शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

Agnipath: 'अग्निपथ' हिंसाचार; रेल्वेचे हजारो कोटींची संपत्ती स्वाहा; कोट्यवधींचा रिफंडही द्यावा लागला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 12:02 IST

Agnipath Violence: अग्निपथ विरोधातील हिंसाचारात सूमारे 1000 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

Agnipath Voilence Damage to Railways: सरकारच्या नवीन 'अग्निपथ' योजनेला देशभरातून विरोध होत आहे. हजारो तरुण रस्त्यावर उतरुन सरकारविरोधात तीव्र निदर्शने करत आहेत. यादरम्यान अनेक रेल्वे गाड्या आणि खासगी वाहने जाळण्यात आली. यामुळे भारतीय रेल्वेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

रेल्वेचे किती आणि कोणते नुकसान झालेअग्निपथ विरोधातील हिंसाचारात 1000 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच गाड्या जाळल्याने रेल्वेचे मोठे नुकसान झाले, त्यात गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे कोट्यवधी रुपये परत करावे लागले. या निदर्शनादरम्यान एकूण 922 मेल एक्सप्रेस गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या तर 120 गाड्या अंशतः रद्द कराव्या लागल्या.

कोट्यवधीचा रिफंडप्रत्येक ट्रेनमध्ये सरासरी 1200-1500 प्रवासी प्रवास करतात, त्यामुळे सुमारे 1044 गाड्या रद्द झाल्यामुळे 12 लाख लोकांच्या प्रवासावर परिणाम झाला. देशात 5 लाखांहून अधिक पीएनआर रद्द करण्यात आले आणि सुमारे 1.5 लाख प्रवाशांना मध्येच ट्रेन सोडावी लागली. एका अंदाजानुसार, रेल्वेने 70 कोटी रुपये रिफंड केले आहेत.

रेल्वे खर्च (प्रति ट्रेन)अग्निपथ योजनेच्या विरोधात देशात एवढे हिंसक आंदोलन झाले की, वेगवेगळ्या राज्यात 21 गाड्या जाळल्या आणि त्यामुळे रेल्वेचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. अशा परिस्थितीत, जर आपण त्याच्या किंमतीबद्दल बोललो, तर मेल एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सहसा 24 डबे असतात. इंजिनची किंमत 12 कोटी, एसी कोच 2.5 कोटी आणि स्लीपर कोच सुमारे 2 कोटी रुपये आहे. एका ट्रेनसाठी रेल्वेला सुमारे 30 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक खर्च येतो.

भारतीय रेल्वेभारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. रेल्वेकडून दररोज हजारो गाड्या चालवल्या जातात. सर्वसामान्यांच्या जीवनाची ती जीवनरेखा मानली जाते. रेल्वे रद्द झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही काळापासून देशाच्या अनेक भागांत सैन्य भरतीसाठीच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात प्रचंड विरोध होत आहे. निदर्शनादरम्यान, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा इत्यादी अनेक राज्यांमध्ये बदमाशांनी ट्रेनच्या बोगी पेटवल्या.

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाIndian Railwayभारतीय रेल्वे