शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

"जिना यांच्यानंतर ओवेसी देशाची दुसरी फाळणी करतील", गिरीराज सिंह यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 14:56 IST

गिरीराज सिंह हे असदुद्दीन ओवेसी यांच्यावर सातत्याने हल्लाबोल करताना दिसून येतात.

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी AIMIM खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोहम्मद अली जिना यांच्याप्रमाणेच असदुद्दीन ओवेसीही भारताची दुसरी फाळणी करतील, असं विधान गिरिराज सिंह यांनी केले आहे. तसेच, असदुद्दीन ओवेसी कायद्याच्या विरोधात बोलतात आणि प्रक्षोभक वक्तव्य करतात असा आरोप गिरीराज सिंह यांनी केला आहे.

गिरीराज सिंह हे असदुद्दीन ओवेसी यांच्यावर सातत्याने हल्लाबोल करताना दिसून येतात. शुक्रवारी गिरिराज सिंह म्हणाले की, ओवेसी कायद्याच्या विरोधात बोलतात आणि प्रक्षोभक वक्तव्य करतात. जिना यांच्यानंतर ओवेसी भारताच्या दुसऱ्या फाळणीचे नेतृत्व करतील. भारताच्या फाळणीनंतर अनेक लोक पाकिस्तान आणि बांगलादेशात राहिले. या दोन्ही देशांमध्ये त्यांच्यासोबत अनेक घटना घडल्या, पण ओवेसी यांनी या गोष्टीचा कधी निषेध केला नाही. पाकिस्तान किंवा बांगलादेश असता तर ओवेसींचा आवाज आतापर्यंत दाबला गेला असता, असे गिरीराज सिंह म्हणाले.

एनआरसी (NRC) मुद्द्यावरून गिरीराज सिंह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. जेव्हा आपण एनआरसीबद्दल बोलतो तेव्हा राहुल गांधी विरोध करतात. मात्र, हिमाचलमधील काँग्रेस सरकार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सभागृहात काँग्रेसचे मंत्री म्हणत आहेत की, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि लोकांना त्याचे सर्टिफिकेट दिले पाहिजे, म्हणजेच एनआरसी असायला हवे. तसेच, एनआरसी फक्त बिहारमधील ४ जिल्ह्यांनाच नाही तर संपूर्ण बिहार आणि देशात आवश्यक आहे. एनआरसी लागू केले नाही, तर भारतीयांचा नाश होईल, असेही गिरीराज सिंह यांनी सांगितले.

याचबरोबर, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले की, काँग्रेस सरकारने आपल्या राजवटीत वक्फ बोर्डाला कोणतीही जमीन बळकावण्याचा अधिकार दिला होता. याचे पुरावे हिमाचल प्रदेशचे मंत्री विधानसभेत देत आहेत. तसेच, वक्फ बोर्डाची मालमत्ता कशी वाढत आहे? असा सवाल करत रेल्वे विभागाचे अनेक प्रकल्प रोखण्यात आले, कारण वक्फ बोर्डाने ही आपली मालमत्ता असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे वक्फ बोर्डाची गुंडगिरी थांबली पाहिजे, असेही गिरीराज सिंह म्हणाले.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपा