शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

डिझेल, एलपीजीनंतर आता रॉकेलवरील सबसिडी संपणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 13:00 IST

पेट्रोल-डिझेल नियंत्रण मुक्त केल्यानंतर केंद्र सरकारने आता रॉकेलवरील अनुदान संपवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्दे रॉकेलवरील अनुदान संपवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.  दर दोन आठवडयाला अनुदानित रॉकेलवर 25 पैसे वाढवण्यास सांगण्यात आले आहे

नवी दिल्ली, दि. 3 - पेट्रोल-डिझेल नियंत्रण मुक्त केल्यानंतर केंद्र सरकारने आता रॉकेलवरील अनुदान संपवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पेट्रोलियम क्षेत्रात जास्तीत जास्त गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारने बाजार अनुकूल सुधारणांवर भर दिला आहे. पेट्रोलियम क्षेत्रावरील सरकारी नियंत्रण आणि अनुदानामुळे या क्षेत्रात  खासगी कंपन्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. 

रॉकेलवरील अनुदान पूर्णपणे संपुष्टात येईपर्यंत सरकारी तेल कंपन्यांना  दर दोन आठवडयाला अनुदानित रॉकेलवर 25 पैसे वाढवण्यास सांगण्यात आले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. इंधनावर अजूनही मोठया प्रमाणात अनुदान दिले जाते पण गावांमध्ये वेगाने सुरु असलेले विद्युतीकरण आणि सरकारने मागच्या तीनवर्षात कोटयावधी गरीब लोकांना उपलब्ध करुन दिलेले एलपीजी गॅसचे कनेक्शन यामुळे  रॉकेलची मागणी वेगाने घटत चालली आहे. 

दिल्ली-चंदीगड ही शहरे आधीच रॉकेलमुक्त शहरे म्हणून घोषित झाली आहेत तसेच डिझेलमध्ये भेसळ करण्यासाठी मोठया प्रमाणावर अनुदानित रॉकेलचा वापर केला जातो.  बाजारभावानुसार असलेल्या इंधन किंमतीचा समाजातील गरीब घटकांना फटका बसू नये यासाठी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान अत्यंत गंभीर आहेत असे अधिका-यांनी सांगितले. आतापर्यंत अडीचकोटी गरीबांच्या घरामध्ये एलपीजी गॅसची जोडणी देण्यात आली आहे. कमीत कमी रॉकेलचा वापर व्हावा यासाठी सरकार जोरदार प्रयत्न करत आहे. 

ग्रामीण भागात रात्रीच्यावेळी उजेडासाठी आणि जेवणासाठी मोठया प्रमाणावर रॉकेलचा उपयोग केला जातो. रॉकेलच्या वापरामुळे मोठया प्रमाणावर प्रदूषण वाढते तसेच कधीकधी डिझेलमध्ये भेसळकरण्यासाठीही वापर केला जातो. हे असे प्रकार रोखण्यासाठी पर्यावरण अनुकूल इंधन वापराला सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. 

केंद्राने राज्यांच्या रॉकेल पुरवठयात 20 टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे 2016-17 या वर्षात रॉकेलचा वापर 21 टक्क्यांनी कमी झाला आहे. स्वच्छेने जी राज्ये केरोसिनमध्ये कपात करुन घेतायत त्यांना अतिरिक्त आर्थिक लाभ दिला जातोय त्यामुळे सुद्धा रॉकेलचा वापर कमी होतोय. भविष्यात याचे दूरगामी फायदे होतील असे सरकारचे मत आहे. येणा-या काळात रॉकेलचा वापर अजून कमी होईल.