शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

दिल्लीतील पराभवानंतर भाजपकडून प्रादेशिक पक्षांना जवळ करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 15:27 IST

आमचे मुख्य लक्ष्य, भाजपविरोधी गट एकत्र येण्यापासून रोखणे हेच असल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. यावरून भाजपने आता प्रादेशिक पक्षांसोबत मैत्री करण्याकडे आपला मोर्चा वळवल्याचे स्पष्ट होते.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भारतीय जनता पक्ष देशातील प्रादेशिक पक्षांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीतील निवडणुकीच्या निकालानंतर भाजपविरोधी पक्ष आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात एकत्र येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ही शक्यता नष्ट करण्यासाठी भाजपकडून प्रादेशिक पक्षांसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा केली. यावरून आगामी काळात वायएसआर काँग्रेस आणि तामिळनाडूमधील डीएमके यांना एनडीएमध्ये सामील करून घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान वायएसआर काँग्रेस आणि भाजप एकत्र आल्यास दोन्ही पक्षांचा फायदाच होणार आहे. भाजपला राज्यसभेत महत्त्वपूर्ण कायदे संमत करून घेण्यासाठी प्रादेशिक पक्षांची गरज भासणारच आहे. तर वायएसआर काँग्रेसला राज्यातील विधान परिषदे समाप्त करण्यासाठी भाजपच्या मदतीची गरज आहे. विधान परिषदेत तेलगु देसम पक्षाचे बहुमत आहे. जगन रेड्डी यांनी नुकतेच राज्याला तीन राजधानी करण्याचा ठराव केला होता. मात्र विधान परिषदेत हा ठराव मंजुर झाला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या जगन रेड्डींनी राज्यातील विधान परिषदच समाप्त करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. 

वायएसआर काँग्रेस पक्ष लोकसभेत चौथा सर्वात मोठा पक्ष आहे. तसेच येणाऱ्या काळात राज्यसभेत वायएसआर काँग्रेसचे वर्चस्व वाढणार आहे. त्यातच भाजपच्या हातून एकापाठोपाठ एक राज्य निसटत आहे. अशा स्थितीत राज्यसभेत भाजपला प्रादेशिक पक्षांची गरज भासणार आहे. राज्यसभेत वायएसआर काँग्रेसकडे दोन खासदार आहे. मात्र एप्रिल महिन्यात ही संख्या सहा होणार आहे. तर 2022 पर्यंत हा आकडा 10 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर लोकसभेत वायएसआरचे 22 खासदार आहेत.

दरम्यान दिल्लीत झालेल्या पराभवानंतर प्रादेशिक पक्षांची मदत घेणे भाजपसाठी अपरिहार्य झाले आहे. मग तो पक्ष सत्तेत असो वा विरोधात. आमचे मुख्य लक्ष्य, भाजपविरोधी गट एकत्र येण्यापासून रोखणे हेच असल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. यावरून भाजपने आता प्रादेशिक पक्षांसोबत मैत्री करण्याकडे आपला मोर्चा वळवल्याचे स्पष्ट होते.