शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अग्नी-5ची लवकरच चाचणी; संपूर्ण चीन भारताच्या टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 16:23 IST

भारताच्या पहिल्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची लवकरच चाचणी

नवी दिल्ली: पोखरणमध्ये 20 वर्षांपूर्वी अणूचाचणी करुन जगाला आपल्या सामर्थ्याचं दर्शन घडवलं होतं. दोन दशकानंतर आता पुन्हा भारत आपल्या ताकदीचं दर्शन संपूर्ण जगाला घडवणार आहे. भारताकडूनच लवकरच अग्नी-5चं अनावरण केलं जाईल. हे भारताचं पहिलंच आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असेल. या क्षेपणास्त्राचा समावेश स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडच्या (एसएफसी) अंतर्गत करण्यात येईल.5 हजार किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असणाऱ्या अग्नी-5 ची यंत्रणा आणि उपयंत्रणा एसएफसीकडे सोपवण्यात आल्याची माहिती संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी दिली आहे. संपूर्ण चीन या आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या टप्प्यात असणार आहे. यासोबतच युरोप आणि आफ्रिका खंडातील काही भागदेखील या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात असतील. 'अग्नी-5 ची दुसरी चाचणी लवकरच होणार आहे. या चाचणीची तयारी पूर्ण झाली आहे. या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी 18 जानेवारीला झाली होती. एप्रिल 2012 नंतर यामध्ये चारवेळा सुधारणा करण्यात आली आहे,' अशी माहिती संरक्षण क्षेत्रातील सूत्रांनी दिली. स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे (एसएफसी) आधीपासून अनेक त्रिस्तरीय क्षेपणास्त्र आहेत. यामध्ये पृथ्वी-II (350 किमी.), अग्नि-I (700 किमी.), अग्नि-III (3,000 किमी) यांचा समावेश आहे. यासोबतच सुखोई-30 एमकेआय, मिराज-2000 आणि जॅग्वार ही लढाऊ विमानं अण्वस्त्र हल्ले करण्यात सक्षम आहेत.  

टॅग्स :Defenceसंरक्षण विभाग