शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक धोरणांवरील भागवतांच्या नापसंतीनंतर सरकारमध्ये धावपळ, अनेक खाती लागली कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 04:16 IST

केंद्र सरकारच्या काही आर्थिक धोरणांबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नापसंती व्यक्त केल्यामुळे भाजपामध्येच खळबळ उडाली आहे.

हरीश गुप्तानवी दिल्ली : केंद्र सरकारच्या काही आर्थिक धोरणांबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नापसंती व्यक्त केल्यामुळे भाजपामध्येच खळबळ उडाली आहे. सरकारने छोट्या, मध्यम व हस्तकला उद्योग, स्वयंरोजगार व्यवसाय, सहकार, कृषी, तसेच कृषी उद्योगांचे प्रश्न सोडवायला हवेत, असे भागवत म्हणाले होते.केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंग यांनी भागवत यांनी शेतकरी आणि शेतीशी संबंधित केलेल्या सूचनांनुसार पावले उचलण्याच्या सूचना दिल्या. कृषी खात्यांतर्गत पशुधन विभागाला गायींची उत्पादकता कशी वाढेल व त्यांचे रक्षण करून अर्थव्यवस्था कशी फायदेशीर करता येईल, याचा अभ्यास करण्यास सांगण्यात आले आहे. रसायने व खतेमंत्री अनंत कुमार यांनी सेंद्रीय खतांचा उपयोग कसा वाढविता येईल, हे बघण्यास सांगितले आहे.महसूल सचिव हसमुख अढिया यांना छोट्या आणि मध्यम उद्योगांना दिलासा द्या आणि जीएसटीतील जाचक बाबी दूर करण्यासाठी पावले टाका, असे सांगण्यात आले आहे. जीएसटीचीमध्ये अर्थमंत्रालय काही सवलती देईल, असे कळते. व्यापार व उद्योगांच्या अडचणी पाहून सहा महिन्यांत काही सवलती दिल्या जातील. भागवत यांच्या भाषणाचा मोठा भाग मोदी सरकारच्या ४० महिन्यांतील आर्थिक धोरणांवर होता. जन धन योजना, गॅस अनुदान, मुद्रा, कृषी विमा व अन्य धाडसी पावलांबद्दल भागवतांनी प्रशंसा केली, परंतु भागवत यांनी नोटाबंदीचा उल्लेख केला नाही. भागवत यांनी निति आयोग व राज्यांतील सल्लागार यांच्यावर केलेली टीका आश्चर्यकारक होती. धोरण आखणाºयांनी कोषातून बाहेर यावे, असेही ते म्हणाले. स्वदेशी मॉडेलचा त्यांनी जोरदार पुरस्कार केला. भाजपाच्या मुख्यालयात भागवतांच्या भाषणाची पुस्तिका उपलब्ध आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी सर्व पदाधिकारी आणि प्रवक्ते यांनी ती वाचावी, अशा सूचना दिल्या आहेत.जागरण मंचाची कठोर टीकाभागवत यांनी अनेक आर्थिक आघाड्यांवर सरकारवर प्रत्यक्ष हल्ला चढवला होता. पक्षाने त्या टीकेवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. स्वदेशी जागरण मंचने आर्थिक धोरणांवर जी भूमिका घेतली होती तिला भागवतांनी प्रत्यक्ष पाठिंबा दिला होता.दुसºया दिवशी स्वदेशी जागरण मंचचे निमंत्रक एस. गुरूमूर्ती यांनी सरकारच्या धोरणांवर कठोर टीका केली. स्वदेशी जागरण मंचने भारत हा ‘चीनची वसाहत’ होत असल्याची टीका करीत, त्या निषेधार्थ रामलीला मैदानावर मोठा मेळावा घेण्याचे ठरविले आहे. त्या तुलनेत भारतीय मजदूर संघ निष्क्रिय आहे.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतBJPभाजपाGovernmentसरकारRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ