शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

ईशान्येकडील भाजपाच्या ऐतिहासिक विजयानंतर अखेर राहुल बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 17:42 IST

ईशान्य भारतात भाजपाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अखेर मौन सोडलं आहे. काँग्रेस पक्ष त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयाच्या जनाधाराचा सन्मान करतो. आम्ही उत्तर-पूर्व राज्यांत काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले आहेत.

नवी दिल्ली- ईशान्य भारतात भाजपाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अखेर मौन सोडलं आहे. काँग्रेस पक्ष त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयाच्या जनाधाराचा सन्मान करतो. आम्ही उत्तर-पूर्व राज्यांत काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले आहेत.ईशान्येकडील काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाला निवडणुकांत यश मिळवून देण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी मी त्यांचा आभारी आहे, असं म्हणत राहुल गांधींनी कार्यकर्त्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. 3 मार्च रोजी ईशान्येकडील तीन राज्ये त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. या निकालाच्या जवळपास 48 तासांनंतर राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींच्या ट्विटची अनेक जण आतुरतेनं वाट पाहत होते. तसेच ईशान्येकडील नेते काँग्रेसचा झालेल्या पराभवावर टिप्पणी करण्यास धजावत नव्हते. त्रिपुरा आणि नागालँडमध्ये काँग्रेसला खातंही उघडता आलेलं नाही. तर मेघालयातही काँग्रेस सत्तेपासून दूर राहिलं आहे.त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी रविवारी राज्यपाल तथागत रॉय यांच्याकडे राजीनामा सोपविला. विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारीच जाहीर झाले. भाजपाने डाव्या पक्षांची 25 वर्षांची सत्ता उलथवून लावत येथे बहुमत मिळविले आहे. तर मेघालयातही ‘नॅशनल पीपल्स पार्टी’ (एनपीपी) या भाजपाच्या मित्रपक्षाचे नेते कॉन्राड संगमा यांनी मेघालयचे राज्यपाल गंगा प्रसाद यांची रविवारी भेट घेऊन 34 आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा दावा केला.या आधी मेघालय विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर, मुकुल संगमा यांनीही राज्यपालांना भेटून सर्वात मोठा पक्ष या नात्याने सरकार स्थापनेसाठी आपल्याला आधी संधी द्यावी, अशी विनंती केली. नागालँडमध्ये आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे (एनडीपीपी) नेफ्यू रियो यांनी केला आहे.  रिओ हे राज्यात 3 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. नागालँडमधील 60 सदस्यीय विधानसभेत रियो यांच्या एनडीपीपीला 18, तर सहकारी पक्ष भाजपला 12 जागा मिळाल्या आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी