शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

तिहेरी तलाक, कलम ३७०, कॅबनंतर पुढे काय?; मोदी-शहा करू शकतात मोठा धमाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 15:24 IST

सात महिन्यांमध्ये तीन महत्त्वाकांक्षी आश्वासनं मार्गी लावल्यानंतर अमित शहांचं नवं लक्ष्य निश्चित

नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झाल्यानंतर त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना स्वाक्षरी केली. त्यामुळे या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची जोडगोळी आणखी कोणता मोठा निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कलम ३७०, तिहेरी तलाक आणि नागरिकत्व सुधारणा ही तीन महत्त्वाची विधेयकं मंजूर करुन घेण्यात मोदी सरकारला यश आलं आहे. विशेष म्हणजे गेल्या सात महिन्यांमध्ये म्हणजेच मोदी सरकार-२ मध्ये ही तिन्ही विधेयकं मंजूर झाली आहेत. यामध्ये अमित शहांनी मोदींसाठी टास्कमास्टरची भूमिका बजावली. मोदी सरकार २ मध्ये गृह मंत्रालयाची जबाबदारी मिळताच शहांनी कामाचा धडाका लावला आहे. भाजपानं निवडणुकीवेळी दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याची जबाबदारी मोदींनी शहांवर सोपवल्याचं दिसत आहे. तीन महत्त्वाची विधेयकं मंजूर करुन घेण्यात यशस्वी ठरल्यानंतर आता शहा लवकरच समान नागरी कायद्यावर काम सुरू करतील, अशी शक्यता आहे. भाजपानं याबद्दलचं आश्वासन निवडणुकीच्या जाहिरनाम्यात दिलं होतं. भाजपामधील वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या पक्षानं राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला प्राधान्य दिलं आहे. खुद्द अमित शहांनी याबद्दल भाष्य केलं आहे. यासाठी कायदा करण्याचीदेखील गरज नाही. केवळ एक शासनादेश काढून हे पाऊल उचलण्यात येईल, असं भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमील विधानसभा निवडणुकीच्या आधी याबद्दल पाऊल उचलण्यात येईल, अशी माहिती भाजपामधील वरिष्ठ सूत्रांनी दिली. समान नागरी कायद्याचा आग्रह भाजपानं अनेकदा धरला आहे. समान नागरी कायद्याचा थेट संबंध भाजपाच्या विचारसरणीशी आहे. त्यामुळे हा कायदा भाजपासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी आहे. सर्वोच्च न्यायालयानंदेखील यावर भाष्य केलं आहे. मोदी सरकार-१ मध्ये समान नागरी कायद्याचा विषय चर्चेत आला होता. मात्र त्यावेळी याबद्दल विधी आयोगानं प्रतिकूल मत नोंदवलं होतं.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीtriple talaqतिहेरी तलाक