शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

अग्निवीर भाजप कार्यकर्ते, त्यांना नोकऱ्या का द्यायच्या? ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 11:10 IST

सेना दलांमध्ये अग्निवीरांची चार वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांना राज्यांनी नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात असे पत्र केंद्राने राज्यांना पाठविले होते.

कोलकाता : अग्निवीर हे भाजप कार्यकर्ते असल्याचा खळबळजनक उल्लेख पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. या भाजप कार्यकर्त्यांना राज्यांनी नोकऱ्या का द्यायच्या असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला. 

सेना दलांमध्ये अग्निवीरांची चार वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांना राज्यांनी नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात असे पत्र केंद्राने राज्यांना पाठविले होते. त्या अनुषंगाने ममता बॅनर्जी यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या की भाजप कार्यकर्त्यांना आम्ही नोकऱ्या का द्यायच्या ? त्यापेक्षा आमच्या राज्यातील युवकांना नोकऱ्यांमध्ये राज्य सरकार प्राधान्य देईल. 

त्यांनी म्हटले आहे की, सैन्यदलामध्ये केंद्र सरकार अग्निवीरांना फक्त चार वर्षे सेवा बजावण्याची संधी देणार आहे. त्यानंतर या अग्निवीरांना नोकऱ्या देण्याची जबाबदारी केंद्र सरकार राज्यांवर ढकलणार हे योग्य नाही. नोकरीची गरज असलेल्या युवकांची पश्चिम बंगालमध्ये कमतरता नाही. आम्ही या युवकांचा  नोकऱ्यांसाठी प्राधान्याने विचार करू.

निवडणुकांपर्यंतच अग्निपथ योजना २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपर्यंतच अग्निपथ योजना केंद्र सरकारकडून राबविली जाईल असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला. अग्निपथ योजना विरोधात देशभरात निदर्शने झाली होती. काही ठिकाणी या निदर्शनांना हिंसक वळण लागले होते. अग्निपथ योजनेबाबत विरोधकांनीही चिंता व्यक्त केली होती. मात्र अग्निवीरांनी चार वर्षे सेनादलात सेवा बजावल्यानंतर त्यांना नोकऱ्या देण्याची तयारी भाजपची सत्ता असलेल्या हरयाणा, उत्तर प्रदेश सारख्या राज्यांनी दाखविली आहे.  

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाMamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदी