शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

दिल्लीतील पराभवानंतर भाजपकडून प्रादेशिक पक्षांना जवळ करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 15:27 IST

आमचे मुख्य लक्ष्य, भाजपविरोधी गट एकत्र येण्यापासून रोखणे हेच असल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. यावरून भाजपने आता प्रादेशिक पक्षांसोबत मैत्री करण्याकडे आपला मोर्चा वळवल्याचे स्पष्ट होते.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भारतीय जनता पक्ष देशातील प्रादेशिक पक्षांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीतील निवडणुकीच्या निकालानंतर भाजपविरोधी पक्ष आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात एकत्र येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ही शक्यता नष्ट करण्यासाठी भाजपकडून प्रादेशिक पक्षांसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा केली. यावरून आगामी काळात वायएसआर काँग्रेस आणि तामिळनाडूमधील डीएमके यांना एनडीएमध्ये सामील करून घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान वायएसआर काँग्रेस आणि भाजप एकत्र आल्यास दोन्ही पक्षांचा फायदाच होणार आहे. भाजपला राज्यसभेत महत्त्वपूर्ण कायदे संमत करून घेण्यासाठी प्रादेशिक पक्षांची गरज भासणारच आहे. तर वायएसआर काँग्रेसला राज्यातील विधान परिषदे समाप्त करण्यासाठी भाजपच्या मदतीची गरज आहे. विधान परिषदेत तेलगु देसम पक्षाचे बहुमत आहे. जगन रेड्डी यांनी नुकतेच राज्याला तीन राजधानी करण्याचा ठराव केला होता. मात्र विधान परिषदेत हा ठराव मंजुर झाला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या जगन रेड्डींनी राज्यातील विधान परिषदच समाप्त करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. 

वायएसआर काँग्रेस पक्ष लोकसभेत चौथा सर्वात मोठा पक्ष आहे. तसेच येणाऱ्या काळात राज्यसभेत वायएसआर काँग्रेसचे वर्चस्व वाढणार आहे. त्यातच भाजपच्या हातून एकापाठोपाठ एक राज्य निसटत आहे. अशा स्थितीत राज्यसभेत भाजपला प्रादेशिक पक्षांची गरज भासणार आहे. राज्यसभेत वायएसआर काँग्रेसकडे दोन खासदार आहे. मात्र एप्रिल महिन्यात ही संख्या सहा होणार आहे. तर 2022 पर्यंत हा आकडा 10 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर लोकसभेत वायएसआरचे 22 खासदार आहेत.

दरम्यान दिल्लीत झालेल्या पराभवानंतर प्रादेशिक पक्षांची मदत घेणे भाजपसाठी अपरिहार्य झाले आहे. मग तो पक्ष सत्तेत असो वा विरोधात. आमचे मुख्य लक्ष्य, भाजपविरोधी गट एकत्र येण्यापासून रोखणे हेच असल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. यावरून भाजपने आता प्रादेशिक पक्षांसोबत मैत्री करण्याकडे आपला मोर्चा वळवल्याचे स्पष्ट होते.