शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
2
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
3
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
4
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
5
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
6
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
7
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
8
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
9
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
10
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
11
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
12
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
13
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
14
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
15
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
16
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
17
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
18
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
19
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
20
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

४८, ७० की ९०...भारतात किती तास काम करण्याचा नियम, कंपन्यांच्या मनमानीवर कायदा काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 19:14 IST

कामाच्या वेळेचे नियमन करण्यासाठी देशातील विविध राज्यांमध्ये दुकाने आणि आस्थापना कायदे देखील लागू करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली - इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी काही महिन्यांपूर्वी आठवड्याला ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या या विधानावर बरीच चर्चा झाली. त्यानंतर आता लार्सन अँन्ड टुब्रो कंपनीचे चेअरमन एस.एन सुब्रमण्यम यांनीही पुढे जात कर्मचाऱ्यांनी आठवड्याला ९० तास काम करायला हवं असं म्हटलं. सुब्रमण्यम यांच्या विधानामुळे कामाचे तास आणि कंपन्यांमधील वर्क कल्चर यावरून पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला आहे. भारतात कामाच्या तासाबाबत कायदा काय आहे, ओव्हरटाईम केल्यानंतर कंपनीकडून पैसे न मिळाल्यास कुठे तक्रार करायची, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपनीवर काय कारवाई केली जाते हे जाणून घेऊया.

भारतीय कायद्यानुसार, कामाचे तास निर्धारित केलेले आहेत. भारतात कर्मचाऱ्याला एका दिवसाला कमीत कमी ८ ते ९ तास काम करायला लावलं जाऊ शकते. आठवड्याला एकूण कामाचे तास ४८ हून अधिक असू नयेत म्हणजे ६ दिवसाला ४८ तासापेक्षा जास्त काम नको. जर कंपनी कर्मचाऱ्याकडून ओव्हरटाईम करून घेत असेल तर तेदेखील आठवड्याला ६० तासापेक्षा जास्त नकोत. कायद्यानुसार, कामावेळी ५ तासांचे काम केल्यानंतर १ तासाचा ब्रेक देणे गरजेचे आहे. 

कामाच्या वेळेचे नियमन करण्यासाठी देशातील विविध राज्यांमध्ये दुकाने आणि आस्थापना कायदे देखील लागू करण्यात आले आहेत. हा कायदा कार्यालये, दुकाने आणि उत्पादन युनिटमध्ये काम करणाऱ्यांना लागू आहे. याअंतर्गत दररोज नऊ तास काम निश्चित करण्यात आले आहे पण दर आठवड्याला ४८ तासांपेक्षा जास्त काम करता येत नाही. कंपनी कायदा १९४८ च्या कलम ५१ मध्ये कोणत्याही प्रौढ कामगाराला आठवड्यातून ४८ तासांपेक्षा जास्त काळ कोणत्याही कंपनी किंवा फॅक्टरीत काम करण्याची आवश्यकता नाही ना तशी परवानगी देण्यात आली आहे. त्याच कायद्याच्या कलम ५५ मध्ये असं म्हटलंय, कर्मचारी सलग पाच तासांपेक्षा जास्त काम करणार नाहीत. पाच तास काम केल्यानंतर, किमान एक तास विश्रांती आवश्यक आहे असं सर्वोच्च न्यायालयाचे वकील अश्विनी कुमार दुबे यांनी सांगितले.

ओव्हरटाइम केल्यास दुप्पट मानधन

दुकाने आणि आस्थापनांनी ओव्हरटाइमसाठी पैसे द्यावेत. जर एखादा कर्मचारी दिवसातून नऊ तासांपेक्षा जास्त किंवा आठवड्यातून ४८ तासांपेक्षा जास्त काम करत असेल, तर तो सामान्य वेतनाच्या दुप्पट दराने ओव्हरटाइम मिळण्यास पात्र असेल असं कलम ५९ मध्ये असे म्हटले आहे. त्याच वेळी, दुकाने आणि आस्थापना कायदा आणि कारखाने कायदा दोन्ही आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर लागू आहेत.

दरम्यान, कंपनी कायदा, १९४८ च्या कलम ९२ नुसार, जर कोणताही व्यवस्थापक किंवा मालक या कायद्यातील कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन करत असेल तर त्याला दोन वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. त्याला १ लाख रुपयांपर्यंतचा दंडही होऊ शकतो. त्याला एकाच वेळी शिक्षा आणि दंड दोन्हीही होऊ शकतात. जर एखाद्या कर्मचाऱ्याला जास्त काम करूनही ओव्हरटाइम मिळत नसेल तर तो कामगार न्यायालयात किंवा कामगार आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करू शकतो. अशा परिस्थितीत  कंपनीविरुद्ध कारखाने कायदा आणि वेतन कायद्यांतर्गत कारवाई केली जाऊ शकते. एवढेच नाही तर जर कंपनीने वारंवार कायद्याचे उल्लंघन केले तर तिचा परवाना देखील रद्द केला जाऊ शकतो असंही वकील विनित जिंदल यांनी सांगितले आहे.