शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

डिझेल, एलपीजीनंतर आता रॉकेलवरील सबसिडी संपणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 13:00 IST

पेट्रोल-डिझेल नियंत्रण मुक्त केल्यानंतर केंद्र सरकारने आता रॉकेलवरील अनुदान संपवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्दे रॉकेलवरील अनुदान संपवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.  दर दोन आठवडयाला अनुदानित रॉकेलवर 25 पैसे वाढवण्यास सांगण्यात आले आहे

नवी दिल्ली, दि. 3 - पेट्रोल-डिझेल नियंत्रण मुक्त केल्यानंतर केंद्र सरकारने आता रॉकेलवरील अनुदान संपवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पेट्रोलियम क्षेत्रात जास्तीत जास्त गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारने बाजार अनुकूल सुधारणांवर भर दिला आहे. पेट्रोलियम क्षेत्रावरील सरकारी नियंत्रण आणि अनुदानामुळे या क्षेत्रात  खासगी कंपन्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. 

रॉकेलवरील अनुदान पूर्णपणे संपुष्टात येईपर्यंत सरकारी तेल कंपन्यांना  दर दोन आठवडयाला अनुदानित रॉकेलवर 25 पैसे वाढवण्यास सांगण्यात आले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. इंधनावर अजूनही मोठया प्रमाणात अनुदान दिले जाते पण गावांमध्ये वेगाने सुरु असलेले विद्युतीकरण आणि सरकारने मागच्या तीनवर्षात कोटयावधी गरीब लोकांना उपलब्ध करुन दिलेले एलपीजी गॅसचे कनेक्शन यामुळे  रॉकेलची मागणी वेगाने घटत चालली आहे. 

दिल्ली-चंदीगड ही शहरे आधीच रॉकेलमुक्त शहरे म्हणून घोषित झाली आहेत तसेच डिझेलमध्ये भेसळ करण्यासाठी मोठया प्रमाणावर अनुदानित रॉकेलचा वापर केला जातो.  बाजारभावानुसार असलेल्या इंधन किंमतीचा समाजातील गरीब घटकांना फटका बसू नये यासाठी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान अत्यंत गंभीर आहेत असे अधिका-यांनी सांगितले. आतापर्यंत अडीचकोटी गरीबांच्या घरामध्ये एलपीजी गॅसची जोडणी देण्यात आली आहे. कमीत कमी रॉकेलचा वापर व्हावा यासाठी सरकार जोरदार प्रयत्न करत आहे. 

ग्रामीण भागात रात्रीच्यावेळी उजेडासाठी आणि जेवणासाठी मोठया प्रमाणावर रॉकेलचा उपयोग केला जातो. रॉकेलच्या वापरामुळे मोठया प्रमाणावर प्रदूषण वाढते तसेच कधीकधी डिझेलमध्ये भेसळकरण्यासाठीही वापर केला जातो. हे असे प्रकार रोखण्यासाठी पर्यावरण अनुकूल इंधन वापराला सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे. 

केंद्राने राज्यांच्या रॉकेल पुरवठयात 20 टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे 2016-17 या वर्षात रॉकेलचा वापर 21 टक्क्यांनी कमी झाला आहे. स्वच्छेने जी राज्ये केरोसिनमध्ये कपात करुन घेतायत त्यांना अतिरिक्त आर्थिक लाभ दिला जातोय त्यामुळे सुद्धा रॉकेलचा वापर कमी होतोय. भविष्यात याचे दूरगामी फायदे होतील असे सरकारचे मत आहे. येणा-या काळात रॉकेलचा वापर अजून कमी होईल.