शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
4
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
5
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
6
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
7
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
8
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
9
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
10
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
11
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
12
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
13
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
14
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
15
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
16
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
17
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
18
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
19
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत

CAA पाठोपाठ केंद्र सरकार आणू शकते लोकसंख्या नियंत्रण कायदा : निरंजन ज्योती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 13:40 IST

काश्मीरमधून कलम 370 हटविण्यात येऊ शकते, नागरिकता संशोधन कायदा लागू करण्यात येऊ शकतो. त्याचप्रमाणे लोकसंख्या नियंत्रण कायदा देखील अंमलात येऊ शकतो, असा विश्वास निरंजन ज्योती यांनी व्यक्त केला.

नवी दिल्ली - देशात लागू करण्यात आलेल्या नागरिकता संशोधन कायद्यानंतर केंद्र सरकार आता लोकसंख्या नियंत्रण कायदा आणू शकते, असा अंदाज केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे निरंजन ज्योती यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेवरून वाटते की, लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्यासाठी मोदी सकारात्मक आहेत. त्यांनी स्वत: या मुद्दाच्या उपयुक्ततेवर आणि गरजेवर चर्चा केली असल्याचे निरंजन ज्योती यांनी नमूद केले आहे. रविवारी वृंदावन येथील चैतन्य विहारमधील स्वामी वामदेव ज्योतिर्मठाच्या निर्वाण महोत्सवात त्या बोलत होत्या. यावेळी भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सच्चिदानंतर हरी साक्षी उपस्थित होते.

2019 पूर्वी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एकांतात चर्चा केली होती. त्यावेळी मोदींना आपण सांगितले होते की, तुम्ही कितीही रस्ते निर्मिती करा, कितीही घरांचे निर्माण करा अथवा वैद्यकीय महाविद्यालये उभारा, जोपर्यंत वेगाने वाढणारी लोकसंख्या नियंत्रणात येणार नाही तोपर्यंत फारसं यश येणार नाही. यावर मोदींनी स्मित हास्य केले होते. या विषयावर मोदींनी विचारमंथन नक्की केले असेल. किंबहुना त्या दृष्टीने मोदींनी वाटचालही केलेली असू शकते, असंही निरंजन ज्योती यांनी म्हटले आहे.

दरम्यान काश्मीरमधून कलम 370 हटविण्यात येऊ शकते, नागरिकता संशोधन कायदा लागू करण्यात येऊ शकतो. त्याचप्रमाणे लोकसंख्या नियंत्रण कायदा देखील अंमलात येऊ शकतो, असा विश्वास निरंजन ज्योती यांनी व्यक्त केला.