शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

अमेरिकेनंतर भारतही अ‍ॅक्शनमोडवर! अवैध पद्धतीने प्रवेश करणाऱ्यांच्या अडचणी वाढणार; मोदी सरकार नवीन विधेयक आणणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 16:41 IST

अवैध पद्धतीने भारतात प्रवेश करणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे. मोदी सरकार आता एक नवीन विधेयक आणण्याची तयारी करत आहे.

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर अवैध पद्धतीने प्रवेश करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली. दुसरीकडे, ब्रिटन सरकारनेही अवैध प्रवेश करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. आता भारतही या दिशेने एक मोठे पाऊल उचलणार आहे.  अवैध पद्धतीने प्रवेश करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे. वैध पासपोर्ट किंवा व्हिसाशिवाय भारतात प्रवेश करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल. मोदी सरकार याबाबत एक नवीन विधेयक आणण्याची तयारी करत आहे.

मोफत रेशन, पैसे मिळताहेत, त्यामुळे लोक काम करू इच्छित नाहीत, फ्रीबीजवरून सुप्रीम कोर्टाचे खडेबोल  

मिळालेल्या माहितीनुसार, वैध पासपोर्ट किंवा व्हिसाशिवाय भारतात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही परदेशी नागरिकाला आता जास्तीत जास्त पाच वर्षांचा तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. जर एखादी व्यक्ती बनावट पासपोर्ट किंवा प्रवास कागदपत्रांसह भारतात प्रवेश करत असेल तर त्याला किमान दोन वर्षे आणि जास्तीत जास्त सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, तर दंड १ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत असू शकतो.

ही तरतूद 'इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल, २०२५' चा भाग आहे. या अधिवेशनात लोकसभेत सादर केली जाण्याची शक्यता आहे. या विधेयकाचा उद्देश चार जुने कायदे रद्द करणे आणि एक व्यापक कायदा लागू करणे आहे.

चार जुने कायदे

परदेशी कायदा, १९४६

पासपोर्ट (भारतात प्रवेश) कायदा, १९२०

परदेशी नोंदणी कायदा, १९३९

इमिग्रेशन (वाहक दायित्व), २०००

या नवीन विधेयकात वैध कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश केल्यास जास्तीत जास्त पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे, तर बनावट पासपोर्टवर प्रवेश केल्यास जास्तीत जास्त आठ वर्षांचा तुरुंगवास आणि ५०,००० रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

व्हिसा उल्लंघन

जर एखादा परदेशी व्यक्ती भारतात त्याच्या व्हिसाची मुदत ओलांडून राहिला किंवा प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केला तर त्याला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा ३ लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

सर्व विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्था, रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांना परदेशी नागरिकांची माहिती नोंदणी अधिकाऱ्यांसोबत शेअर करावी लागेल.

नव्या विधेयकामुळे सरकारला जास्त अधिकार मिळतील. नवीन विधेयक केंद्र सरकारला कोणत्याही परदेशी नागरिकाच्या किंवा विशिष्ट गटाच्या व्यक्तींच्या प्रवेशावर बंदी घालण्याचा अधिकार देते. सरकार परदेशी नागरिकाला भारत सोडण्यास, विशिष्ट क्षेत्रात प्रवेश न करण्यास आणि त्याचे फोटो आणि बायोमेट्रिक तपशील देण्यास भाग पाडू शकते.

या नवीन विधेयकामुळे भारतात अवैध प्रवेश करणाऱ्यांवर आळा बसण्यात मदत होणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार