शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

लोकसभेतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, या दोन राज्यांत स्वबळावर निवडणूक लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 18:28 IST

Congress News : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अनपेक्षित यशानंतर काँग्रेसने आपली जुनी ताकद परत मिळवण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील काही काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपैकी दोन राज्यांमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला कडवी टक्कर दिली होती. तसेच इंडिया आघाडीसोबत भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवण्यापासून रोखले होते. तसेच मागच्या दोन लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत जागांची संख्या दुपटीने वाढून ९९ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. तसेच आपली जुनी ताकद परत मिळवण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्यास पक्षाने सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील काही काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपैकी दोन राज्यांमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. काँग्रेस हरियाणा आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत  स्वबळावर लढण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, दिल्ली आणि हरियाणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षासोबत आघाडी होण्याची कुठलीही शक्यता नाही आहे. मात्र महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभेच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी कायम राहील. ज्या राज्यांमधील काँग्रेसच्या नेत्यांना इंडिया आघाडी कायम राहावी, असं वाटेल, तिथे आघाडी कायम राहिली.

काँग्रेस आणि आम आदमी पक्ष हे दोघेही विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षांनी दिल्ली आणि हरियाणामध्ये एकत्र येत निवडणूक लढवली होती. मात्र पंजाबमध्ये दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते. दरम्यान, महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये या वर्षाच्या अखेरीच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तर दिल्लीमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला निवडणुका नियोजित आहेत.  

पुढील विधानसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी कायम राहील का असं विचारलं असता जयराम रमेश यांनी सांगितलं की, झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी कायम राहील. महाराष्ट्रामध्येही विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी कायम राहील. तर पंजाबमध्ये इंडिया आघाडी नाही आहे. हरियाणामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी एक जागा आम आदमी पक्षाला दिली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत आघाडी कायम राहील, असं मला वाटत नाही. दिल्लीमधील आपच्या काही नेत्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी होणार नाही, असं विधान केलं होतं, असे जयराम रमेश यांनी सांगितले. 

टॅग्स :congressकाँग्रेसAAPआपINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीHaryanaहरयाणाdelhiदिल्लीElectionनिवडणूक 2024