शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अग्निवीरांसाठी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 08:45 IST

anand mahindra : चार वर्षांच्या सेवेनंतर अग्निवीरांना महिंद्रा ग्रुपमध्ये काम करण्याची संधी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेच्या विरोधात हिंसक निदर्शने (Agnipath Scheme Protest) सुरू आहेत. दरम्यान, महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी एक मोठी घोषणा केली आहे. चार वर्षांच्या सेवेनंतर अग्निवीरांना महिंद्रा ग्रुपमध्ये काम करण्याची संधी मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. १४ जून रोजी अग्निपथ योजना जाहीर करण्यात आली होती, तेव्हापासून सातत्याने हिंसक निदर्शने होत आहेत. योजनेत पेन्शन रद्द करण्यात आली आहे, तर सेवा केवळ चार वर्षांपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना योग्य नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.  याबाबत आनंद महिंद्रा म्हणाले, "अग्निपथ योजनेच्या घोषणेनंतर होत असलेल्या हिंसाचारामुळे मी दु:खी आणि निराश झालो आहे. गेल्या वर्षी जेव्हा या योजनेचा विचार केला जात होता, तेव्हा मी म्हणालो होतो की, अग्निवीरला मिळणारी शिस्त आणि कौशल्ये त्याला उल्लेखनीयपणे रोजगार सक्षम बनवतील. महिंद्रा ग्रुप अशा प्रशिक्षित, सक्षम तरुणांना आमच्यासोबत भरती (नोकरी) करण्याची संधी देईल."

आनंद महिंद्रा यांना असेही विचारण्यात आले की, ते अग्निवीरांना कंपनीत कोणते पद देणार? त्यावर त्यांनी लिहिले की, "लीडरशिप क्वॉलिटी, टीम वर्क आणि शारीरिक प्रशिक्षणामुळे अग्निवीरच्या रूपाने इंडस्ट्रीला बाजारपेठेसाठी तयार व्यावसायिक मिळेल. हे लोक अॅडमिनिस्ट्रेशन, सप्लाय चेन मॅनेजमेंटची कामे कुठेही करू शकतात."

दरम्यान, लष्कर, नौदल आणि हवाई दलाने अग्निपथ योजनेअंतर्गत सैनिकांच्या भरतीसाठी रविवारी व्यापक कार्यक्रम जाहीर केला. केंद्र सरकार या योजनेवर ठाम असल्याचे यावरून स्पष्ट झाले. सैन्य विभागाचे अवर सचिव लेफ्टनंट जनरल ए. पुरी यांनी स्पष्ट केले की, ही योजना लागू करण्याच्या दिशेने सरकार पुढे पावले टाकत आहे. 

पुरी म्हणाले की, सशस्त्र दलांतील वय कमी करण्यावर दीर्घकाळापासून विचार सुरु होता. कारगिल समीक्षा समितीनेही यावर टिप्पणी केली होती. नौदलाच्या योजनेची माहिती देताना व्हाइस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी म्हणाले की, नौदल मुख्यालय २५ जूनपर्यंत भरतीसाठी दिशानिर्देश जारी करील. पहिली बॅच २१ नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण सुरू करील. 

हिंसाचारात सहभागींना तिन्ही सेवांची दारे बंदलेफ्टनंट जनरल ए. पुरी म्हणाले की, अग्निवीरांबाबत जे नवे निर्णय घेण्यात आले ते हिंसाचारानंतर घेतलेले निर्णय नाहीत. सरकार पूर्वीपासूनच त्यावर विचार करत होते. या हिंसाचारात जे तरुण सहभागी आहेत त्यांना सशस्त्र दलाच्या तिन्ही सेवांमध्ये सहभागी होता येणार नाही. ज्यांना भरती प्रक्रियेत यायचे आहे त्यांना प्रमाणपत्र द्यावे लागेल की, ते अशा कोणत्याही हिंसाचारात सहभागी नव्हते. 

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाAnand Mahindraआनंद महिंद्रा