शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Agneepath: ...म्हणून भडकला ११ राज्यांत हिंसाचार, याच राज्यांतील १६६ जिल्ह्यांतून होते ९५% जवानांची भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 08:24 IST

Agneepath Scheme Protest: देशातील सैन्यदलात ९५ टक्के जवान हे केवळ ९ राज्यांतील १६६ जिल्ह्यांतून निवडले जातात. अग्निपथ योजनेला बहुतांश हिंसक विरोध हीच राज्ये व जिल्ह्यांतून होत आहे. येथे मागील दोन वर्षांच्या कालावधीत युवकांना सैन्यदलात भरतीची एकदाही संधी मिळाली नाही. 

- शरद गुप्तानवी दिल्ली : देशातील सैन्यदलात ९५ टक्के जवान हे केवळ ९ राज्यांतील १६६ जिल्ह्यांतून निवडले जातात. अग्निपथ योजनेला बहुतांश हिंसक विरोध हीच राज्ये व जिल्ह्यांतून होत आहे. येथे मागील दोन वर्षांच्या कालावधीत युवकांना सैन्यदलात भरतीची एकदाही संधी मिळाली नाही. संरक्षण तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधाचे मुख्य कारण या योजनेतील फारच कमी कालावधी, रेजिमेंट व्यवस्थेचा अभाव व वयोमर्यादा दोन वर्षे कमी करणे हे आहे. विद्यमान पिढीमध्ये चार वर्षांचा असा कालावधी आला की, ज्यात त्यांना सैन्य दलात भरतीची एकही संधी मिळाली नाही. 

रेजिमेंटचे मूळ चरित्र गायबप्रत्येक रेजिमेंटवर भरतीसाठी विशेष क्षेत्र किंवा जातीसाठी वेगळी तरतूद असते. परंतु, अग्निपथ योजनेत कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाही. सैन्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यामुळे हळूहळू रेजिमेंट आपले मूळ चरित्र गमावेल व देशाच्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करू लागेल. ६ महिने प्रशिक्षण, ४ वर्षे कामसहा महिने प्रशिक्षणानंतर चार वर्षे काम हा  कमी कालावधी आहे. ना सैनिक आपल्या रेजिमेंटशी एकरूप होतो ना रेजिमेंट त्या सैनिकाच्या कार्यपद्धतीवर गर्व करू शकेल. 

निवृत्तीनंतर काय? कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर बाहेर पडलेल्या युवकांना पर्यायी रोजगाराची व्यवस्था स्पष्ट न झाल्यामुळे खऱ्या अर्थाने युवकांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. ही योजना एक किंवा दोन जिल्ह्यांत पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू केली तर कदाचित यातील उणिवा समोर येऊ शकतील. त्यानंतर योजना औपचारिकरीत्या लागू करण्यापूर्वी त्यातील उणिवा कमी केल्या जाऊ शकतात. 

रेजिमेंट व्यवस्थेचा अभाव ही यातील फार मोठी उणीव आहे. सैन्यदलात नाम, नमक व निशाण सर्वात महत्त्वाचे असते. सैनिक आपल्या रेजिमेंटमध्ये प्रदीर्घ कालावधीत काम केल्यानंतर त्याला आपले दुसरे घरच मानतात.     - मेजर जनरल अजय कुमार दत्ता, संरक्षण तज्ज्ञ 

केंद्राचा ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रयत्न नवी दिल्ली :  लष्करात चार वर्षांसाठी भरती करावयाच्या अग्निपथ योजनेवरून देशातील युवकांचा विरोध वाढत असताना केंद्र सरकारने यावर ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अग्निवीरांच्या भरतीसाठी असलेली वयोमर्यादा २ वर्षांनी वाढविली आहे. यासंदर्भात दोन दिवसांत अधिसूचना जारी होईल, असे लष्कर प्रमुख मनोज पांडे यांनी म्हटले आहे. अग्निपथ याेजनेंतर्गत हवाई दलाची भरतीप्रक्रिया २४ जूनपासून सुरू हाेईल, असे हवाईदल प्रमुख हवाईदल प्रमुख विवेक चाैधरी यांनी स्पष्ट केले.केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ  सिंह यांनी तिन्ही सैन्यदलाच्या उपस्थितीमध्ये या योजनेची घोषणा गेल्या मंगळवारला केली, परंतु दुसऱ्या दिवसापासून या योजनेला युवकांचा विरोध सुरू झाला. गुरुवारपासून या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याने केंद्र सरकारने लगेच या मुद्यावरून युवकांमध्ये असलेला असंतोष निवळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

राहुल गांधी यांचा पंतप्रधान माेदींवर निशाणाअग्निपथ योजनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांना आपल्या मित्रांच्या आवाजाशिवाय काहीच ऐकू येत नाही. राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे की, अग्निपथ - तरुणांना नाकारले, कृषी कायदा - शेतकऱ्यांना नाकारले, नोटबंदी - अर्थतज्ज्ञांना नाकारले, जीएसटी - व्यापाऱ्यांना नाकारले. त्यांनी आरोप केला की, देशातील जनतेला काय हवे आहे ते पंतप्रधानांच्या लक्षात येत नाही. कारण त्यांना मित्रांच्या आवाजाशिवाय काही ऐकू येत नाही.योजना तत्काळ मागे घ्या : प्रियांका गांधी ही योजना तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, २४ तासांच्या आत भाजप सरकारला सैन्य भरतीचा नियम बदलावा लागला. ही योजना घाईघाईत तरुणांवर लादली जात आहे. योजना तत्काळ मागे घ्यावी. हवाई दलातील थांबलेल्या भरतीत नियुक्त्या द्या. वयोमर्यादेत सूट देऊन सैन्य भरती पूर्वीप्रमाणेच करा.

१८ जून रोजी बिहार बंदnसैन्य भरतीच्या नव्या प्रक्रियेविरुद्ध रोजगार संघर्ष संयुक्त मोर्चा आणि सैन्य भरती जवान मोर्चा यांनी १८ जून रोजी बिहार बंदची हाक दिली आहे. या संघटनांनी केंद्र सरकारला ७२ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. जर सरकारने ही योजना परत घेतली नाही तर भारत बंदचा इशारा देण्यात आला आहे.उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हल्ला- आंदोलकांकडून आता भाजपच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. बेतियामध्ये उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्या निवासस्थानी आंदोलकांनी हल्ला केला. त्यांच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा तोडल्या. भाजपचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय जायसवाल यांच्या घरावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. घर जाळण्याचा प्रयत्न केला. - भाजपचे आमदार विनय बिहारी यांच्या वाहनावर हल्ला केला. वाहनाच्या काचा फोडल्या. आंदोलकांचे म्हणणे होते की, केवळ चार वर्षांसाठी सैन्यात भरती म्हणजे, रोजगाराच्या अधिकारावर गदा आहे. सैन्यात आमदार, खासदार यांची मुले नाहीत तर गरीब शेतकऱ्यांची मुले आहेत. सरकार त्यांच्यावर अन्याय करत आहे. ते आम्ही सहन करणार नाही.युवकांच्या भविष्यासाठी- केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यासंदर्भात युवकांनी भावनेच्या भरात येऊन कोणतेही कृत्य करू नये. अग्निपथ योजना युवकांसाठी चांगली आहे. युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही योजना असल्याचे राजनाथसिंह यांनी म्हटले आहे.युवकांनी योजना समजून घ्यावी - मनोज पांडे-अग्निवीर म्हणून भरतीसाठी वयोमर्यादा आता दोन वर्षांनी वाढविली आहे. या संदर्भात दोन दिवसांत अधिसूचना जारी होईल, असे लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी म्हटले आहे. युवकांनी या योजनेची सर्व माहिती आधी जाणून घ्यावी, असे आवाहन मनोज पांडे यांनी केले आहे. 

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजना