शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये किती जणांनी जमीन खरेदी केली? मोदी सरकारनं सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 17:59 IST

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० काढून टाकण्याचा निर्णय ऑगस्ट २०१९ मध्ये झाला

नवी दिल्ली: कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरच्या विकासात अडथळा येत असल्याचा दावा करत मोदी सरकारनं दोन वर्षांपूर्वी कलम ३७० रद्द केलं. कलम ३७० रद्द केल्यानं जम्मू-काश्मीरला मिळालेला विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात आला. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाला. यानंतर गेल्या २ वर्षांत या प्रदेशाबाहेरील किती जणांनी जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली, असा सवाल मोदी सरकारला विचारण्यात आला. या प्रश्नाला सरकारकडून लिखित उत्तर देण्यात आलं.

बाहेरील लोकांना जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्याचा अधिकार कल ३७० रद्द झाल्यामुळे मिळाला. यामुळे जम्मू-काश्मीरचा विकास होईल, असं म्हटलं जात होतं. ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० हटवण्यात आलं. तेव्हापासून आजतागायत बाहेरील लोकांनी जम्मू-काश्मीरमध्ये ७ भूखंड खरेदी केले आहेत. हे सगळे भूखंड जम्मू विभागात आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एका प्रश्नाला लिखित स्वरुपात हे उत्तर दिलं.

राज्याच्या बाहेरील किती जणांनी जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली आणि केली असल्यास त्याचा तपशील काय, असा सवाल सरकारला विचारण्यात आला. त्यावर बाहेरील व्यक्तींनी एकूण ७ भूखंड खरेदी केले आहेत. हे सातही भूखंड जम्मू विभागात येतात, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली.

ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आलं. त्यामुळे जम्मू-काश्मीरला मिळालेला विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात आला. सरकारनं जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा दिला. कलम ३७० लागू असताना बाहेरील लोकांना तिथे जमीन किंवा संपत्ती खरेदी करता येत नव्हती. याचमुळे काश्मीरमध्ये गुंतवणूक होत नाही, तिथे विकास होत नाही, असा सरकारचा दावा होता.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370