतंत्र आहेत.विरोधी पक्षांवर टीकेचा हल्ला करताना मोदी म्हणाले, शेतकऱ्यांचे शोषण काही लोकांच्या कंपूने प्रदीर्घ काळ केले व हाच कंपू शेतमालाच्या विक्रीला शिस्त लावण्याच्या नियमांत अडथळा ठरला. ही परिस्थिती बदलणे आवश्यक होते व ती सरकारने बदलली आहे.शेतकºयांची दिशाभूल केली गेलीकृषिक्षेत्रातील या ऐतिहासिक बदलांनंतर काही लोक त्यावरील नियंत्रण गमवताहेत. म्हणून हे लोक आता शेतकºयांची किमान आधारभूत किमतीवरून दिशाभूल करीत आहेत. हेच लोक किमान आधारभूत किमतीवरील स्वामीनाथन समितीच्या शिफारशींना अनेक वर्षे अडथळे बनले होते, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसला टोला लगावला.या विधेयकांचे वर्णन मोदी यांनी ‘खूपच ऐतिहासिक’ अशा शब्दांत केले. ते म्हणाले, जर कोणी म्हणत असेल की सरकारचे नियंत्रण असलेली कृषी माल बाजारपेठ ही या सुधारणांनंतर संपून जाईल ते धादांत खोटे आहे. गेल्या जून महिन्यात कृषी अध्यादेश सरकारने का आणले, हे सांगताना मोदी म्हणाले, अनेक राज्यांत शेतकºयांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळतो आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीlok sabhaलोकसभा