शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

Asaduddin Owaisi Security: 'मृत्यूनंतर मला औरंगाबादमध्ये दफन केलं जावं', ओवेसींच्या विधानावरुन नवा वाद; शिवसेनेचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 14:44 IST

Asaduddin Owaisi Security: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर गोळीबार झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद लोकसभेत उमटले.

Asaduddin Owaisi Security: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर गोळीबार झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद लोकसभेत उमटले. ओवेसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत या घटनेनंतर सरकारनं देऊ केलेली झेड दर्जाची सुरक्षा देखील नाकारली आहे. लोकसभेत केंद्र सरकारवर निशाणा साधताना ओवेसी यांनी केलेलं एक विधान सध्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. 'मी मृत्यूला घाबरत नाही. कधी ना कधी आपल्यातील प्रत्येकाला जायचंच आहे. पण माझा मृत्यू झाला तर अल्लाहच्या कृपेनं माझा दफनविधी औरंगाबादच्या जमिनीत व्हावा', असं विधान असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेतील भाषणात केलं होतं. ओवेसींच्या याच विधानानं राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 

ओवेसींच्या विधानावर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी सडकून टीका केली आहे. "ओवेसींवर हल्ला झाला ही गोष्ट दुर्देवी आहे. पण त्यांनी औरंगाबादमध्ये दफन विधीची इच्छा व्यक्त करुन त्यांचे खरे दात दाखवले आहेत. औरंगाबादमध्ये औरंगजेबाची कबर आहे. त्यामुळेच त्यांनी दफनविधीसाठी औरंगाबादची इच्छा व्यक्त केली आहे", असं अंबादास दानवे म्हणाले. 

नेमकं काय म्हणाले ओवेसी?असदुद्दीन ओवेसी यांच्यावर कारवर गोळीबार घडल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. ओवेसींसोबत घडलेल्या या जीवघेण्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं ओवेसी यांना झेड दर्जाची सुरक्षा देऊ केली. पण ओवेसींनी ती नाकारली. लोकसभेत भाषणावेळी ओवेसींनी त्यांचं मत व्यक्त केलं आणि सरकारवर घणाघाती टीका केली. 

"भ्याड हल्ल्यांना घाबरुन मी घरात बसणाऱ्यांपैकी नाही. देशातील नागरिकांना सुरक्षित वातावरण देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. एका खासदाराच्या जीवाची किंमत गरीब माणसापेक्षा अधिक असू शकत नाही. केंद्र सरकार नेमकं कोणत्या गोष्टीसाठी मला सुरक्षा देऊ इच्छित आहे?", असा प्रतिसवाल ओवेसी यांनी लोकसभेत उपस्थित केला. 

"ज्या लोकांनी माझ्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला त्यांचा गोळीवर विश्वास आहे. मतदानावर नाही. असे लोक ना संविधानावर विश्वास ठेवत ना न्यायपालिकेवर. अशा लोकांना भाजपा काय रोखणार?, मी मृत्यूला घाबरत नाही. प्रत्येकाला कधी ना कधी जायचंच आहे. पण माझ्या मृत्यूनंतर माझी अल्लाहकडे इच्छा आहे की माझा दफनविधी औरंगाबादमध्ये व्हावा", असं ओवेसी लोकसभेतील भाषणात म्हणाले होते. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAurangabadऔरंगाबाद