शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

राहुल गांधींच्या घोषणेनंतर काँग्रेस सोशल मीडियावरही झाला सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 06:09 IST

प्रत्येक गरीबाला किमान उत्पन्नाची हमी देणारी योजना लागू करू अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केल्यानंतर लगेचच काँग्रेसने समाज माध्यमांवर त्यावर मोहीमच सुरू केली आहे.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : प्रत्येक गरीबाला किमान उत्पन्नाची हमी देणारी योजना लागू करू अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केल्यानंतर लगेचच काँग्रेसने समाज माध्यमांवर त्यावर मोहीमच सुरू केली आहे. या योजनेवरून भाजपने हल्ला करायच्या आधी काँग्रेसला त्याचा एवढा प्रचार करायचा आहे की भाजपचा हल्ला बोथट व्हावा.राहुल गांधी यांनी स्वत: व्यासपीठावर ती घोषणा केली व लगेचच फेसबुकवर पोस्ट केले की ‘आमचे लक्षावधी बंधू-भगिनी गरीबीशी संघर्ष करीत असेपर्यंत आम्ही नवा भारत घडवू शकत नाही. २०१९ मध्ये आम्ही केंद्रात सत्तेवर आलो तर काँग्रेस किमान उत्पन्न हमी योजना सुरू करण्यास बांधिल आहे. या योजनेमुळे प्रत्येक प्रत्येक गरीबाला मदत मिळेल आणि गरीबी नष्ट करायला मदत मिळेल. हे आमचे आश्वासन आणि दृष्टिकोणही आहे.’ या पोस्टनंतर पी. चिदंबरम यांनी टिष्ट्वटरवर राहुल यांची ही घोषणा ऐतिहासिक असल्याचे सांगून ही योजना गरीबांसाठी गेमचेंजर म्हटले. ते म्हणतात, ‘युबीआयबद्दल गेल्या दोन वर्षांत चर्चा झाली. आता ती स्वीकारण्याची वेळ आली आहे म्हणजे गरीबांसाठी ती राबवता येऊ शकेल. याचा अधिक तपशील काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यात देईल.’चिदंबरम यांनी आकडेवारी देऊन लिहिले की, ‘१.४८ लाख लोकांना २००४ ते २०१४ दरम्यान दारिद्र्य रेषेवर आणले गेले. आता गरीबी मूळापासून काढून टाकण्याची वेळ आली आहे. काँग्रेस राहुल गांधी यांचे आश्वासन पूर्ण करील.’ राहुल आणि चिदंबरम यांच्या पोस्ट आणि टिष्ट्वटने हे स्पष्ट केले की, काँग्रेस इंदिरा गांधी यांच्या मार्गांनी प्रवास करण्यास कटिबद्ध आहे. इंदिरा गांधी यांनी ‘गरीबी हटाओ’ घोषणा केली होती. आज काँग्रेस पुन्हा तेच आश्वासन सत्यात आणण्यासाठी २०१९ मध्ये विरोधकांशी दोन हात करील.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस