शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

कृषी विधेयके ही २१ व्या शतकाची गरज; नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 06:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : संसदेने कृषी क्षेत्रात सुधारणांसाठी संमत केलेली विधेयके ही २१ व्या शतकाची गरज आहे, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : संसदेने कृषी क्षेत्रात सुधारणांसाठी संमत केलेली विधेयके ही २१ व्या शतकाची गरज आहे, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. मोदी यांनी शेतकऱ्यांना पुन्हा खात्री दिली की, कृषी माल हा किमान आधारभूत भावाने सरकार खरेदी करणे सुरूच ठेवेल.मोदी बिहारमधील नऊ महामार्गांच्या व्हर्च्युअल पायाभरणी समारंभात बोलत होते. या विधेयकांवर विरोधी पक्षांनी ती ‘शेतकरीविरोधी’ असल्याची जोरदार टीका कायम ठेवली व पंजाब व हरयाणात त्याविरोधात आंदोलनही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी विधेयकांसारख्या उपायांचे जोरदार समर्थन केले.ते म्हणाले, यामुळे आता शेतकरी त्यांचा कृषी माल/उत्पादन त्यांना हव्या त्या ठिकाणी व हव्या त्या किमतीत विकायला स्वतंत्र आहेत.विरोधी पक्षांवर टीकेचा हल्ला करताना मोदी म्हणाले, शेतकऱ्यांचे शोषण काही लोकांच्या कंपूने प्रदीर्घ काळ केले व हाच कंपू शेतमालाच्या विक्रीला शिस्त लावण्याच्या नियमांत अडथळा ठरला. ही परिस्थिती बदलणे आवश्यक होते व ती सरकारने बदलली आहे.शेतकºयांची दिशाभूल केली गेलीकृषिक्षेत्रातील या ऐतिहासिक बदलांनंतर काही लोक त्यावरील नियंत्रण गमवताहेत. म्हणून हे लोक आता शेतकºयांची किमान आधारभूत किमतीवरून दिशाभूल करीत आहेत. हेच लोक किमान आधारभूत किमतीवरील स्वामीनाथन समितीच्या शिफारशींना अनेक वर्षे अडथळे बनले होते, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसला टोला लगावला.या विधेयकांचे वर्णन मोदी यांनी ‘खूपच ऐतिहासिक’ अशा शब्दांत केले. ते म्हणाले, जर कोणी म्हणत असेल की सरकारचे नियंत्रण असलेली कृषी माल बाजारपेठ ही या सुधारणांनंतर संपून जाईल ते धादांत खोटे आहे. गेल्या जून महिन्यात कृषी अध्यादेश सरकारने का आणले, हे सांगताना मोदी म्हणाले, अनेक राज्यांत शेतकºयांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळतो आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीlok sabhaलोकसभा