शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनंतर गडकरींनाही कळले नेहरुंचे महत्त्व 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 05:23 IST

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पं. नेहरू आणि अटलबिहारी हे भारताच्या लोकशाहीचे आदर्श नेता होते, असे सांगितले.

- विकास झाडे

नवी दिल्ली : स्वातंत्र्यादिनी पं. नेहरुंचे देश स्मरण करतो असे वक्तव्य करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशालाच आश्चर्याचा धक्का दिला. लगेच तीन दिवसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नेहरुंबद्दल तीन वेळा गौरवोद्वार काढले, त्यामुळे भाजपच्या मानसिकतेत परिवर्तन झाले की उत्तर प्रदेश निवडणुका समोर ठेवून टाकलेले फासे आहेत यावर राजधानी दिल्लीत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

चुकीच्या गोष्टीला पंडित नेहरुंना जबाबदार धरून आपली प्रतिमा उजळ दाखविण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे मोदी यांना स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर पहिल्यांदा पं. नेहरुंचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आठवले, तर दोन दिवसांपूर्वी न्यूज नेशनच्या कार्यक्रमात राजकारणावर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पं. नेहरू आणि अटलबिहारी हे भारताच्या लोकशाहीचे आदर्श नेता होते, असे सांगितले.

लोकमताविरोधात जाऊ शकत नाहीत - अशोक चव्हाणपंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पं. नेहरुंबाबत गौरवोद्गार काढलेत हे बदल स्वागतार्ह आहे. शेवटी नेहरू-गांधी कुटुंबीयांबाबत जे लोकमत आहे, त्याविरोधात किती दिवस हे नेते तग धरू शकले असते. गांधी आणि नेहरुंच्या विचाराला पर्याय नाही हे मोदी, गडकरींना कळून चुकले, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू