शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

शब्द पाळताना पायंडे मोडून मोदींचे धक्कातंत्र

By admin | Updated: May 27, 2014 06:21 IST

पंतप्रधानपदी २० मे रोजी निवड झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी धक्कातंत्र अवलंबत याआधीचे अनेक पायंडे मोडीत काढले आहेत.

हरीश गुप्ता, नवी दिल्ली - पंतप्रधानपदी २० मे रोजी निवड झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी धक्कातंत्र अवलंबत याआधीचे अनेक पायंडे मोडीत काढले आहेत. मंत्र्यांची संख्या ४५ एवढीच मर्यादित ठेवत ‘किमान सरकार, कमाल शासन’ हा शब्दही पाळला. ७५ वर्षांवरील नेत्यांना नवरत्नांमध्ये स्थान न देता आता समाजसेवा करा, असा संदेशही त्यांनी दिला आहे. एकूण १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले नाही. पहिल्यांदा खासदार झालेल्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याचे धाडस दाखवत त्यांनी याआधीचा अलिखित नियम मोडीत काढला. अमेठीत पराभूत झालेल्या स्मृती इराणी यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळाला त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या. खासदार नसलेल्या निर्मला सीतारामन यांना वाणिज्य खात्याचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला आहे. तरुण पियूष गोयल यांना मंत्री केले. तरुण तुर्कांना स्थान देत त्यांनी नवे मोदी पर्व आणले आहे. मोदींनी कोणत्याही ज्येष्ठांच्या पाया न पडता झुकणार नसल्याचे दाखवून दिले. राजनाथ सिंह यांनी गृह खात्यावर समाधान मानले असेल. पण त्यांचे समर्थक राजीव प्रताप रुडी, सुधांशू त्रिवेदी, विजय गोयल, मुख्तार अब्बास नकवी, शहनाज हुसेन आणि इतरांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. आपल्या निकटवर्तीयांची वर्णी न लागलेली बघून रामदेव बाबांनी हजर राहणे टाळले. बेटा-बेटी नाही, लागेबांधेही नाही कोणताही मुख्यमंत्री किंवा बड्या नेत्यांच्या मुला-मुलींना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे टाळत त्यांनी राजकीय लागेबांधे ठेवू पाहणार्‍यांनाही बाजूला सारले. अनुराग ठाकूर, दुष्यंतसिंग, अभिषेक सिंग, जयंत सिन्हा, पुनम महाजन अशी इच्छुकांची लांबच लांब यादी होती. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या स्नुषा हरसिमरत कौर यांच्या समावेशालाही ते तयार नव्हते. मात्र युतीचा धर्म आड आला. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, चंदीगढ, राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आदी राज्यांना पुढील टप्प्यात प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे.