शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

Agnipath: 'अग्निपथ' हिंसाचार; रेल्वेचे हजारो कोटींची संपत्ती स्वाहा; कोट्यवधींचा रिफंडही द्यावा लागला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 12:02 IST

Agnipath Violence: अग्निपथ विरोधातील हिंसाचारात सूमारे 1000 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

Agnipath Voilence Damage to Railways: सरकारच्या नवीन 'अग्निपथ' योजनेला देशभरातून विरोध होत आहे. हजारो तरुण रस्त्यावर उतरुन सरकारविरोधात तीव्र निदर्शने करत आहेत. यादरम्यान अनेक रेल्वे गाड्या आणि खासगी वाहने जाळण्यात आली. यामुळे भारतीय रेल्वेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

रेल्वेचे किती आणि कोणते नुकसान झालेअग्निपथ विरोधातील हिंसाचारात 1000 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच गाड्या जाळल्याने रेल्वेचे मोठे नुकसान झाले, त्यात गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे कोट्यवधी रुपये परत करावे लागले. या निदर्शनादरम्यान एकूण 922 मेल एक्सप्रेस गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या तर 120 गाड्या अंशतः रद्द कराव्या लागल्या.

कोट्यवधीचा रिफंडप्रत्येक ट्रेनमध्ये सरासरी 1200-1500 प्रवासी प्रवास करतात, त्यामुळे सुमारे 1044 गाड्या रद्द झाल्यामुळे 12 लाख लोकांच्या प्रवासावर परिणाम झाला. देशात 5 लाखांहून अधिक पीएनआर रद्द करण्यात आले आणि सुमारे 1.5 लाख प्रवाशांना मध्येच ट्रेन सोडावी लागली. एका अंदाजानुसार, रेल्वेने 70 कोटी रुपये रिफंड केले आहेत.

रेल्वे खर्च (प्रति ट्रेन)अग्निपथ योजनेच्या विरोधात देशात एवढे हिंसक आंदोलन झाले की, वेगवेगळ्या राज्यात 21 गाड्या जाळल्या आणि त्यामुळे रेल्वेचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. अशा परिस्थितीत, जर आपण त्याच्या किंमतीबद्दल बोललो, तर मेल एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सहसा 24 डबे असतात. इंजिनची किंमत 12 कोटी, एसी कोच 2.5 कोटी आणि स्लीपर कोच सुमारे 2 कोटी रुपये आहे. एका ट्रेनसाठी रेल्वेला सुमारे 30 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक खर्च येतो.

भारतीय रेल्वेभारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. रेल्वेकडून दररोज हजारो गाड्या चालवल्या जातात. सर्वसामान्यांच्या जीवनाची ती जीवनरेखा मानली जाते. रेल्वे रद्द झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही काळापासून देशाच्या अनेक भागांत सैन्य भरतीसाठीच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात प्रचंड विरोध होत आहे. निदर्शनादरम्यान, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा इत्यादी अनेक राज्यांमध्ये बदमाशांनी ट्रेनच्या बोगी पेटवल्या.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाIndian Railwayभारतीय रेल्वे