शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आर्थिक धोरणांवरील भागवतांच्या नापसंतीनंतर सरकारमध्ये धावपळ, अनेक खाती लागली कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 04:16 IST

केंद्र सरकारच्या काही आर्थिक धोरणांबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नापसंती व्यक्त केल्यामुळे भाजपामध्येच खळबळ उडाली आहे.

हरीश गुप्तानवी दिल्ली : केंद्र सरकारच्या काही आर्थिक धोरणांबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नापसंती व्यक्त केल्यामुळे भाजपामध्येच खळबळ उडाली आहे. सरकारने छोट्या, मध्यम व हस्तकला उद्योग, स्वयंरोजगार व्यवसाय, सहकार, कृषी, तसेच कृषी उद्योगांचे प्रश्न सोडवायला हवेत, असे भागवत म्हणाले होते.केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंग यांनी भागवत यांनी शेतकरी आणि शेतीशी संबंधित केलेल्या सूचनांनुसार पावले उचलण्याच्या सूचना दिल्या. कृषी खात्यांतर्गत पशुधन विभागाला गायींची उत्पादकता कशी वाढेल व त्यांचे रक्षण करून अर्थव्यवस्था कशी फायदेशीर करता येईल, याचा अभ्यास करण्यास सांगण्यात आले आहे. रसायने व खतेमंत्री अनंत कुमार यांनी सेंद्रीय खतांचा उपयोग कसा वाढविता येईल, हे बघण्यास सांगितले आहे.महसूल सचिव हसमुख अढिया यांना छोट्या आणि मध्यम उद्योगांना दिलासा द्या आणि जीएसटीतील जाचक बाबी दूर करण्यासाठी पावले टाका, असे सांगण्यात आले आहे. जीएसटीचीमध्ये अर्थमंत्रालय काही सवलती देईल, असे कळते. व्यापार व उद्योगांच्या अडचणी पाहून सहा महिन्यांत काही सवलती दिल्या जातील. भागवत यांच्या भाषणाचा मोठा भाग मोदी सरकारच्या ४० महिन्यांतील आर्थिक धोरणांवर होता. जन धन योजना, गॅस अनुदान, मुद्रा, कृषी विमा व अन्य धाडसी पावलांबद्दल भागवतांनी प्रशंसा केली, परंतु भागवत यांनी नोटाबंदीचा उल्लेख केला नाही. भागवत यांनी निति आयोग व राज्यांतील सल्लागार यांच्यावर केलेली टीका आश्चर्यकारक होती. धोरण आखणाºयांनी कोषातून बाहेर यावे, असेही ते म्हणाले. स्वदेशी मॉडेलचा त्यांनी जोरदार पुरस्कार केला. भाजपाच्या मुख्यालयात भागवतांच्या भाषणाची पुस्तिका उपलब्ध आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी सर्व पदाधिकारी आणि प्रवक्ते यांनी ती वाचावी, अशा सूचना दिल्या आहेत.जागरण मंचाची कठोर टीकाभागवत यांनी अनेक आर्थिक आघाड्यांवर सरकारवर प्रत्यक्ष हल्ला चढवला होता. पक्षाने त्या टीकेवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. स्वदेशी जागरण मंचने आर्थिक धोरणांवर जी भूमिका घेतली होती तिला भागवतांनी प्रत्यक्ष पाठिंबा दिला होता.दुसºया दिवशी स्वदेशी जागरण मंचचे निमंत्रक एस. गुरूमूर्ती यांनी सरकारच्या धोरणांवर कठोर टीका केली. स्वदेशी जागरण मंचने भारत हा ‘चीनची वसाहत’ होत असल्याची टीका करीत, त्या निषेधार्थ रामलीला मैदानावर मोठा मेळावा घेण्याचे ठरविले आहे. त्या तुलनेत भारतीय मजदूर संघ निष्क्रिय आहे.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतBJPभाजपाGovernmentसरकारRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ