शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर चिदंबरम म्हणाले; आम्ही अवश्य दिवे लावू, पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 17:17 IST

लोकांचे दु:ख आणि त्यांच्यावर आलेल्या आर्थिक संकटबद्दल मोदींनी चकार शब्द काढला नाही. तसेच भविष्याची काय योजना आहे. लॉकडाऊननंतर काय, यावर मोदी काहीही बोलले नाही. मोदींनी केवळ सर्वकाही ठीक असल्याचे चित्र निर्माण केल्याची टीका थरूर यांनी केली.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरस विरुद्ध लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना पुन्हा एकदा एकत्र येण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदींनी देशवासियांना आवाहन केले की, रविवारी संध्याकाळी ९ वाजून ९ मिनिटांनी सर्वांनी घरी दिवे लावावे. मोदींच्या या आवाहनावर राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस खासदार चिदंबरम यांनी रविवारी आपण दिवे लावण्यास तयार असल्याचे म्हटले. तसेच तुम्हाला अर्थतज्ज्ञांचे ऐकावे लागेल, अस आवाहनही मोदींना केले.

पी. चिंदबरम यांनी ट्विट केले की, आम्ही तुमचं ऐकणार असून ५ एप्रिल रोजी दिवे लावणार आहोत. मात्र त्या बदल्यात तुम्ही अर्थतज्ज्ञांचे म्हणणे ऐकावे. तुम्ही आज गरीबांसाठी पॅकेजची घोषणा कराल, अशी आम्हाला आशा होती. ज्याचा विसर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पडला होता. चिदंबरम पुढे म्हणाले की, काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मदतीची गरज आहे. भलेही तो उद्योग क्षेत्रातील असो वा मजूर. आता आर्थिक शक्तीला रिस्टार्ट करण्याची आवश्यकता आहे. तसे संकेत देऊन त्यासाठी कठोर निर्णय घेण्याची गरज चिदंबरम यांनी व्यक्त केली.

पी. चिदंबरम यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसनेते शशी थरूर यांनीही मोदींवर निशाना साधला. आज पुन्हा एकदा प्रधान ‘शोमॅन’चे भाषण ऐकले. लोकांचे दु:ख आणि त्यांच्यावर आलेल्या आर्थिक संकटबद्दल मोदींनी चकार शब्द काढला नाही. तसेच भविष्याची काय योजना आहे. लॉकडाऊननंतर काय, यावर मोदी काहीही बोलले नाही. मोदींनी केवळ सर्वकाही ठीक असल्याचे चित्र निर्माण केल्याची टीका थरूर यांनी केली.

कोरोनाच्या संकटाविरुद्ध लढाईला प्रकाशित करत हे तेज आपल्या चारही दिशांना पसरवायचं आहे. ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता मला तुमच्या सर्वांची ९ मिनिटं हवी आहेत. घरातील सर्व लाईट्स बंद करा, दरवाजे आणि बालकनीत उभं राहून दिवा, मेणबत्ती, टॉर्च अथवा मोबाईलची फ्लॅश लाईट सुरु करा. प्रकाशाच्या महाशक्तीमुळे आपण या युद्धाशी लढतोय आपण एकटे नाही तर १३० कोटी जनता एकाच संकल्पतेने लढतोय हे कळेल,'' असे आवाहन मोदींनी केले आहे.