शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

शब्द पाळताना पायंडे मोडून मोदींचे धक्कातंत्र

By admin | Updated: May 27, 2014 06:21 IST

पंतप्रधानपदी २० मे रोजी निवड झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी धक्कातंत्र अवलंबत याआधीचे अनेक पायंडे मोडीत काढले आहेत.

हरीश गुप्ता, नवी दिल्ली - पंतप्रधानपदी २० मे रोजी निवड झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी धक्कातंत्र अवलंबत याआधीचे अनेक पायंडे मोडीत काढले आहेत. मंत्र्यांची संख्या ४५ एवढीच मर्यादित ठेवत ‘किमान सरकार, कमाल शासन’ हा शब्दही पाळला. ७५ वर्षांवरील नेत्यांना नवरत्नांमध्ये स्थान न देता आता समाजसेवा करा, असा संदेशही त्यांनी दिला आहे. एकूण १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले नाही. पहिल्यांदा खासदार झालेल्यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याचे धाडस दाखवत त्यांनी याआधीचा अलिखित नियम मोडीत काढला. अमेठीत पराभूत झालेल्या स्मृती इराणी यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळाला त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या. खासदार नसलेल्या निर्मला सीतारामन यांना वाणिज्य खात्याचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला आहे. तरुण पियूष गोयल यांना मंत्री केले. तरुण तुर्कांना स्थान देत त्यांनी नवे मोदी पर्व आणले आहे. मोदींनी कोणत्याही ज्येष्ठांच्या पाया न पडता झुकणार नसल्याचे दाखवून दिले. राजनाथ सिंह यांनी गृह खात्यावर समाधान मानले असेल. पण त्यांचे समर्थक राजीव प्रताप रुडी, सुधांशू त्रिवेदी, विजय गोयल, मुख्तार अब्बास नकवी, शहनाज हुसेन आणि इतरांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. आपल्या निकटवर्तीयांची वर्णी न लागलेली बघून रामदेव बाबांनी हजर राहणे टाळले. बेटा-बेटी नाही, लागेबांधेही नाही कोणताही मुख्यमंत्री किंवा बड्या नेत्यांच्या मुला-मुलींना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे टाळत त्यांनी राजकीय लागेबांधे ठेवू पाहणार्‍यांनाही बाजूला सारले. अनुराग ठाकूर, दुष्यंतसिंग, अभिषेक सिंग, जयंत सिन्हा, पुनम महाजन अशी इच्छुकांची लांबच लांब यादी होती. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या स्नुषा हरसिमरत कौर यांच्या समावेशालाही ते तयार नव्हते. मात्र युतीचा धर्म आड आला. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, चंदीगढ, राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आदी राज्यांना पुढील टप्प्यात प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे.