शहरं
Join us  
Trending Stories
1
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख; योगायोग की राजकीय भूकंपाचे संकेत?
2
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
3
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
4
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
5
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
6
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
7
Viral Video: "हे फूटपाथ चालण्यासाठी आहेत, गाड्यांसाठी नाही!" परदेशी नागरिकांकडून पुणेकरांना शिस्तीचा धडा
8
ड्रॅगनला मोठा झटका! चिनच्या 'या' वस्तूवर ५ वर्षांसाठी 'अँटी-डंपिंग ड्युटी' लागू; स्थानिक उद्योगांना मिळणार बळ
9
Anurag Dwivedi : क्रूझवर शाही लग्न, लक्झरी कारचा मालक; कोट्यवधींची कमाई करुन दुबईला पळाला प्रसिद्ध युट्यूबर
10
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
11
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
12
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
13
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
14
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
15
ICICI Prudential AMC IPO: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
16
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
17
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
18
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
19
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
20
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
Daily Top 2Weekly Top 5

2032 पर्यंत सैन्यात 50% अग्निवीर असतील, त्यानंतर दरवर्षी 1.5 लाख भरती होतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 12:28 IST

Agnipath scheme: लष्कराचे उपप्रमुख जनरल बी.एस. राजू यांनी सरकारच्या नवीन 'अग्निपथ' योजनेबाबत महत्वाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, या योजनेमुळे तरुणांचे नुकसान होणार नाही.

नवी दिल्ली: सध्या देशात सर्वत्र केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेची चर्चा आहे. या योजने अंतर्गत तरुणांना सैन्यात सेवेची संधी मिळेल. यासोबतच त्यांना चांगला पगारही मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात लष्करी आघाडीवर देशाची ताकद वाढेल, अशी अपेक्षा आहे. लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल बीएस राजू यांच्या म्हणण्यानुसार, सरकारच्या या योजनेनुसार, 2030-32 पर्यंत 12 लाख जवानांपैकी निम्मे जवान 'अग्नवीर' असतील. या योजनेंतर्गत भरती झालेल्या लोकांना 'अग्नवीर' असे नाव देण्यात आले आहे.

टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना लेफ्टनंट जनरल बीएस राजू म्हणाले, 'या योजनेअंतर्गत दरवर्षी भरतीची संख्या वाढवली जाईल. यावर्षी 40 हजार लोकांचा त्यात समावेश होणार आहे. सातव्या आणि आठव्या वर्षापर्यंत त्याची संख्या 1.2 लाखांपर्यंत पोहोचेल. तर दहाव्या आणि अकराव्या वर्षी ही संख्या 1.6 लाखांवर पोहोचेल.

15 वर्षांपर्यंत नोकरीची संधीया योजनेअंतर्गत यावर्षी हवाई दल आणि नौदलात 3000 अग्निवीरांची भरती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, येथेही वर्षानुवर्षे भरतीचे प्रमाण वाढणार आहे. अग्निवीरांच्या प्रत्येक तुकडीतील केवळ 25 टक्के चांगल्या सैनिकांना पुढील 15 वर्षांसाठी नियमित केडरमध्ये सामील करून घेतले जाईल. तर उर्वरित 75 टक्के चार वर्षांनंतर निवृत्त केले जातील.

लष्कराचे सरासरी वय वाढेललष्कराचे उपप्रमुख बीएस राजू यांच्या मते, या योजनेमुळे लष्कराचा फिटनेसही वाढेल. सध्या लष्करात सरासरी वय 32 वर्षे आहे. परंतु अग्निवीरांच्या भरतीनंतर 6-7 वर्षांनी हे सरासरी वय 24-26 वर्षांपर्यंत खाली येईल.

'योजनेने नुकसान होणार नाही'या योजनेतून भरती झाल्यानंतर तरुणांचा सैन्यातील उत्साह आणि जोश कमी होऊ शकतो, असा दावा काही तज्ज्ञ करत आहेत. कारण त्यांची भरती केवळ चार वर्षांसाठी असेल. देशात बेरोजगारी वाढू शकते, असेही काही लोक म्हणत आहेत. किंबहुना, दर चार वर्षांनी सुमारे 75 टक्के लोकांना कामावरून कमी केले जाईल. मात्र, बीएस राजू या दाव्यांचे खंडन करतात.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दलindian navyभारतीय नौदलDefenceसंरक्षण विभाग