शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

रोहिंग्यांना फ्लॅट्स नव्हे, डिटेन्शन सेंटर्समध्येच ठेवलं जाणार; मंत्र्याच्या वक्तव्यानंतर, गृहमंत्रालयाचं स्पष्टिकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 17:04 IST

सरकार परराष्ट्रमंत्रालयाच्या माध्यमाने अवैध परदेशी निर्वासितांसंदर्भात संबंधित देशांसोबत चर्चा करत आहे. यामुळे रोहिंग्यांना सध्या असलेल्या ठिकाणीच ठेवण्यासंदर्भात सांगण्यात आले आहे, असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या रोहिंग्या (Rohingya) शरणार्थींना वसविण्यासंदर्भातील वक्तव्याने मोठी खळबळ उडाली होती. आता, यासंदर्भात खुद्द गृहमंत्रालयानेच स्पष्टिकरण दिले आहे. रोहिंग्या शरणार्थी डिटेन्शन सेंटर्समध्येच राहणार, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी, रोहिंग्या शरणार्थींना दिल्लीतील EWS फ्लॅट्समध्ये स्थलांतरित करण्यात येईल, असे हरदीप पुरी यांनी म्हटले होते.

यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या निवेदनात गृह मंत्रालयाने (MHA) म्हटले आहे, की मंत्रालयाने बेकायदेशीर स्थलांतरित रोहिंग्यांना नवी दिल्लीतील बक्करवाला (Bakkarwala) येथील EWS फ्लॅटमध्ये ठेवण्यासंदर्भात कसल्याही प्रकारचे निर्देश दिलेले नाहीत. तसेच, दिल्ली सरकारने रोहिंग्यांना नव्या लोकेशनवर हलविण्याचा प्रस्ताव दिला होता. यावर, रोहिंग्यांना सध्याचे लोकेशन कंचन कुंज (मदनपूर खादर) येथेच ठेवण्यात यावे, असे निर्देश गृहमंत्रालयाने दिल्ली सरकारला दिले आहेत, असे सांगण्यात येत आहे.

एवढेच नाही, तर सरकार परराष्ट्रमंत्रालयाच्या माध्यमाने अवैध परदेशी निर्वासितांसंदर्भात संबंधित देशांसोबत चर्चा करत आहे. यामुळे रोहिंग्यांना सध्या असलेल्या ठिकाणीच ठेवण्यासंदर्भात सांगण्यात आले आहे, असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे. याशिवाय, अवैध परदेशी निर्वासितांना त्यांच्या देशात पाठवेपर्यंत डिटेन्शन सेंटर्समध्येच ठेवण्यात येईल. मात्र, दिल्ली सरकारने अद्याप सध्याचे लोकेशन डिटेन्शन सेंटर म्हणून घोषित केलेले नाही. त्यांनी ते तत्काळ डिटेन्शन सेंटर म्हणून घोषित करावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत, असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

काय म्हणाले होते हरदीप सिंग पुरी?"भारत आश्रय मागणाऱ्या लोकांचे नेहमीच स्वागत करतो. एक ऐतिहासिक निर्णय घेत सर्व रोहिंग्या शरणार्थींना दिल्लीतील बक्करवाला भागातील EWS फ्लॅट्समध्ये शिफ्ट करण्या येईल. त्यांना मूलभूत सुविधा, UNHRC आयडी आणि 24 तास दिल्ली पोलिसांचे संरक्षण देण्यात येईल," अशा आशयाचे ट्विट हरदीप सिंग पुरी यांनी केले होते. त्यांच्या या ट्विटनंतर मोठी खळबळ उडाली होती.

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याdelhiदिल्लीBJPभाजपा