शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

ईशान्येकडील भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर अखेर राहुल बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 17:42 IST

ईशान्य भारतात भाजपाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अखेर मौन सोडलं आहे. काँग्रेस पक्ष त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयाच्या जनाधाराचा सन्मान करतो. आम्ही उत्तर-पूर्व राज्यांत काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले आहेत.

नवी दिल्ली- ईशान्य भारतात भाजपाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अखेर मौन सोडलं आहे. काँग्रेस पक्ष त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयाच्या जनाधाराचा सन्मान करतो. आम्ही उत्तर-पूर्व राज्यांत काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले आहेत.ईशान्येकडील काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाला निवडणुकांत यश मिळवून देण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी मी त्यांचा आभारी आहे, असं म्हणत राहुल गांधींनी कार्यकर्त्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. 3 मार्च रोजी ईशान्येकडील तीन राज्ये त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. या निकालाच्या जवळपास 48 तासांनंतर राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींच्या ट्विटची अनेक जण आतुरतेनं वाट पाहत होते. तसेच ईशान्येकडील नेते काँग्रेसचा झालेल्या पराभवावर टिप्पणी करण्यास धजावत नव्हते. त्रिपुरा आणि नागालँडमध्ये काँग्रेसला खातंही उघडता आलेलं नाही. तर मेघालयातही काँग्रेस सत्तेपासून दूर राहिलं आहे.त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी रविवारी राज्यपाल तथागत रॉय यांच्याकडे राजीनामा सोपविला. विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारीच जाहीर झाले. भाजपाने डाव्या पक्षांची 25 वर्षांची सत्ता उलथवून लावत येथे बहुमत मिळविले आहे. तर मेघालयातही ‘नॅशनल पीपल्स पार्टी’ (एनपीपी) या भाजपाच्या मित्रपक्षाचे नेते कॉन्राड संगमा यांनी मेघालयचे राज्यपाल गंगा प्रसाद यांची रविवारी भेट घेऊन 34 आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा दावा केला.या आधी मेघालय विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर, मुकुल संगमा यांनीही राज्यपालांना भेटून सर्वात मोठा पक्ष या नात्याने सरकार स्थापनेसाठी आपल्याला आधी संधी द्यावी, अशी विनंती केली. नागालँडमध्ये आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (एनडीपीपी) नेफ्यू रियो यांनी केला आहे.  रिओ हे राज्यात 3 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. नागालँडमधील 60 सदस्यीय विधानसभेत रियो यांच्या एनडीपीपीला 18, तर सहकारी पक्ष भाजपला 12 जागा मिळाल्या आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी