शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
4
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
5
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
6
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
7
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
8
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
9
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
10
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
11
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
12
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
13
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
14
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
15
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
16
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
17
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
18
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
19
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
20
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air

CAA पाठोपाठ केंद्र सरकार आणू शकते लोकसंख्या नियंत्रण कायदा : निरंजन ज्योती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 13:40 IST

काश्मीरमधून कलम 370 हटविण्यात येऊ शकते, नागरिकता संशोधन कायदा लागू करण्यात येऊ शकतो. त्याचप्रमाणे लोकसंख्या नियंत्रण कायदा देखील अंमलात येऊ शकतो, असा विश्वास निरंजन ज्योती यांनी व्यक्त केला.

नवी दिल्ली - देशात लागू करण्यात आलेल्या नागरिकता संशोधन कायद्यानंतर केंद्र सरकार आता लोकसंख्या नियंत्रण कायदा आणू शकते, असा अंदाज केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे निरंजन ज्योती यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेवरून वाटते की, लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्यासाठी मोदी सकारात्मक आहेत. त्यांनी स्वत: या मुद्दाच्या उपयुक्ततेवर आणि गरजेवर चर्चा केली असल्याचे निरंजन ज्योती यांनी नमूद केले आहे. रविवारी वृंदावन येथील चैतन्य विहारमधील स्वामी वामदेव ज्योतिर्मठाच्या निर्वाण महोत्सवात त्या बोलत होत्या. यावेळी भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सच्चिदानंतर हरी साक्षी उपस्थित होते.

2019 पूर्वी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एकांतात चर्चा केली होती. त्यावेळी मोदींना आपण सांगितले होते की, तुम्ही कितीही रस्ते निर्मिती करा, कितीही घरांचे निर्माण करा अथवा वैद्यकीय महाविद्यालये उभारा, जोपर्यंत वेगाने वाढणारी लोकसंख्या नियंत्रणात येणार नाही तोपर्यंत फारसं यश येणार नाही. यावर मोदींनी स्मित हास्य केले होते. या विषयावर मोदींनी विचारमंथन नक्की केले असेल. किंबहुना त्या दृष्टीने मोदींनी वाटचालही केलेली असू शकते, असंही निरंजन ज्योती यांनी म्हटले आहे.

दरम्यान काश्मीरमधून कलम 370 हटविण्यात येऊ शकते, नागरिकता संशोधन कायदा लागू करण्यात येऊ शकतो. त्याचप्रमाणे लोकसंख्या नियंत्रण कायदा देखील अंमलात येऊ शकतो, असा विश्वास निरंजन ज्योती यांनी व्यक्त केला.