शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

दोन अपयशांनंतर यूपीत तिसऱ्यांदा प्लॅस्टिकबंदी! १५ जुलैपासून अंमलबजावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 01:48 IST

महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशातही आता प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात येत आहे. येत्या १५ जुलैपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

लखनौ : महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशातही आता प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात येत आहे. येत्या १५ जुलैपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.या घोषणेमुळे १५ जुलैनंतर उत्तर प्रदेशात प्लॅस्टिकच्या पिशव्या, कप व ग्लास यावर बंदी येणार आहे. त्यांचा वापर आतापासूनच थांबवावा, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी बाराबंकी येथील वन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.स्वत:च्या शरीराचे स्वास्थ्य टिकविण्याबरोबरच पृथ्वीचे आरोग्य टिकविण्याची जबाबदारीही आपली आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्लॅस्टिकवर बंदी घालणे गरजेचे आहे, असे सांगतानाच उत्तर प्रदेशातील जवळपास सर्व नद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात प्लॅस्टिकचा कचरा साचला आहे. तो काढण्यात अडचणी येत आहेत आणि तो अडकून राहिल्यामुळे नद्यांना पूर येत आहेत, नद्यांचे पाणी गावांमध्ये व शेतात शिरून आपले नुकसान होत आहे, याचा उल्लेख त्यांनी केला.योगी आदित्यनाथ यांनी १५ जुलैपासून प्लॅस्टिकबंदी करण्याचा निर्णय घेतला असला, तरी यापूर्वी दोनदा उत्तर प्रदेशात प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली होती. तिची नीट अंमलबजावणी करण्यात आली नाही. सर्वात आधी २0१५ साली तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ही बंदी घातली होती.त्यानंतरही राज्यात प्लॅस्टिकचा वापर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर, २0१६ साली त्यांनी पुन्हा प्लॅस्टिकबंदी जाहीर करताना, त्यासाठी कडक नियम ठरवून दिले, परंतु त्याचा परिणाम अद्यापझाला नसल्याने योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा बंदी घातलीआहे. (वृत्तसंस्था)२५ राज्यांत बंदीदेशातील २५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या प्लॅस्टिकवर बंदी आहे. सर्वात आधी सिक्किम राज्यात त्यावर बंदी घालण्यात आली आणि तिथे ती यशस्वी झाली आहे. काही राज्यात प्लॅस्टिकवर बंदी घातली असली, तरी त्यांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आलेली नाही, तसेच महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी घातलेली बंदी अंशत: आहे. म्हणजेच काही प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यास राज्यात संमती आहे. केरळने समुद्रातील प्लॅस्टिकचा वापर रस्तेबांधणीसाठी सुरू केला आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी