शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

Agnipath: 'अग्निपथ' हिंसाचार; रेल्वेचे हजारो कोटींची संपत्ती स्वाहा; कोट्यवधींचा रिफंडही द्यावा लागला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 12:02 IST

Agnipath Violence: अग्निपथ विरोधातील हिंसाचारात सूमारे 1000 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

Agnipath Voilence Damage to Railways: सरकारच्या नवीन 'अग्निपथ' योजनेला देशभरातून विरोध होत आहे. हजारो तरुण रस्त्यावर उतरुन सरकारविरोधात तीव्र निदर्शने करत आहेत. यादरम्यान अनेक रेल्वे गाड्या आणि खासगी वाहने जाळण्यात आली. यामुळे भारतीय रेल्वेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

रेल्वेचे किती आणि कोणते नुकसान झालेअग्निपथ विरोधातील हिंसाचारात 1000 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच गाड्या जाळल्याने रेल्वेचे मोठे नुकसान झाले, त्यात गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे कोट्यवधी रुपये परत करावे लागले. या निदर्शनादरम्यान एकूण 922 मेल एक्सप्रेस गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या तर 120 गाड्या अंशतः रद्द कराव्या लागल्या.

कोट्यवधीचा रिफंडप्रत्येक ट्रेनमध्ये सरासरी 1200-1500 प्रवासी प्रवास करतात, त्यामुळे सुमारे 1044 गाड्या रद्द झाल्यामुळे 12 लाख लोकांच्या प्रवासावर परिणाम झाला. देशात 5 लाखांहून अधिक पीएनआर रद्द करण्यात आले आणि सुमारे 1.5 लाख प्रवाशांना मध्येच ट्रेन सोडावी लागली. एका अंदाजानुसार, रेल्वेने 70 कोटी रुपये रिफंड केले आहेत.

रेल्वे खर्च (प्रति ट्रेन)अग्निपथ योजनेच्या विरोधात देशात एवढे हिंसक आंदोलन झाले की, वेगवेगळ्या राज्यात 21 गाड्या जाळल्या आणि त्यामुळे रेल्वेचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. अशा परिस्थितीत, जर आपण त्याच्या किंमतीबद्दल बोललो, तर मेल एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सहसा 24 डबे असतात. इंजिनची किंमत 12 कोटी, एसी कोच 2.5 कोटी आणि स्लीपर कोच सुमारे 2 कोटी रुपये आहे. एका ट्रेनसाठी रेल्वेला सुमारे 30 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक खर्च येतो.

भारतीय रेल्वेभारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. रेल्वेकडून दररोज हजारो गाड्या चालवल्या जातात. सर्वसामान्यांच्या जीवनाची ती जीवनरेखा मानली जाते. रेल्वे रद्द झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही काळापासून देशाच्या अनेक भागांत सैन्य भरतीसाठीच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात प्रचंड विरोध होत आहे. निदर्शनादरम्यान, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा इत्यादी अनेक राज्यांमध्ये बदमाशांनी ट्रेनच्या बोगी पेटवल्या.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाIndian Railwayभारतीय रेल्वे