शहरं
Join us  
Trending Stories
1
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
2
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
3
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
4
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
5
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
6
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
8
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
9
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
10
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
11
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
12
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
13
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
14
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
15
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
16
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
17
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
18
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
19
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
20
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार

2032 पर्यंत सैन्यात 50% अग्निवीर असतील, त्यानंतर दरवर्षी 1.5 लाख भरती होतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 12:28 IST

Agnipath scheme: लष्कराचे उपप्रमुख जनरल बी.एस. राजू यांनी सरकारच्या नवीन 'अग्निपथ' योजनेबाबत महत्वाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेमुळे तरुणांचे नुकसान होणार नाही.

नवी दिल्ली: सध्या देशात सर्वत्र केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेची चर्चा आहे. या योजने अंतर्गत तरुणांना सैन्यात सेवेची संधी मिळेल. यासोबतच त्यांना चांगला पगारही मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात लष्करी आघाडीवर देशाची ताकद वाढेल, अशी अपेक्षा आहे. लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बीएस राजू यांच्या म्हणण्यानुसार, सरकारच्या या योजनेनुसार, 2030-32 पर्यंत 12 लाख जवानांपैकी निम्मे जवान 'अग्नवीर' असतील. या योजनेंतर्गत भरती झालेल्या लोकांना 'अग्नवीर' असे नाव देण्यात आले आहे.

टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना लेफ्टनंट जनरल बीएस राजू म्हणाले, 'या योजनेअंतर्गत दरवर्षी भरतीची संख्या वाढवली जाईल. यावर्षी 40 हजार लोकांचा त्यात समावेश होणार आहे. सातव्या आणि आठव्या वर्षापर्यंत त्याची संख्या 1.2 लाखांपर्यंत पोहोचेल. तर दहाव्या आणि अकराव्या वर्षी ही संख्या 1.6 लाखांवर पोहोचेल.

15 वर्षांपर्यंत नोकरीची संधीया योजनेअंतर्गत यावर्षी हवाई दल आणि नौदलात 3000 अग्निवीरांची भरती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, येथेही वर्षानुवर्षे भरतीचे प्रमाण वाढणार आहे. अग्निवीरांच्या प्रत्येक तुकडीतील केवळ 25 टक्के चांगल्या सैनिकांना पुढील 15 वर्षांसाठी नियमित केडरमध्ये सामील करून घेतले जाईल. तर उर्वरित 75 टक्के चार वर्षांनंतर निवृत्त केले जातील.

लष्कराचे सरासरी वय वाढेललष्कराचे उपप्रमुख बीएस राजू यांच्या मते, या योजनेमुळे लष्कराचा फिटनेसही वाढेल. सध्या लष्करात सरासरी वय 32 वर्षे आहे. परंतु अग्निवीरांच्या भरतीनंतर 6-7 वर्षांनी हे सरासरी वय 24-26 वर्षांपर्यंत खाली येईल.

'योजनेने नुकसान होणार नाही'या योजनेतून भरती झाल्यानंतर तरुणांचा सैन्यातील उत्साह आणि जोश कमी होऊ शकतो, असा दावा काही तज्ज्ञ करत आहेत. कारण त्यांची भरती केवळ चार वर्षांसाठी असेल. देशात बेरोजगारी वाढू शकते, असेही काही लोक म्हणत आहेत. किंबहुना, दर चार वर्षांनी सुमारे 75 टक्के लोकांना कामावरून कमी केले जाईल. मात्र, बीएस राजू या दाव्यांचे खंडन करतात.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दलindian navyभारतीय नौदलDefenceसंरक्षण विभाग