शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

Agnipath Scheme Protest | PM मोदींच्या मदतीला धावले CM योगी; 'अग्निपथ' विरोधातील 'आग' शमवण्यासाठी मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 18:07 IST

अग्निपथ योजनेला देशातील विविध राज्यात विरोध केला जात आहे.

Agnipath Scheme Protest, PM Modi CM Yogi | लष्करासंबंधी असलेल्या अग्निपथ योजनेची घोषणा झाल्यापासूनच या योजनेविरोधात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत. पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर विरोधकांकडून विविध आरोप केले जात आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये आंदोलनाल हिंसक वळण लागल्याचेही चित्र आहे. अनेक ठिकाणी आंदोलकांनी सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान केले असल्याचीही माहिती आहे. अशातच पंतप्रधान मोदी यांच्या मदतीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ धावून आले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी अग्निपथ विरोधातील वैचारिक आग शमवण्यासाठी एक मोठी घोषणा केली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी तरूणांना एक विशेष आश्वासन दिले. याच संदर्भात योगी आदित्यनाथ यांनी एक ट्वीटदेखील केले आहे. योगीं व्यतिरिक्त देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीही आंदोलक तरूणांना आणि विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.  अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर देशातील अनेक राज्यांमध्ये याला विरोध केला जात आहे. या हिंसक आंदोलनांच्या दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली. अग्निपथ योजनेअंतर्गत यशस्वी झालेल्यांना अग्निवीरांना सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्यक्रम असेल अशी घोषणा त्यांनी केली. आदित्यनाथ म्हणाले की, केंद्र सरकारने अग्निपथ योजनेसाठी विशिष्ट वयाची अट ठेवली आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत लष्करात चार वर्षे देशाची सेवा केल्यानंतर अग्नीवीरांना उत्तर प्रदेशामध्ये नोकऱ्यांच्या वेळी प्राधान्य दिले जाणार आहे.

योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करून अशी माहितीदेखील दिली की, अग्निपथ योजनेत सामील होऊन सशस्त्र सेवा दलात कार्य करणाऱ्या तरूणांना नंतर राज्यातील पोलीस आणि इतर विभागातील नोकऱ्यांमध्येही प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे त्यांनी असे आवाहन केले की कोणत्याही विद्यार्थ्यांनी अग्निपथ विरोधात पसरवण्यात आलेल्या अफवांना किंवा दाव्यांना बळी पडू नका. शांतता राखा.

अग्निपथ योजनेमुळे नाराज झालेल्या तरूणांना समजवताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, "तरूणांनो, भारताची अग्निपथ योजना तुमच्या आयुष्याला नवा आयाम देईल तसेच भविष्याला सुवर्ण आधार देईल. तुम्ही कोणत्याही चुकीच्या माहितीला बळी पडू नका. भारतमातेची सेवा करण्याचा निश्चय करणारे आमचे 'अग्निवीर' हा राष्ट्राचा अमूल्य निधी असेल आणि उत्तर प्रदेश सरकार अग्निवीरांना पोलीस आणि इतर सेवांमध्ये प्राधान्य देईल."

तत्पूर्वी गुरुवारी देखील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या योजनेचे कौतुक केले होते आणि अग्निपथ योजना तरुणांना देश आणि समाजाच्या सेवेसाठी तयार करेल असे सांगितले होते. त्यांना अभिमान वाटेल अशा भविष्याची संधी देईल. उत्तर प्रदेश पोलीस आणि  त्यासंबंधी दलांमध्ये अग्निवीरांना सेवेत प्राधान्य दिले जाईल, असेही आश्वासन देण्यात आले होते.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदी