शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : सोशल डिस्टंसिंगचे तीन-तेरा, मुंबईनंतर आता दिल्लीतही हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले मजूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 19:49 IST

दिवसागणिक देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यातच विविध राज्यांत अडकूण पडलेले मजूरही लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांचीही डोकेदुखी वाढली आहे.

ठळक मुद्देमुंबईनंतर आज दिल्लीतही हजारोंच्या संख्येने मजुरांनी यमुना नदीच्या काठावर गर्दी केली होतीया मजुरांना फळे देऊन दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या शेल्टर होममध्ये नेण्याचा प्रयत्न सुरू आहेअशा प्रकारे लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन होत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारांचीही डोकेदुखी वाढली आहे

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडॉऊनमुळे देशाच्या अनेक भागांत लोक जिथल्या तिथेच अडकून पडले होते.  सरकारने जारी केलेला 21 दिवसांचा लॉकडाऊन पुन्हा 3 मेपर्यंत वाढवला. यामुळे या मजुरांची चिंता आणि भीती वाढली आहे. या काळात हाताला कामही नाही. यामुळे यांच्यावर उपासमारीचीही वेळ आली आहे. परिणामी हे मजूर आता आपल्या घराकडे जाण्यासाठी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरू लागले आहेत. असाच प्रकार मुंबईतील वांद्रा रेल्वेस्टेशननंतर आज (बुधवारी) दिल्लीतही बघायला मिळाला. येथे हजारोंच्या संख्येने मजुरांनी यमुना नदीच्या काठावर गर्दी केली होती.

मुंबई पाठोपाठ आता दिल्लीतही सोशल डिस्टंसिंगचे तीन-तेरा वाजताना दिसत आहेत. येथेही हजारोंच्या संख्येने मजूर रस्त्यावर उतरले आहेत. येथील यमुना नदीच्या काठावर हे सर्व मजूर एकत्र आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या मजुरांना फळे देऊन दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या शेल्टर होममध्ये नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे मजूर आपापल्या राज्यात जाण्यासाठी जमले आहेत, की आणखी काही कारणाने एकत्र आले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, येथे सोशल डिस्टंसिंगचे पार तीन-तेरा वाजताना दिसत आहे. 

दिवसागणिक देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यातच विविध राज्यांत अडकूण पडलेले मजूरही लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांचीही डोकेदुखी वाढली आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1118 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 39 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 11933 वर पोहोचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 392 वर गेला आहे. तसेच 1344 जण कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी गेले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीIndiaभारतMumbaiमुंबईLabourकामगार