शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पंजाबमधील अग्निवीर जम्मू-काश्मीरमध्ये शहीद; दहशतवाद्यांशी चकमकीत लागली गोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:24 IST

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २४ वर्षीय अग्निवीर जवान शहीद झाला आहे

Agniveer Lovepreet Singh :जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पंजाबमधील मानसा येथील एक अग्निवीर जवान शहीद झाला. कुपवाडा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मानसा गावातील अकालिया येथील २४ वर्षीय अग्निवीर जवान लवप्रीत सिंग शहीद झाला आहे. आज दुपारपर्यंत त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पोहोचले. तो दोन भावांमध्ये सर्वात लहान होता आणि त्याचे अजून लग्नही झालेले नव्हते. लवप्रीतच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून त्याच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. दोन दिवसांपूर्वी आईशी फोनवर बोलणं झालं होतं. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत आपला मुलगा शहीद झाल्याची बातमी ऐकून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लवप्रीत दोन वर्षांपूर्वी अग्निवीर योजनेंतर्गत भारतीय सैन्यात दाखल झाला होती. लवप्रीत मीडियम रेजिमेंट युनिटमध्ये तैनात होता. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी लवप्रीतने त्याच्या पालकांशी बोलून त्यांना आपल्या कामाबद्दल सांगितले होते. लवप्रीतची कौटुंबिक पार्श्वभूमीही लष्कराशी संबंधित आहे. तरुण मुलाच्या निधनाने सिंग कुटुंबात मात्र शोककळा पसरली आहे.

लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी त्याला आधीच सुटी देण्यात आली होती, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तो काही दिवसांनी घरी येणार होता. कुपवाडा येथे बुधवारी दुपारी ३ वाजता दहशतवाद्यांशी चकमक झाली. यावेळी लवप्रीत सिंग जखमी झाला. त्यानंतर लष्कराच्या जवानांनी त्याला रुग्णालयात नेले, मात्र तो शहीद झाला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी लवप्रीत सिंगला श्रद्धांजली वाहताना मी त्यांच्या कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो, असं म्हटलं आहे. "जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात मानसा गावातील अकालिया येथील २४ वर्षीय अग्निवीर जवान लवप्रीत सिंग शहीद झाला आहे. त्याच्या कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. आपल्या देशासाठी शूर सैनिकाच्या धैर्याला आणि धैर्याला मनापासून सलाम. या संकटाच्या काळात पंजाब सरकार कुटुंबासोबत आहे आणि आश्वासन दिल्याप्रमाणे शक्य ती सर्व मदत केली जाईल. आमच्यासाठी, आमचे सैनिक हे आमचे सन्मान आहेत, जरी ते अग्निवीर योद्धे असले तरीही," असं मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPunjabपंजाबIndian Armyभारतीय जवान