शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

Asaduddin Owaisi Security: 'मृत्यूनंतर मला औरंगाबादमध्ये दफन केलं जावं', ओवेसींच्या विधानावरुन नवा वाद; शिवसेनेचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 14:44 IST

Asaduddin Owaisi Security: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर गोळीबार झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद लोकसभेत उमटले.

Asaduddin Owaisi Security: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर गोळीबार झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद लोकसभेत उमटले. ओवेसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत या घटनेनंतर सरकारनं देऊ केलेली झेड दर्जाची सुरक्षा देखील नाकारली आहे. लोकसभेत केंद्र सरकारवर निशाणा साधताना ओवेसी यांनी केलेलं एक विधान सध्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. 'मी मृत्यूला घाबरत नाही. कधी ना कधी आपल्यातील प्रत्येकाला जायचंच आहे. पण माझा मृत्यू झाला तर अल्लाहच्या कृपेनं माझा दफनविधी औरंगाबादच्या जमिनीत व्हावा', असं विधान असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेतील भाषणात केलं होतं. ओवेसींच्या याच विधानानं राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 

ओवेसींच्या विधानावर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी सडकून टीका केली आहे. "ओवेसींवर हल्ला झाला ही गोष्ट दुर्देवी आहे. पण त्यांनी औरंगाबादमध्ये दफन विधीची इच्छा व्यक्त करुन त्यांचे खरे दात दाखवले आहेत. औरंगाबादमध्ये औरंगजेबाची कबर आहे. त्यामुळेच त्यांनी दफनविधीसाठी औरंगाबादची इच्छा व्यक्त केली आहे", असं अंबादास दानवे म्हणाले. 

नेमकं काय म्हणाले ओवेसी?असदुद्दीन ओवेसी यांच्यावर कारवर गोळीबार घडल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. ओवेसींसोबत घडलेल्या या जीवघेण्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं ओवेसी यांना झेड दर्जाची सुरक्षा देऊ केली. पण ओवेसींनी ती नाकारली. लोकसभेत भाषणावेळी ओवेसींनी त्यांचं मत व्यक्त केलं आणि सरकारवर घणाघाती टीका केली. 

"भ्याड हल्ल्यांना घाबरुन मी घरात बसणाऱ्यांपैकी नाही. देशातील नागरिकांना सुरक्षित वातावरण देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. एका खासदाराच्या जीवाची किंमत गरीब माणसापेक्षा अधिक असू शकत नाही. केंद्र सरकार नेमकं कोणत्या गोष्टीसाठी मला सुरक्षा देऊ इच्छित आहे?", असा प्रतिसवाल ओवेसी यांनी लोकसभेत उपस्थित केला. 

"ज्या लोकांनी माझ्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला त्यांचा गोळीवर विश्वास आहे. मतदानावर नाही. असे लोक ना संविधानावर विश्वास ठेवत ना न्यायपालिकेवर. अशा लोकांना भाजपा काय रोखणार?, मी मृत्यूला घाबरत नाही. प्रत्येकाला कधी ना कधी जायचंच आहे. पण माझ्या मृत्यूनंतर माझी अल्लाहकडे इच्छा आहे की माझा दफनविधी औरंगाबादमध्ये व्हावा", असं ओवेसी लोकसभेतील भाषणात म्हणाले होते. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAurangabadऔरंगाबाद