शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये किती जणांनी जमीन खरेदी केली? मोदी सरकारनं सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 17:59 IST

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० काढून टाकण्याचा निर्णय ऑगस्ट २०१९ मध्ये झाला

नवी दिल्ली: कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरच्या विकासात अडथळा येत असल्याचा दावा करत मोदी सरकारनं दोन वर्षांपूर्वी कलम ३७० रद्द केलं. कलम ३७० रद्द केल्यानं जम्मू-काश्मीरला मिळालेला विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात आला. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाला. यानंतर गेल्या २ वर्षांत या प्रदेशाबाहेरील किती जणांनी जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली, असा सवाल मोदी सरकारला विचारण्यात आला. या प्रश्नाला सरकारकडून लिखित उत्तर देण्यात आलं.

बाहेरील लोकांना जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्याचा अधिकार कल ३७० रद्द झाल्यामुळे मिळाला. यामुळे जम्मू-काश्मीरचा विकास होईल, असं म्हटलं जात होतं. ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० हटवण्यात आलं. तेव्हापासून आजतागायत बाहेरील लोकांनी जम्मू-काश्मीरमध्ये ७ भूखंड खरेदी केले आहेत. हे सगळे भूखंड जम्मू विभागात आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एका प्रश्नाला लिखित स्वरुपात हे उत्तर दिलं.

राज्याच्या बाहेरील किती जणांनी जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली आणि केली असल्यास त्याचा तपशील काय, असा सवाल सरकारला विचारण्यात आला. त्यावर बाहेरील व्यक्तींनी एकूण ७ भूखंड खरेदी केले आहेत. हे सातही भूखंड जम्मू विभागात येतात, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली.

ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आलं. त्यामुळे जम्मू-काश्मीरला मिळालेला विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात आला. सरकारनं जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा दिला. कलम ३७० लागू असताना बाहेरील लोकांना तिथे जमीन किंवा संपत्ती खरेदी करता येत नव्हती. याचमुळे काश्मीरमध्ये गुंतवणूक होत नाही, तिथे विकास होत नाही, असा सरकारचा दावा होता.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370