शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

2032 पर्यंत सैन्यात 50% अग्निवीर असतील, त्यानंतर दरवर्षी 1.5 लाख भरती होतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 12:28 IST

Agnipath scheme: लष्कराचे उपप्रमुख जनरल बी.एस. राजू यांनी सरकारच्या नवीन 'अग्निपथ' योजनेबाबत महत्वाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेमुळे तरुणांचे नुकसान होणार नाही.

नवी दिल्ली: सध्या देशात सर्वत्र केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेची चर्चा आहे. या योजने अंतर्गत तरुणांना सैन्यात सेवेची संधी मिळेल. यासोबतच त्यांना चांगला पगारही मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात लष्करी आघाडीवर देशाची ताकद वाढेल, अशी अपेक्षा आहे. लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बीएस राजू यांच्या म्हणण्यानुसार, सरकारच्या या योजनेनुसार, 2030-32 पर्यंत 12 लाख जवानांपैकी निम्मे जवान 'अग्नवीर' असतील. या योजनेंतर्गत भरती झालेल्या लोकांना 'अग्नवीर' असे नाव देण्यात आले आहे.

टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना लेफ्टनंट जनरल बीएस राजू म्हणाले, 'या योजनेअंतर्गत दरवर्षी भरतीची संख्या वाढवली जाईल. यावर्षी 40 हजार लोकांचा त्यात समावेश होणार आहे. सातव्या आणि आठव्या वर्षापर्यंत त्याची संख्या 1.2 लाखांपर्यंत पोहोचेल. तर दहाव्या आणि अकराव्या वर्षी ही संख्या 1.6 लाखांवर पोहोचेल.

15 वर्षांपर्यंत नोकरीची संधीया योजनेअंतर्गत यावर्षी हवाई दल आणि नौदलात 3000 अग्निवीरांची भरती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, येथेही वर्षानुवर्षे भरतीचे प्रमाण वाढणार आहे. अग्निवीरांच्या प्रत्येक तुकडीतील केवळ 25 टक्के चांगल्या सैनिकांना पुढील 15 वर्षांसाठी नियमित केडरमध्ये सामील करून घेतले जाईल. तर उर्वरित 75 टक्के चार वर्षांनंतर निवृत्त केले जातील.

लष्कराचे सरासरी वय वाढेललष्कराचे उपप्रमुख बीएस राजू यांच्या मते, या योजनेमुळे लष्कराचा फिटनेसही वाढेल. सध्या लष्करात सरासरी वय 32 वर्षे आहे. परंतु अग्निवीरांच्या भरतीनंतर 6-7 वर्षांनी हे सरासरी वय 24-26 वर्षांपर्यंत खाली येईल.

'योजनेने नुकसान होणार नाही'या योजनेतून भरती झाल्यानंतर तरुणांचा सैन्यातील उत्साह आणि जोश कमी होऊ शकतो, असा दावा काही तज्ज्ञ करत आहेत. कारण त्यांची भरती केवळ चार वर्षांसाठी असेल. देशात बेरोजगारी वाढू शकते, असेही काही लोक म्हणत आहेत. किंबहुना, दर चार वर्षांनी सुमारे 75 टक्के लोकांना कामावरून कमी केले जाईल. मात्र, बीएस राजू या दाव्यांचे खंडन करतात.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दलindian navyभारतीय नौदलDefenceसंरक्षण विभाग