शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

निकालानंतर लालूंनी नेल्सन मंडेला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर केली स्वत:ची तुलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 18:14 IST

चारा घोटाळ प्रकरणात दोषी ठरल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी या संपूर्ण प्रकरणात कारस्थान रचून आपल्याला अडकवण्यात आल्याचा आरोप केला आहे.

ठळक मुद्देहा निकाल म्हणजे माझ्या विरोधातील पक्षपाती प्रचाराचा भाग आहे.शक्तीशाली लोक आणि शक्तीशाली वर्ग नेहमीच समाजामध्ये दुही निर्माण करतात.

रांची - चारा घोटाळ प्रकरणात दोषी ठरल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी या संपूर्ण प्रकरणात कारस्थान रचून आपल्याला अडकवण्यात आल्याचा आरोप केला आहे. लालूंनी मार्टिन लूथर किंग,  नेल्सन मंडेला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या जगातील महान नेत्यांबरोबर स्वत:ची तुलना केली. मार्टिन लूथर किंग,  नेल्सन मंडेला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या प्रयत्नात अपयशी ठरले असते तर इतिहासाने त्यांना खलनायक ठरवले असते. आजही पक्षपाती, वर्णभेद आणि जातीय मानसिकतेच्या लोकांसाठी ते खलनायकच आहेत असे टि्वट लालू यादव यांनी केले. 

 

हा निकाल म्हणजे माझ्या विरोधातील पक्षपाती प्रचाराचा भाग आहे. आपला सत्यावर पूर्ण विश्वास आहे असे टि्वटमध्ये लालू यादव यांनी म्हटले आहे. शक्तीशाली लोक आणि शक्तीशाली वर्ग नेहमीच समाजामध्ये दुही निर्माण करतात. जेव्हा कोणी छोटया वर्गातला माणूस त्या विरोधात आवाज उठवतो तेव्हा त्याला शिक्षा दिली जाते असे लालूंनी एक टि्वटमध्ये म्हटले आहे. लालू तुमच्या मार्गातला मोठा अडसर आहे पण सहजासहजी तुम्ही त्याला पराभूत करु शकत नाही. या धर्मयुद्धात लालू एकटा नसून संपूर्ण बिहार लालूंसोबत आहे हे लक्षात ठेवा असे लालूंनी म्हटले आहे. 

 

 

 

 

तीन जानेवारीला लालूंना सुनावणार शिक्षा चारा घोटाळयाच्या प्रलंबित असलेल्या चार खटल्यांपैकी एका प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवले. येत्या तीन जानेवारीला त्यांच्या शिक्षेवर सुनावणी होईल. खच्चून भरलेल्या कोर्टरुममध्ये विशेष सीबीआय न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी निकाल सुनावला. 

22 आरोपींपैकी सात जणांची निर्दोष सुटका करत लालूंसह 15 जणांना दोषी ठरवले. 1994 ते 1996 दरम्यान देवगड जिल्ह्याच्या कोषागारातून 84.5 लाख रुपये काढून घोटाळा  केल्या प्रकरणात न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले. निकाल आल्यानंतर लगेचच पोलिसांनी लालूंसह सर्व आरोपींना ताब्यात घेतले. बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रांसह अन्य सात आरोपींची निर्दोष मुक्ततता केली. 

निकाल येण्याआधी लालुंनी देशाच्या न्यायव्यवस्थेबद्दल आदर व्यक्त केला होता. आम्ही देशाच्या न्याय व्यवस्थेचा आदर करतो, आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्ही भाजपाची कारस्थाने यशस्वी होऊ देणार नाही. 2 जी घोटाळा, अशोक चव्हाणांच्या बाबतीत दिलासा देणारा जो निकाल आला तसेच माझ्या बाबतीत घडेल असे लालू म्हणाले. चारा घोटाळयात लालू यांच्या विरोधात एकूण पाच खटले दाखल असून त्यातील तीन प्रकरणे अजून प्रलंबित आहेत. 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव