शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Video - ...अन् राहुल गांधींनी लुटला मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 10:39 IST

मुलांना खेळताना पाहून क्रिकेट खेळण्याचा मोह राहुल गांधींनाही आवरला नाही. त्यांनी मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. 

ठळक मुद्देमुलांना खेळताना पाहून क्रिकेट खेळण्याचा मोह राहुल गांधींनाही आवरला नाही. क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये राहुल गांधी बॅटींग करताना दिसत आहेत. 

नवी दिल्ली - महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या हरयाणामध्ये प्रचार करत आहेत. प्रचारादरम्यानच राहुल गांधी यांनी मुलांसोबत क्रिकेट घेण्याचा आनंद लुटला आहे. शुक्रवारी (18 ऑक्टोबर) खराब हवामानामुळे राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडींग करावं लागलं. एका कॉलेजच्या मैदानात हेलिकॉप्टर तातडीने उतरवण्यात आलं. त्याचवेळी तिथे काही मुलं क्रिकेट खेळत होती. मुलांना खेळताना पाहून क्रिकेट खेळण्याचा मोह राहुल गांधींनाही आवरला नाही. त्यांनी मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. 

मिळालेल्या माहितीनुसार, हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी शुक्रवारी महेंद्रगड येथे गेले होते. तेथे प्रचारसभेला संबोधिक केल्यानंतर ते पुन्हा दिल्लीला येण्यासाठी हेलिकॉप्टरने निघाले. त्याचवेळी खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडींग करण्यात आले. एका कॉलेजच्या मैदान हेलिकॉप्टर उतरवावे लागले. त्यावेळी काही मुलं तिथे क्रिकेट खेळत होती. राहुल गांधी यांनी देखील मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी बॅटींग करताना दिसत आहेत. 

हरयाणात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. राजकीय पक्षांचेही प्रचारसभांमधून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींचीही हरयाणातल्या नूंह जिल्ह्यात प्रचारसभा झाली. राहुल गांधींनी भाजपा आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला. सध्या मोदी आणि खट्टर हे फक्त खोटी आश्वासनं देत सुटले आहेत. त्यांनी भ्रष्टाचार, शेतकरी कल्याण आणि रोजगाराची आश्वासनंही फसवी असल्याचं म्हटलं आहे.

तसेच भाजपाबरोबरच त्यांनी संघावरही निशाणा साधला आहे. काँग्रेस सर्वांचा पक्ष आहे, तो जनतेला जोडायचं काम करतोय, तर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंग्रजांसारखं देश तोडायचं काम करतायत. कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये केलेल्या कामांचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, देशात तरुणांना बेरोजगारीचा फटका बसतो आहे. मोदी एकावर एक खोटी आश्वासनं देत आहेत. मोदी दर दहाव्या दिवसाला मन की बात करतात, तर मी विचार केला मग आपण त्याऐवजी काम की बात करू, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसHaryanaहरयाणाdelhiदिल्लीharyana election 2019हरियाणा निवडणूक