शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

CAA पाठोपाठ केंद्र सरकार आणू शकते लोकसंख्या नियंत्रण कायदा : निरंजन ज्योती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 13:40 IST

काश्मीरमधून कलम 370 हटविण्यात येऊ शकते, नागरिकता संशोधन कायदा लागू करण्यात येऊ शकतो. त्याचप्रमाणे लोकसंख्या नियंत्रण कायदा देखील अंमलात येऊ शकतो, असा विश्वास निरंजन ज्योती यांनी व्यक्त केला.

नवी दिल्ली - देशात लागू करण्यात आलेल्या नागरिकता संशोधन कायद्यानंतर केंद्र सरकार आता लोकसंख्या नियंत्रण कायदा आणू शकते, असा अंदाज केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे निरंजन ज्योती यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेवरून वाटते की, लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्यासाठी मोदी सकारात्मक आहेत. त्यांनी स्वत: या मुद्दाच्या उपयुक्ततेवर आणि गरजेवर चर्चा केली असल्याचे निरंजन ज्योती यांनी नमूद केले आहे. रविवारी वृंदावन येथील चैतन्य विहारमधील स्वामी वामदेव ज्योतिर्मठाच्या निर्वाण महोत्सवात त्या बोलत होत्या. यावेळी भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सच्चिदानंतर हरी साक्षी उपस्थित होते.

2019 पूर्वी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एकांतात चर्चा केली होती. त्यावेळी मोदींना आपण सांगितले होते की, तुम्ही कितीही रस्ते निर्मिती करा, कितीही घरांचे निर्माण करा अथवा वैद्यकीय महाविद्यालये उभारा, जोपर्यंत वेगाने वाढणारी लोकसंख्या नियंत्रणात येणार नाही तोपर्यंत फारसं यश येणार नाही. यावर मोदींनी स्मित हास्य केले होते. या विषयावर मोदींनी विचारमंथन नक्की केले असेल. किंबहुना त्या दृष्टीने मोदींनी वाटचालही केलेली असू शकते, असंही निरंजन ज्योती यांनी म्हटले आहे.

दरम्यान काश्मीरमधून कलम 370 हटविण्यात येऊ शकते, नागरिकता संशोधन कायदा लागू करण्यात येऊ शकतो. त्याचप्रमाणे लोकसंख्या नियंत्रण कायदा देखील अंमलात येऊ शकतो, असा विश्वास निरंजन ज्योती यांनी व्यक्त केला.