शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

विविध एजन्सींचे एक्झिट पोल याआधी ठरले होते खोटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 11:33 IST

२००४ आणि २००९ मधील एक्झिट पोलच्या अंदाजावर पाणी फेरले गेले होते. त्यावेळी एक्झिट पोलच्या सर्वच एजन्सीं तोंडघशी पडले होते .

मोसिन शेख 

मुंबई - शेवटचा टप्पा संपताच माध्यमांमध्ये विविध एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलची निरीक्षणं बाहेर येऊ लागले आहेत. प्रत्यक्षात मात्र निवडणुकीच्या निकालानंतर सर्व चित्र स्पष्ट होतील. माध्यमांमध्ये एक्झिट पोलची दिली जाणारी आकडेवारी आणि प्रत्यक्ष निकालाचे चित्र पूर्णपणे वेगळंही असू शकतं. एक्झिट पोलचे अंदाज सपशेल आपटल्याची अनेक उदाहरणे आहेत. २००९ मधील एक्झिट पोल याचा उत्तम उदाहरण ठरले आहेत. त्याव्येतिरिक्त ही अनेकदा एक्झिट पोल खोटी ठरली असल्याचे इतिहास आहे.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटचा टप्प्यात रविवारी मतदान संपताच, माध्यमांमध्ये एक्झिट पोलचा धडका सुरु आहे. आलेल्या सर्व पोलनुसार एनडीए सरकार बनवेल असे दाखवले जात आहे. तर यूपीएला पुन्हा विरोधकाच्या भूमिकेत बसण्याची वेळ येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. २०१४ ला एक्झिट पोलचे बहुतांश अंदाज खरे ठरले पण त्याआधीच्या सलग दोन लोकसभा निकालांआधी हे अंदाज सपशेल आपटले. २००४ आणि २००९ मधील एक्झिट पोलच्या अंदाजावर पाणी फेरले गेले होते. त्यावेळी एक्झिट पोलच्या सर्वच एजन्सीं तोंडघशी पडले होते .

२००४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार एनडीएला २२५ जागांवर तर यूपीएला १८३ ठिकाणी विजय मिळवता येईल असा अंदाज वर्तवला गेला होता. प्रत्यक्षात आलेला निकाल वेगळा होता. एनडीएला २२५ चा अंदाज असताना त्यांना १८९ ठिकाणी विजय मिळवता आला. भाजपला फक्त १३८ जागा मिळाल्या होत्या. यूपीएला १८३ जागांचा अंदाज एक्झिट पोलने दाखवला होता. प्रत्यक्षात, मात्र त्याच यूपीएचे २२२ खासदार निवडून आले होते. त्यामुळे २००४ मध्ये एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलचे सर्व अंदाज चुकले होते.

२००४ प्रमाणेच २००९ मधील परिस्थिती एक्झिट पोलची पहायला मिळाली होती. २००९ मधील लोकसभा निवडणुकीत एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार यूपीएला १९९ आणि एनडीएला १९७ जागांवर विजय मिळवता येईल असा अंदाज वर्तवला होता. प्रत्यक्षात यूपीएला २६२ आणि एनडीएला १५९ ठिकाणी विजय मिळवता आला होता. एक्झिट पोलच्या अंदाज यावेळी खोटा ठरला होता तर यूपीएच्या जागा प्रचंड वाढताना पहायला मिळाल्या होत्या.

२०१८ मध्ये छत्तीसगढमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सरासरी ४० जागांवर विजय मिळेल तर कॉंग्रेसचे ४६ आमदार निवडणून येतील असा अंदाज एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीतून समोर आले होते. निकाल हाती आल्यानंतर कॉंग्रेसला ६८ तर भाजपला १५ जागांवर विजय मिळवता आला होता. यावेळीही एक्झिट पोलची आकडेवारी खोटी ठरली होती. त्यामुळे २०१९ लोकसभा निवडणुकीतील एजन्सींच्या एक्झिट पोलचे आकडे कितपत खरे ठरणार हे २३ रोजीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha 2019 Exit Pollलोकसभा निवडणूक एक्झिट पोलLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालElectionनिवडणूक