शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

निकालानंतर लालूंनी नेल्सन मंडेला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर केली स्वत:ची तुलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 18:14 IST

चारा घोटाळ प्रकरणात दोषी ठरल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी या संपूर्ण प्रकरणात कारस्थान रचून आपल्याला अडकवण्यात आल्याचा आरोप केला आहे.

ठळक मुद्देहा निकाल म्हणजे माझ्या विरोधातील पक्षपाती प्रचाराचा भाग आहे.शक्तीशाली लोक आणि शक्तीशाली वर्ग नेहमीच समाजामध्ये दुही निर्माण करतात.

रांची - चारा घोटाळ प्रकरणात दोषी ठरल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी या संपूर्ण प्रकरणात कारस्थान रचून आपल्याला अडकवण्यात आल्याचा आरोप केला आहे. लालूंनी मार्टिन लूथर किंग,  नेल्सन मंडेला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या जगातील महान नेत्यांबरोबर स्वत:ची तुलना केली. मार्टिन लूथर किंग,  नेल्सन मंडेला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या प्रयत्नात अपयशी ठरले असते तर इतिहासाने त्यांना खलनायक ठरवले असते. आजही पक्षपाती, वर्णभेद आणि जातीय मानसिकतेच्या लोकांसाठी ते खलनायकच आहेत असे टि्वट लालू यादव यांनी केले. 

 

हा निकाल म्हणजे माझ्या विरोधातील पक्षपाती प्रचाराचा भाग आहे. आपला सत्यावर पूर्ण विश्वास आहे असे टि्वटमध्ये लालू यादव यांनी म्हटले आहे. शक्तीशाली लोक आणि शक्तीशाली वर्ग नेहमीच समाजामध्ये दुही निर्माण करतात. जेव्हा कोणी छोटया वर्गातला माणूस त्या विरोधात आवाज उठवतो तेव्हा त्याला शिक्षा दिली जाते असे लालूंनी एक टि्वटमध्ये म्हटले आहे. लालू तुमच्या मार्गातला मोठा अडसर आहे पण सहजासहजी तुम्ही त्याला पराभूत करु शकत नाही. या धर्मयुद्धात लालू एकटा नसून संपूर्ण बिहार लालूंसोबत आहे हे लक्षात ठेवा असे लालूंनी म्हटले आहे. 

 

 

 

 

तीन जानेवारीला लालूंना सुनावणार शिक्षा चारा घोटाळयाच्या प्रलंबित असलेल्या चार खटल्यांपैकी एका प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवले. येत्या तीन जानेवारीला त्यांच्या शिक्षेवर सुनावणी होईल. खच्चून भरलेल्या कोर्टरुममध्ये विशेष सीबीआय न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी निकाल सुनावला. 

22 आरोपींपैकी सात जणांची निर्दोष सुटका करत लालूंसह 15 जणांना दोषी ठरवले. 1994 ते 1996 दरम्यान देवगड जिल्ह्याच्या कोषागारातून 84.5 लाख रुपये काढून घोटाळा  केल्या प्रकरणात न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले. निकाल आल्यानंतर लगेचच पोलिसांनी लालूंसह सर्व आरोपींना ताब्यात घेतले. बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रांसह अन्य सात आरोपींची निर्दोष मुक्ततता केली. 

निकाल येण्याआधी लालुंनी देशाच्या न्यायव्यवस्थेबद्दल आदर व्यक्त केला होता. आम्ही देशाच्या न्याय व्यवस्थेचा आदर करतो, आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्ही भाजपाची कारस्थाने यशस्वी होऊ देणार नाही. 2 जी घोटाळा, अशोक चव्हाणांच्या बाबतीत दिलासा देणारा जो निकाल आला तसेच माझ्या बाबतीत घडेल असे लालू म्हणाले. चारा घोटाळयात लालू यांच्या विरोधात एकूण पाच खटले दाखल असून त्यातील तीन प्रकरणे अजून प्रलंबित आहेत. 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव