शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

अग्निवीरांना आरक्षणासह वयोमर्यादा आणि शारीरिक चाचणीत सूट; केंद्र सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 15:32 IST

केंद्र सरकारने अग्निवीर योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Agniveer Reservation in Assam Rifles : केंद्र सरकारने आणलेल्या अग्निवीर योजनेवरुन देशात मोठा गदारोळ सुरू आहे. विरोधक सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत. अशातच, सरकारने माजी अग्निवीरांसाठी केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये आरक्षणाची घोषणा केली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज (24 जुलै) राज्यसभेत एका लेखी उत्तरात सांगितले की, 'केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) आणि आसाम रायफल्समध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)/रायफलमन पदाच्या भरतीमध्ये माजी अग्निवीरांसाठी 10% जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, अग्निवीर जवानांना वयोमर्यादा आणि शारीरिक चाचणीतूनही सूट देण्यात येत आहे.

अग्निवीर योजनेअंतर्गत भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात सैनिकांची भरती केली जाते. सशस्त्र दलातील नियुक्तीची ही एक नवीन श्रेणी आहे. याअंतर्गत 75 टक्के अग्निवीर चार वर्षांच्या सेवेनंतर कोणत्याही पेन्शन लाभाशिवाय निवृत्त होतात, तर उर्वरित 25 टक्के अग्निवीर नियमित सैनिक म्हणून दलात सामील होतात. या योजनेवरुन विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. त्यामुळेच आता सरकारने उर्वरित 75 टक्के अग्निवीरांच्या रोजगाराची व्यवस्था केली आहे.

CAPF आणि आसाम रायफल्समध्ये किती पदे रिक्त आहेत?गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी CAPF आणि आसाम रायफल्समधील रिक्त पदांचीही माहिती दिली. ते म्हणाले, "सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये 1 जुलै 2024 पर्यंत रिक्त पदांची संख्या 84,106 आहे. एप्रिल 2023 ते फेब्रुवारी 2024, या कालावधीत 67,345 उमेदवारांची भरती करण्यात आली आहे. याशिवाय 64,091 रिक्त पदे अधिसूचित करण्यात आली आहेत. ही पदे भरतीच्या विविध टप्प्यात आहेत." 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारAgneepath Schemeअग्निपथ योजनाindian air forceभारतीय हवाई दलIndian Armyभारतीय जवानindian navyभारतीय नौदल