शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कावेरीसाठी मुख्यमंत्री उपोषणाला, केंद्र सरकारच्या विरोधात अण्णाद्रमुकचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 05:51 IST

कावेरी जलव्यवस्थापन मंडळाची स्थापना करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अमलबजावणी करण्यास केंद्र सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ अण्णाद्रमुकचे नेते व कार्यकर्त्यानी एक दिवसाचे उपोषण मंगळवारी केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील २१ लाख दुकाने व कारखानेही बंद होते.

चेन्नई - कावेरी जलव्यवस्थापन मंडळाची स्थापना करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अमलबजावणी करण्यास केंद्र सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ अण्णाद्रमुकचे नेते व कार्यकर्त्यानी एक दिवसाचे उपोषण मंगळवारी केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील २१ लाख दुकाने व कारखानेही बंद होते.उपोषणात तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. के. पलानीस्वामी व उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम हे अचानक सहभागी झाल्याने पोलिसांची धावपळ उडाली. त्यांना तसेच अद्रमुकच्या अनेक नेते व मंत्र्यांना ते दोघे सहभागी होणार असल्याची माहितीही नव्हती. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही कावेरी मंडळाची स्थापना करण्यात केंद्र सरकार टाळाटाळ करीत असल्याने तामिळनाडूत संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करायला राज्यपाल बनवारीलाल पुरोहित दिल्लीला रवाना झाले.कावेरी जलव्यवस्थापन मंडळाची स्थापना करावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने १६ फेब्रुवारी रोजी दिला होता. मात्र त्याबाबत केंद्राने काहीही हालचाल न केल्याने तामिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. त्यावर ९ एप्रिल रोजी सुनावणी होईल. मंडळाच्या स्थापनेसाठी केंद्राने तीन महिने मुदतवाढीची द्यावी विनंती केली आहे. कर्नाटकात मे महिन्यात विधानसभेच्या निवडणुका असून, मंडळ स्थापन केल्यास तिथे भाजपाला फटका बसेल, या शक्यतेने मोदी सरकार टाळाटाळ करीत असल्याचा आरोप होत आहे. (वृत्तसंस्था)लोकसभा तहकूबमंडळाची स्थापना केली जात नसल्याच्या निषेधार्थ अण्णाद्रमुकच्या खासदारांनी लोकसभेत गदारोळ केला. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना बुधवारपर्यंत तहकूब करावे लागले.अण्णाद्रमुकचे खासदार अध्यक्षांसमोर जमा झाले व त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. त्यांनी त्याआधी संसद भवनाबाहेरही निदर्शने केली.द्रमुकचा ५ एप्रिलला बंदअण्णाद्रमुक हे भाजपाच्या हातातले कळसूत्री बाहुले असल्यामुळे कावेरी पाणीतंट्यावर राज्याला न्याय मिळणे शक्य नाही अशी टीका द्रमुक पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी केली आहे. द्रमुक व अन्य पक्षांनी ५ एप्रिल रोजी राज्यव्यापी बंद पुकारला आहे.सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही, कावेरी बोर्ड स्थापन न केल्याने तामिळनाडू सरकारने केंद्राविरोधात सुप्रीम कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला आहे. केंद्रावर वेळकाढूपणाचा आरोप करीत अण्णा द्रमुक नेत्यांनी चेन्नईमध्ये उपोषण केले. त्या पक्षाच्या खासदारांनी संसद भवनाबाहेर निदर्शने केली, तेव्हा तृणमूलचे खासदार मोदी सरकार दलितविरोधी असल्याच्या घोषणा देत होते.

टॅग्स :riverनदीTamilnaduतामिळनाडूGovernmentसरकार