शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

राहुल गांधी यांचा बंगला कोणत्या खासदाराला?; आवराआवरी अन् सरकारचीही तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 08:53 IST

बंगला सोडण्यास सांगणाऱ्या मोदी सरकारकडूनही या बंगल्याचे तातडीने वाटप केले जाईल.

- सुनील चावके नवी दिल्ली : खासदारकी रद्द झाल्यामुळे चर्चेत आलेला ल्युटन्स दिल्लीतील १२, तुघलक लेन बंगला सोडण्यासाठी राहुल गांधी तत्परता दाखवीत असताना हा बंगला रिकामा होताच वेळ न दवडता नव्या व्यक्तीला त्याचे वाटप करण्यासाठी लोकसभेची आवास समितीही तत्पर असल्याचे सांगण्यात येत आहे.

राहुल गांधी १९ वर्षांपूर्वी पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले, त्यावेळी त्यांना २००५ साली केंद्रातील मनमोहन सिंग सरकारने एसपीजी सुरक्षेच्या नावाखाली कॅबिनेटमंत्र्यांना दिला जातो त्या श्रेणीतील १२, तुघलक लेन बंगला दिला होता. राहुल गांधी यांच्या बंगल्यातील सामानाची बांधाबांध सुरू झाली असून, ते  येत्या काही दिवसांतच बंगला सोडणार असल्याचे समजते. बंगला सोडण्यास सांगणाऱ्या मोदी सरकारकडूनही या बंगल्याचे तातडीने वाटप केले जाईल. खासदार सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समिती विलंब न लावता राहुल यांचा बंगला कोणत्या खासदाराला देते, याकडे लक्ष लागले आहे. 

या बंगल्यांकडे कानाडोळा का?

दिल्लीत सध्या गुलामनबी आझाद, आनंद शर्मा, लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, डॉ. सुब्रमण्यम स्वामी ही मंडळी संसदेच्या सभागृहाचे सदस्य नसताना सरकारी बंगल्यांमध्ये राहत आहेत. त्यांच्यापैकी काहींना अतिरेक्यांकडून धोका असल्याच्या कारणाखाली बंगले देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर राजस्थानचे आमदार असलेले काँग्रेसचे सचिन पायलट यांचाही ल्युटन्समधील बंगला शाबूत आहे. राहुल यांना बंगला सोडण्यासाठी निर्देश देताना या नेत्यांकडे कानाडोळा का, असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस