शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर चिदंबरम म्हणाले; आम्ही अवश्य दिवे लावू, पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 17:17 IST

लोकांचे दु:ख आणि त्यांच्यावर आलेल्या आर्थिक संकटबद्दल मोदींनी चकार शब्द काढला नाही. तसेच भविष्याची काय योजना आहे. लॉकडाऊननंतर काय, यावर मोदी काहीही बोलले नाही. मोदींनी केवळ सर्वकाही ठीक असल्याचे चित्र निर्माण केल्याची टीका थरूर यांनी केली.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरस विरुद्ध लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना पुन्हा एकदा एकत्र येण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदींनी देशवासियांना आवाहन केले की, रविवारी संध्याकाळी ९ वाजून ९ मिनिटांनी सर्वांनी घरी दिवे लावावे. मोदींच्या या आवाहनावर राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस खासदार चिदंबरम यांनी रविवारी आपण दिवे लावण्यास तयार असल्याचे म्हटले. तसेच तुम्हाला अर्थतज्ज्ञांचे ऐकावे लागेल, अस आवाहनही मोदींना केले.

पी. चिंदबरम यांनी ट्विट केले की, आम्ही तुमचं ऐकणार असून ५ एप्रिल रोजी दिवे लावणार आहोत. मात्र त्या बदल्यात तुम्ही अर्थतज्ज्ञांचे म्हणणे ऐकावे. तुम्ही आज गरीबांसाठी पॅकेजची घोषणा कराल, अशी आम्हाला आशा होती. ज्याचा विसर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पडला होता. चिदंबरम पुढे म्हणाले की, काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मदतीची गरज आहे. भलेही तो उद्योग क्षेत्रातील असो वा मजूर. आता आर्थिक शक्तीला रिस्टार्ट करण्याची आवश्यकता आहे. तसे संकेत देऊन त्यासाठी कठोर निर्णय घेण्याची गरज चिदंबरम यांनी व्यक्त केली.

पी. चिदंबरम यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसनेते शशी थरूर यांनीही मोदींवर निशाना साधला. आज पुन्हा एकदा प्रधान ‘शोमॅन’चे भाषण ऐकले. लोकांचे दु:ख आणि त्यांच्यावर आलेल्या आर्थिक संकटबद्दल मोदींनी चकार शब्द काढला नाही. तसेच भविष्याची काय योजना आहे. लॉकडाऊननंतर काय, यावर मोदी काहीही बोलले नाही. मोदींनी केवळ सर्वकाही ठीक असल्याचे चित्र निर्माण केल्याची टीका थरूर यांनी केली.

कोरोनाच्या संकटाविरुद्ध लढाईला प्रकाशित करत हे तेज आपल्या चारही दिशांना पसरवायचं आहे. ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता मला तुमच्या सर्वांची ९ मिनिटं हवी आहेत. घरातील सर्व लाईट्स बंद करा, दरवाजे आणि बालकनीत उभं राहून दिवा, मेणबत्ती, टॉर्च अथवा मोबाईलची फ्लॅश लाईट सुरु करा. प्रकाशाच्या महाशक्तीमुळे आपण या युद्धाशी लढतोय आपण एकटे नाही तर १३० कोटी जनता एकाच संकल्पतेने लढतोय हे कळेल,'' असे आवाहन मोदींनी केले आहे.