शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

देशातील दुर्लक्षित घटकांच्या सुरक्षेसाठी काँग्रेस कटीबद्ध : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 10:35 IST

राहुल यांनी वायनाड लोकसभा मतदार संघातून तब्बल ४.३१ लाख मतांच्या फरकाने विजय मिळवला. परंतु, काँग्रेसचा गड समजला जाणाऱ्या अमेठी मतदार संघातून राहुल यांचा पराभव झाला आहे. अमेठीतून स्मृती इराणी यांनी विजय मिळवला.

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी वायनाड मतदार संघातील मतदारांचे आभार मानले. तुम्ही सर्वांनी मला प्रचंड बहुमताने निवडून दिले. हा विजय अद्वितीय होता. यावेळी राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधला. विद्यमान सरकार देशात द्वेष पसरवत आहे. परंतु, देशातील कमजोर वर्गाला मोदींच्या चुकींच्या धोरणांपासून वाचविण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे राहुल यांनी म्हटले.

मोदी सरकार देशात द्वेष पसरवत आहे. परंतु, काँग्रेसला माहित आहे, द्वेष संपविण्यासाठी केवळ प्रेमाची गरज आहे. देशातील कमजोर घटकांना वाचविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. मी तुमचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी तयार असून वायनाडचा विकास करण्यासाठी सज्ज असल्याचे राहुल यांनी म्हटले. राहुल दोन दिवसाच्या वायनाड दौऱ्यावर आहेत.

राहुल यांनी वायनाड लोकसभा मतदार संघातून तब्बल ४.३१ लाख मतांच्या फरकाने विजय मिळवला. परंतु, काँग्रेसचा गड समजला जाणाऱ्या अमेठी मतदार संघातून राहुल यांचा पराभव झाला आहे. अमेठीतून स्मृती इराणी यांनी विजय मिळवला.

राहुल वायनाड येथे पोहोचल्यानंतर हजारो कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी प्रथमच सर्वजनिक ठिकाणी उपस्थित होते. राहुल गांधी या दौऱ्यात ५२ वर्षीय शेतकरी दिनेश कुमार यांच्या घरी भेट देणार आहेत. दिनेश कुमार यांनी २३ मे रोजी कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती.