शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

CAA पाठोपाठ केंद्र सरकार आणू शकते लोकसंख्या नियंत्रण कायदा : निरंजन ज्योती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 13:40 IST

काश्मीरमधून कलम 370 हटविण्यात येऊ शकते, नागरिकता संशोधन कायदा लागू करण्यात येऊ शकतो. त्याचप्रमाणे लोकसंख्या नियंत्रण कायदा देखील अंमलात येऊ शकतो, असा विश्वास निरंजन ज्योती यांनी व्यक्त केला.

नवी दिल्ली - देशात लागू करण्यात आलेल्या नागरिकता संशोधन कायद्यानंतर केंद्र सरकार आता लोकसंख्या नियंत्रण कायदा आणू शकते, असा अंदाज केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे निरंजन ज्योती यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेवरून वाटते की, लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्यासाठी मोदी सकारात्मक आहेत. त्यांनी स्वत: या मुद्दाच्या उपयुक्ततेवर आणि गरजेवर चर्चा केली असल्याचे निरंजन ज्योती यांनी नमूद केले आहे. रविवारी वृंदावन येथील चैतन्य विहारमधील स्वामी वामदेव ज्योतिर्मठाच्या निर्वाण महोत्सवात त्या बोलत होत्या. यावेळी भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सच्चिदानंतर हरी साक्षी उपस्थित होते.

2019 पूर्वी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एकांतात चर्चा केली होती. त्यावेळी मोदींना आपण सांगितले होते की, तुम्ही कितीही रस्ते निर्मिती करा, कितीही घरांचे निर्माण करा अथवा वैद्यकीय महाविद्यालये उभारा, जोपर्यंत वेगाने वाढणारी लोकसंख्या नियंत्रणात येणार नाही तोपर्यंत फारसं यश येणार नाही. यावर मोदींनी स्मित हास्य केले होते. या विषयावर मोदींनी विचारमंथन नक्की केले असेल. किंबहुना त्या दृष्टीने मोदींनी वाटचालही केलेली असू शकते, असंही निरंजन ज्योती यांनी म्हटले आहे.

दरम्यान काश्मीरमधून कलम 370 हटविण्यात येऊ शकते, नागरिकता संशोधन कायदा लागू करण्यात येऊ शकतो. त्याचप्रमाणे लोकसंख्या नियंत्रण कायदा देखील अंमलात येऊ शकतो, असा विश्वास निरंजन ज्योती यांनी व्यक्त केला.