शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, या दोन राज्यांत स्वबळावर निवडणूक लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 18:28 IST

Congress News : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अनपेक्षित यशानंतर काँग्रेसने आपली जुनी ताकद परत मिळवण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील काही काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपैकी दोन राज्यांमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला कडवी टक्कर दिली होती. तसेच इंडिया आघाडीसोबत भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवण्यापासून रोखले होते. तसेच मागच्या दोन लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत जागांची संख्या दुपटीने वाढून ९९ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. तसेच आपली जुनी ताकद परत मिळवण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्यास पक्षाने सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील काही काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपैकी दोन राज्यांमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. काँग्रेस हरियाणा आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत  स्वबळावर लढण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, दिल्ली आणि हरियाणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षासोबत आघाडी होण्याची कुठलीही शक्यता नाही आहे. मात्र महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभेच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी कायम राहील. ज्या राज्यांमधील काँग्रेसच्या नेत्यांना इंडिया आघाडी कायम राहावी, असं वाटेल, तिथे आघाडी कायम राहिली.

काँग्रेस आणि आम आदमी पक्ष हे दोघेही विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षांनी दिल्ली आणि हरियाणामध्ये एकत्र येत निवडणूक लढवली होती. मात्र पंजाबमध्ये दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते. दरम्यान, महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये या वर्षाच्या अखेरीच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तर दिल्लीमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला निवडणुका नियोजित आहेत.  

पुढील विधानसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी कायम राहील का असं विचारलं असता जयराम रमेश यांनी सांगितलं की, झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी कायम राहील. महाराष्ट्रामध्येही विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी कायम राहील. तर पंजाबमध्ये इंडिया आघाडी नाही आहे. हरियाणामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी एक जागा आम आदमी पक्षाला दिली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत आघाडी कायम राहील, असं मला वाटत नाही. दिल्लीमधील आपच्या काही नेत्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी होणार नाही, असं विधान केलं होतं, असे जयराम रमेश यांनी सांगितले. 

टॅग्स :congressकाँग्रेसAAPआपINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीHaryanaहरयाणाdelhiदिल्लीElectionनिवडणूक 2024