शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

रोहिंग्यांना फ्लॅट्स नव्हे, डिटेन्शन सेंटर्समध्येच ठेवलं जाणार; मंत्र्याच्या वक्तव्यानंतर, गृहमंत्रालयाचं स्पष्टिकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 17:04 IST

सरकार परराष्ट्रमंत्रालयाच्या माध्यमाने अवैध परदेशी निर्वासितांसंदर्भात संबंधित देशांसोबत चर्चा करत आहे. यामुळे रोहिंग्यांना सध्या असलेल्या ठिकाणीच ठेवण्यासंदर्भात सांगण्यात आले आहे, असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या रोहिंग्या (Rohingya) शरणार्थींना वसविण्यासंदर्भातील वक्तव्याने मोठी खळबळ उडाली होती. आता, यासंदर्भात खुद्द गृहमंत्रालयानेच स्पष्टिकरण दिले आहे. रोहिंग्या शरणार्थी डिटेन्शन सेंटर्समध्येच राहणार, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी, रोहिंग्या शरणार्थींना दिल्लीतील EWS फ्लॅट्समध्ये स्थलांतरित करण्यात येईल, असे हरदीप पुरी यांनी म्हटले होते.

यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या निवेदनात गृह मंत्रालयाने (MHA) म्हटले आहे, की मंत्रालयाने बेकायदेशीर स्थलांतरित रोहिंग्यांना नवी दिल्लीतील बक्करवाला (Bakkarwala) येथील EWS फ्लॅटमध्ये ठेवण्यासंदर्भात कसल्याही प्रकारचे निर्देश दिलेले नाहीत. तसेच, दिल्ली सरकारने रोहिंग्यांना नव्या लोकेशनवर हलविण्याचा प्रस्ताव दिला होता. यावर, रोहिंग्यांना सध्याचे लोकेशन कंचन कुंज (मदनपूर खादर) येथेच ठेवण्यात यावे, असे निर्देश गृहमंत्रालयाने दिल्ली सरकारला दिले आहेत, असे सांगण्यात येत आहे.

एवढेच नाही, तर सरकार परराष्ट्रमंत्रालयाच्या माध्यमाने अवैध परदेशी निर्वासितांसंदर्भात संबंधित देशांसोबत चर्चा करत आहे. यामुळे रोहिंग्यांना सध्या असलेल्या ठिकाणीच ठेवण्यासंदर्भात सांगण्यात आले आहे, असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे. याशिवाय, अवैध परदेशी निर्वासितांना त्यांच्या देशात पाठवेपर्यंत डिटेन्शन सेंटर्समध्येच ठेवण्यात येईल. मात्र, दिल्ली सरकारने अद्याप सध्याचे लोकेशन डिटेन्शन सेंटर म्हणून घोषित केलेले नाही. त्यांनी ते तत्काळ डिटेन्शन सेंटर म्हणून घोषित करावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत, असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

काय म्हणाले होते हरदीप सिंग पुरी?"भारत आश्रय मागणाऱ्या लोकांचे नेहमीच स्वागत करतो. एक ऐतिहासिक निर्णय घेत सर्व रोहिंग्या शरणार्थींना दिल्लीतील बक्करवाला भागातील EWS फ्लॅट्समध्ये शिफ्ट करण्या येईल. त्यांना मूलभूत सुविधा, UNHRC आयडी आणि 24 तास दिल्ली पोलिसांचे संरक्षण देण्यात येईल," अशा आशयाचे ट्विट हरदीप सिंग पुरी यांनी केले होते. त्यांच्या या ट्विटनंतर मोठी खळबळ उडाली होती.

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याdelhiदिल्लीBJPभाजपा