शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

लोकसभेतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, या दोन राज्यांत स्वबळावर निवडणूक लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 18:28 IST

Congress News : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अनपेक्षित यशानंतर काँग्रेसने आपली जुनी ताकद परत मिळवण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील काही काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपैकी दोन राज्यांमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला कडवी टक्कर दिली होती. तसेच इंडिया आघाडीसोबत भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवण्यापासून रोखले होते. तसेच मागच्या दोन लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत जागांची संख्या दुपटीने वाढून ९९ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. तसेच आपली जुनी ताकद परत मिळवण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्यास पक्षाने सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुढील काही काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपैकी दोन राज्यांमध्ये स्वबळावर लढण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. काँग्रेस हरियाणा आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत  स्वबळावर लढण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, दिल्ली आणि हरियाणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षासोबत आघाडी होण्याची कुठलीही शक्यता नाही आहे. मात्र महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभेच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडी कायम राहील. ज्या राज्यांमधील काँग्रेसच्या नेत्यांना इंडिया आघाडी कायम राहावी, असं वाटेल, तिथे आघाडी कायम राहिली.

काँग्रेस आणि आम आदमी पक्ष हे दोघेही विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे घटक पक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षांनी दिल्ली आणि हरियाणामध्ये एकत्र येत निवडणूक लढवली होती. मात्र पंजाबमध्ये दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते. दरम्यान, महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये या वर्षाच्या अखेरीच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तर दिल्लीमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला निवडणुका नियोजित आहेत.  

पुढील विधानसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी कायम राहील का असं विचारलं असता जयराम रमेश यांनी सांगितलं की, झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी कायम राहील. महाराष्ट्रामध्येही विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी कायम राहील. तर पंजाबमध्ये इंडिया आघाडी नाही आहे. हरियाणामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी एक जागा आम आदमी पक्षाला दिली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत आघाडी कायम राहील, असं मला वाटत नाही. दिल्लीमधील आपच्या काही नेत्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी होणार नाही, असं विधान केलं होतं, असे जयराम रमेश यांनी सांगितले. 

टॅग्स :congressकाँग्रेसAAPआपINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीHaryanaहरयाणाdelhiदिल्लीElectionनिवडणूक 2024