शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

कारगिल विजयाची २१ वर्षे! पाकिस्तानला पिटाळले आता लडाखमधून चीनलाही हाकलू या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 05:56 IST

देदीप्यमान कारगिल विजयाची २१ वर्षे पूर्ण

निनाद देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कारगील युद्धात भारताने विजय मिळविला, त्याला रविवार, २६ जुलैला २१ वर्षे पूर्ण होत आहेत. या २१ वर्षांत पाकिस्तानने भारतात अनेक अतिरेकी कारवाया केल्या, परंतु रणांगणात भारत पाकिस्तानला कायम वरचढ ठरला आहे. त्यामुळे पाठीमागून हल्ला करण्याचीच पाकची निती आहे. आता पाकिस्तानपेक्षा भारताला खराखुरा सामना करावा लागणार आहे चीनशीच.

चीनने आता लडाख भगत जशी घुसखोरी केली, तशीच पाकिस्तानने १९९९ साली कारगिलमध्ये केली होती. कारगिल-द्रास सेक्टरमध्ये लढल्या गेलेल्या चौथ्या युद्धात २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. या संपूर्ण मोहिमेला आॅपरेशन विजय नाव दिले होते. हिवाळ्यातील महिन्यांमध्ये पाकिस्तान घुसखोरी करीत असल्याचे मेंढपाळांना दिसले. पाकने १३० ते २०० चौरस किलोमीटर प्रदेश ताब्यात घेतला होता.

घुसखोरांना परत माघारी धाडण्यासाठी लष्कराने ‘आॅपरेशन विजय’ मोहीम आखली. डोंगराळ प्रदेश असल्याने भारतीय जवांना अनेक अडचणी आल्या. मात्र, बोफोर्स तोफांचा मारा करत तसेच थेट उंचपर्वत रांगा सर करत भारतीय जवानांनी हे युद्ध जिंकले. भारतीय वायुसेनेकडूनही ‘आॅपरेशन सफेद सागर’ सुरू केले. या आॅपरेशनाद्वारे पायदळ सैन्याची ने-आण करण्याची मोठी भूमिका वायुसेनेने निभावली. मोठे बॉम्ब वाहून नेण्यासाठी लागणारे मोठे विमानतळ, भौगोलिक परिस्थितीमुळे नसतांनाही वायुदलाने मोठी भूमिका बजावली.संरक्षण दलात आमूलाग्र बदलया युद्धानंतर आढावा समितीच्या शिफारशीनुसार देशाच्या संरक्षण दलांत अनेक बदल केले. मात्र, आता सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांचा विकास करावा लागेल. आतापर्यंतचे परराष्ट्र धोरण पास्किस्तानला केंद्रबिंदू धरून होते. मात्र, पाकिस्तानपेक्षा चीन ही भारताची खरी दुखरी नस असून त्यादृष्टीने व्यवरचनात्मक आणि राजनैतिक पातळीवर बदल करने गरजेचे आहे.पाकिस्तानचे सैन्य भारतात घुसलेच कसे, असा प्रश्न विचारत त्या वेळी गुप्तचर विभागावर दोष ठेवण्यात आले होते. भारतीय जवानांनी भूभाग परत मिळवला. मात्र, त्यानंतर के. सुब्रम्हण्यम समितीने परराष्ट्र व संरक्षण धोरणात अनेक बदल सुचवले. त्यानुसार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व चीफ आॅफ डिफेन्स स्टाफची निर्मिती झाली. गुप्तचर यंंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी काही बदल केले गेले.

पण आता पाकिस्तान नव्हे, तर चीन शत्रू म्हणून सीमेवर उभा आहे. त्या दृष्टीने संरक्षण सिद्धतेत वाढ करण्याची गरज आहे. भारताने गेल्या काही वर्षात फॉरवर्ड डिप्लोमसी अंगीकारली आहे. पाकला सडेतोड उत्तर दिले. मात्र, आता हीच भूमिका चीनबाबत घ्यायची आहे. लष्करी क्षमतांच्या तुलनेत चीन भारतापेक्षा बराच पुढे आहे. त्यामुळे युध्दाची तयारी ठेवत भारताने आंतराष्ट्रीय स्तरावर चीनच्या व्यूवरचनेचा अभ्यास करून त्यांना शह द्यावा लागणार आहे.

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनchinaचीनPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान