शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

अग्निवीर भाजप कार्यकर्ते, त्यांना नोकऱ्या का द्यायच्या? ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 11:10 IST

सेना दलांमध्ये अग्निवीरांची चार वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांना राज्यांनी नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात असे पत्र केंद्राने राज्यांना पाठविले होते.

कोलकाता : अग्निवीर हे भाजप कार्यकर्ते असल्याचा खळबळजनक उल्लेख पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. या भाजप कार्यकर्त्यांना राज्यांनी नोकऱ्या का द्यायच्या असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला. 

सेना दलांमध्ये अग्निवीरांची चार वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांना राज्यांनी नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात असे पत्र केंद्राने राज्यांना पाठविले होते. त्या अनुषंगाने ममता बॅनर्जी यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या की भाजप कार्यकर्त्यांना आम्ही नोकऱ्या का द्यायच्या ? त्यापेक्षा आमच्या राज्यातील युवकांना नोकऱ्यांमध्ये राज्य सरकार प्राधान्य देईल. 

त्यांनी म्हटले आहे की, सैन्यदलामध्ये केंद्र सरकार अग्निवीरांना फक्त चार वर्षे सेवा बजावण्याची संधी देणार आहे. त्यानंतर या अग्निवीरांना नोकऱ्या देण्याची जबाबदारी केंद्र सरकार राज्यांवर ढकलणार हे योग्य नाही. नोकरीची गरज असलेल्या युवकांची पश्चिम बंगालमध्ये कमतरता नाही. आम्ही या युवकांचा  नोकऱ्यांसाठी प्राधान्याने विचार करू.

निवडणुकांपर्यंतच अग्निपथ योजना २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपर्यंतच अग्निपथ योजना केंद्र सरकारकडून राबविली जाईल असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला. अग्निपथ योजना विरोधात देशभरात निदर्शने झाली होती. काही ठिकाणी या निदर्शनांना हिंसक वळण लागले होते. अग्निपथ योजनेबाबत विरोधकांनीही चिंता व्यक्त केली होती. मात्र अग्निवीरांनी चार वर्षे सेनादलात सेवा बजावल्यानंतर त्यांना नोकऱ्या देण्याची तयारी भाजपची सत्ता असलेल्या हरयाणा, उत्तर प्रदेश सारख्या राज्यांनी दाखविली आहे.  

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाMamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदी