शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कारगिल विजयाची २१ वर्षे! पाकिस्तानला पिटाळले आता लडाखमधून चीनलाही हाकलू या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 05:56 IST

देदीप्यमान कारगिल विजयाची २१ वर्षे पूर्ण

निनाद देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कारगील युद्धात भारताने विजय मिळविला, त्याला रविवार, २६ जुलैला २१ वर्षे पूर्ण होत आहेत. या २१ वर्षांत पाकिस्तानने भारतात अनेक अतिरेकी कारवाया केल्या, परंतु रणांगणात भारत पाकिस्तानला कायम वरचढ ठरला आहे. त्यामुळे पाठीमागून हल्ला करण्याचीच पाकची निती आहे. आता पाकिस्तानपेक्षा भारताला खराखुरा सामना करावा लागणार आहे चीनशीच.

चीनने आता लडाख भगत जशी घुसखोरी केली, तशीच पाकिस्तानने १९९९ साली कारगिलमध्ये केली होती. कारगिल-द्रास सेक्टरमध्ये लढल्या गेलेल्या चौथ्या युद्धात २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला. या संपूर्ण मोहिमेला आॅपरेशन विजय नाव दिले होते. हिवाळ्यातील महिन्यांमध्ये पाकिस्तान घुसखोरी करीत असल्याचे मेंढपाळांना दिसले. पाकने १३० ते २०० चौरस किलोमीटर प्रदेश ताब्यात घेतला होता.

घुसखोरांना परत माघारी धाडण्यासाठी लष्कराने ‘आॅपरेशन विजय’ मोहीम आखली. डोंगराळ प्रदेश असल्याने भारतीय जवांना अनेक अडचणी आल्या. मात्र, बोफोर्स तोफांचा मारा करत तसेच थेट उंचपर्वत रांगा सर करत भारतीय जवानांनी हे युद्ध जिंकले. भारतीय वायुसेनेकडूनही ‘आॅपरेशन सफेद सागर’ सुरू केले. या आॅपरेशनाद्वारे पायदळ सैन्याची ने-आण करण्याची मोठी भूमिका वायुसेनेने निभावली. मोठे बॉम्ब वाहून नेण्यासाठी लागणारे मोठे विमानतळ, भौगोलिक परिस्थितीमुळे नसतांनाही वायुदलाने मोठी भूमिका बजावली.संरक्षण दलात आमूलाग्र बदलया युद्धानंतर आढावा समितीच्या शिफारशीनुसार देशाच्या संरक्षण दलांत अनेक बदल केले. मात्र, आता सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांचा विकास करावा लागेल. आतापर्यंतचे परराष्ट्र धोरण पास्किस्तानला केंद्रबिंदू धरून होते. मात्र, पाकिस्तानपेक्षा चीन ही भारताची खरी दुखरी नस असून त्यादृष्टीने व्यवरचनात्मक आणि राजनैतिक पातळीवर बदल करने गरजेचे आहे.पाकिस्तानचे सैन्य भारतात घुसलेच कसे, असा प्रश्न विचारत त्या वेळी गुप्तचर विभागावर दोष ठेवण्यात आले होते. भारतीय जवानांनी भूभाग परत मिळवला. मात्र, त्यानंतर के. सुब्रम्हण्यम समितीने परराष्ट्र व संरक्षण धोरणात अनेक बदल सुचवले. त्यानुसार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व चीफ आॅफ डिफेन्स स्टाफची निर्मिती झाली. गुप्तचर यंंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी काही बदल केले गेले.

पण आता पाकिस्तान नव्हे, तर चीन शत्रू म्हणून सीमेवर उभा आहे. त्या दृष्टीने संरक्षण सिद्धतेत वाढ करण्याची गरज आहे. भारताने गेल्या काही वर्षात फॉरवर्ड डिप्लोमसी अंगीकारली आहे. पाकला सडेतोड उत्तर दिले. मात्र, आता हीच भूमिका चीनबाबत घ्यायची आहे. लष्करी क्षमतांच्या तुलनेत चीन भारतापेक्षा बराच पुढे आहे. त्यामुळे युध्दाची तयारी ठेवत भारताने आंतराष्ट्रीय स्तरावर चीनच्या व्यूवरचनेचा अभ्यास करून त्यांना शह द्यावा लागणार आहे.

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनchinaचीनPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवान