शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

'त्या' तरुणीच्या तक्रारीमुळे ११ वर्षांनी गावात वीज पुरवठा पूर्ववत

By admin | Updated: September 14, 2016 12:17 IST

मागच्या ११ वर्षांपासून अंधार असलेल्या गावामध्ये एका तरुणीच्या तत्परतेमुळे आज पुन्हा वीजपुरवठा सुरु झाला आहे.

ऑनलाइन लोकमत 

ईटाह, दि. १४ - मागच्या ११ वर्षांपासून अंधार असलेल्या गावामध्ये एका तरुणीच्या तत्परतेमुळे आज पुन्हा वीजपुरवठा सुरु झाला आहे. दीप्ती मिश्रा या २३ वर्षीय तरुणीने पंतप्रधान कार्यालयात ऑनलाइन तक्रार नोंदवल्यामुळे वेगाने चक्रे फिरली आणि ११ वर्षांनी हे गाव प्रकाशाने उजळून निघाले. 
 
उत्तरप्रदेशातील ईटाह जिल्ह्यातील बिधीया गावातील लोक आज दीप्तीचे भरभरुन कौतुक करत आहेत. बिधीया गाव अत्यंत दुर्गम भागात आहे. जानेवारी २००५ मध्ये पहिल्यांदा या गावात वीज आली. पण जून महिन्यात झालेल्या वादाळामुळे या गावातील वीजेचे खांब, तारांचे नुकसान झाले. 
 
गावक-यांनी ब्लॉक, वीज कार्यालय गाठून तक्रार नोंदवण्याचे प्रयत्न केले पण वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कोणतेही प्रयत्न न झाल्याने अखेर गावक-यांनी हात टेकले पण दीप्तीने आपल्याबाजूने प्रयत्न सुरु ठेवले तिने अखेर पीएमओकडे ऑनलाइन तक्रार नोंदवली. 
 
त्यानंतर चक्रे वेगाने फिरली आणि ११ वर्षांनी या गावातील घरे वीजेने प्रकाशमान झाली. गावात कोणाकडेही अधिकृत वीज जोडणी नसल्याने इतक्या वर्षांचा विलंब लागला. तक्रार करणा-या तरुणीकडेही अधिकृत वीज जोडणी नाही असे उत्तरप्रदेश विद्युत विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.