शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये किती जणांनी जमीन खरेदी केली? मोदी सरकारनं सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 17:59 IST

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० काढून टाकण्याचा निर्णय ऑगस्ट २०१९ मध्ये झाला

नवी दिल्ली: कलम ३७० मुळे जम्मू-काश्मीरच्या विकासात अडथळा येत असल्याचा दावा करत मोदी सरकारनं दोन वर्षांपूर्वी कलम ३७० रद्द केलं. कलम ३७० रद्द केल्यानं जम्मू-काश्मीरला मिळालेला विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात आला. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाला. यानंतर गेल्या २ वर्षांत या प्रदेशाबाहेरील किती जणांनी जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली, असा सवाल मोदी सरकारला विचारण्यात आला. या प्रश्नाला सरकारकडून लिखित उत्तर देण्यात आलं.

बाहेरील लोकांना जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्याचा अधिकार कल ३७० रद्द झाल्यामुळे मिळाला. यामुळे जम्मू-काश्मीरचा विकास होईल, असं म्हटलं जात होतं. ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० हटवण्यात आलं. तेव्हापासून आजतागायत बाहेरील लोकांनी जम्मू-काश्मीरमध्ये ७ भूखंड खरेदी केले आहेत. हे सगळे भूखंड जम्मू विभागात आहेत. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एका प्रश्नाला लिखित स्वरुपात हे उत्तर दिलं.

राज्याच्या बाहेरील किती जणांनी जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली आणि केली असल्यास त्याचा तपशील काय, असा सवाल सरकारला विचारण्यात आला. त्यावर बाहेरील व्यक्तींनी एकूण ७ भूखंड खरेदी केले आहेत. हे सातही भूखंड जम्मू विभागात येतात, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली.

ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आलं. त्यामुळे जम्मू-काश्मीरला मिळालेला विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात आला. सरकारनं जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशांचा दर्जा दिला. कलम ३७० लागू असताना बाहेरील लोकांना तिथे जमीन किंवा संपत्ती खरेदी करता येत नव्हती. याचमुळे काश्मीरमध्ये गुंतवणूक होत नाही, तिथे विकास होत नाही, असा सरकारचा दावा होता.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370