शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
3
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
4
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
5
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
6
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
7
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
8
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
9
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
10
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
11
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
12
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
13
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
14
Katrina Kaif-Vicky Kaushal Baby: गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
15
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
16
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
17
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
18
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
19
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
20
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात

कावेरीसाठी मुख्यमंत्री उपोषणाला, केंद्र सरकारच्या विरोधात अण्णाद्रमुकचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 05:51 IST

कावेरी जलव्यवस्थापन मंडळाची स्थापना करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अमलबजावणी करण्यास केंद्र सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ अण्णाद्रमुकचे नेते व कार्यकर्त्यानी एक दिवसाचे उपोषण मंगळवारी केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील २१ लाख दुकाने व कारखानेही बंद होते.

चेन्नई - कावेरी जलव्यवस्थापन मंडळाची स्थापना करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अमलबजावणी करण्यास केंद्र सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ अण्णाद्रमुकचे नेते व कार्यकर्त्यानी एक दिवसाचे उपोषण मंगळवारी केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील २१ लाख दुकाने व कारखानेही बंद होते.उपोषणात तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. के. पलानीस्वामी व उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम हे अचानक सहभागी झाल्याने पोलिसांची धावपळ उडाली. त्यांना तसेच अद्रमुकच्या अनेक नेते व मंत्र्यांना ते दोघे सहभागी होणार असल्याची माहितीही नव्हती. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही कावेरी मंडळाची स्थापना करण्यात केंद्र सरकार टाळाटाळ करीत असल्याने तामिळनाडूत संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करायला राज्यपाल बनवारीलाल पुरोहित दिल्लीला रवाना झाले.कावेरी जलव्यवस्थापन मंडळाची स्थापना करावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने १६ फेब्रुवारी रोजी दिला होता. मात्र त्याबाबत केंद्राने काहीही हालचाल न केल्याने तामिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. त्यावर ९ एप्रिल रोजी सुनावणी होईल. मंडळाच्या स्थापनेसाठी केंद्राने तीन महिने मुदतवाढीची द्यावी विनंती केली आहे. कर्नाटकात मे महिन्यात विधानसभेच्या निवडणुका असून, मंडळ स्थापन केल्यास तिथे भाजपाला फटका बसेल, या शक्यतेने मोदी सरकार टाळाटाळ करीत असल्याचा आरोप होत आहे. (वृत्तसंस्था)लोकसभा तहकूबमंडळाची स्थापना केली जात नसल्याच्या निषेधार्थ अण्णाद्रमुकच्या खासदारांनी लोकसभेत गदारोळ केला. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना बुधवारपर्यंत तहकूब करावे लागले.अण्णाद्रमुकचे खासदार अध्यक्षांसमोर जमा झाले व त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. त्यांनी त्याआधी संसद भवनाबाहेरही निदर्शने केली.द्रमुकचा ५ एप्रिलला बंदअण्णाद्रमुक हे भाजपाच्या हातातले कळसूत्री बाहुले असल्यामुळे कावेरी पाणीतंट्यावर राज्याला न्याय मिळणे शक्य नाही अशी टीका द्रमुक पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी केली आहे. द्रमुक व अन्य पक्षांनी ५ एप्रिल रोजी राज्यव्यापी बंद पुकारला आहे.सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही, कावेरी बोर्ड स्थापन न केल्याने तामिळनाडू सरकारने केंद्राविरोधात सुप्रीम कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला आहे. केंद्रावर वेळकाढूपणाचा आरोप करीत अण्णा द्रमुक नेत्यांनी चेन्नईमध्ये उपोषण केले. त्या पक्षाच्या खासदारांनी संसद भवनाबाहेर निदर्शने केली, तेव्हा तृणमूलचे खासदार मोदी सरकार दलितविरोधी असल्याच्या घोषणा देत होते.

टॅग्स :riverनदीTamilnaduतामिळनाडूGovernmentसरकार