शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
2
"SDM हूँ, पहले दूसरे की गाडी में...?"; CNG पंप कर्मचाऱ्यानं रुबाब दाखवणाऱ्या 'साहेबां'च्या 'कानफटात' लगावली, फ्रीस्टाइल VIDEO Viral
3
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
4
Gold Silver Price Review: आणखी स्वस्त होणार का सोनं? आता खरेदी करण्याची संधी की अजून थोडी वाट पाहावी...
5
केरळच्या गुरुवायुर मंदिरातून लाखोंचे सोने-चांदी गायब; २५ कोटींच्या वस्तूंची नोंदच नाही!
6
Stock Market Today: शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex मध्ये ५०० अंकांची तेजी; Nifty २६ हजारांच्या पार
7
IND vs AUS 2nd ODI : हिटमॅन रोहितनं रचला इतिहास; ऑस्ट्रेलियात असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
8
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा
9
"मला या जगावर ओझं व्हायचं नाहीये, माझं निधन झाल्यास..."; बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं विधान, चाहते भावुक
10
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
11
IND vs AUS : फक्त मैदान बदलले! टॉसवेळी टीम इंडियाच्या बाबतीत पुन्हा तेच घडलं
12
भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्..
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
14
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
15
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
16
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
19
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
20
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास

रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 06:30 IST

वर्षानुवर्षे संघर्ष केल्यानंतर रेल्वेकडून योग्य भरपाई मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ठोस पाऊल उचलले. २३ वर्षानंतर तिला न्याय मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: रेल्वे अपघातात पती गमावलेल्या एका दुर्घटनेत जखमी झालेल्या विधवेसाठी, वर्षानुवर्षे संघर्ष केल्यानंतर रेल्वेकडून तिला योग्य भरपाई मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ठोस पाऊल उचलले आहे. २३ वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने तिला न्याय मिळाला आहे.

सायनोक्ता देवीचे पती विजय सिंग यांच्याकडे २१ मार्च २००२ रोजी भागलपूर दानापूर इंटरसिटी एक्स्प्रेसने पाटण्याला जाण्यासाठी बख्तियारपूर स्थानकावरून निघाले असता डब्यात प्रचंड गर्दीमुळे ते मूळ स्थानकावरच धावत्या ट्रेनमधून चुकून खाली पडले आणि त्यांचा तत्काळ मृत्यू झाला. त्यांच्याकडे प्रवासाचे वैध तिकीट होते. त्यानंतर पुढील दोन दशके कायदेशीर लढाई सुरू राहिली, कारण रेल्वे दावा लवाद आणि पाटणा उच्च न्यायालयाने मृताची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे कारण देत देवीचा भरपाईचा दावा फेटाळून लावला. 

उच्च न्यायालयाने तिचा दावा फेटाळल्याच्या आदेशामुळे उद्विग्न होऊन तिने तिच्या वकील फौजिया शकील यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे दावा लवाद आणि पाटणा उच्च न्यायालयाने दिलेले तर्क फेटाळले आणि आदेशांना पूर्णपणे हास्यास्पद, काल्पनिक आणि रेकॉर्डवरील निर्विवाद तथ्यांच्या विरुद्ध असे म्हणत रद्द केले होते. 

मृत व्यक्ती अस्वस्थ होती आणि त्याला एका अज्ञात ट्रेनने धडक दिली होती. या कारणावरून अपिलकर्त्याचा दावा लवाद आणि उच्च न्यायालयाने स्वीकारला नाही, हे सत्य समोर येते," असे सर्वोच्च न्यायालयाने २ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या आपल्या आदेशात नमूद केले होते. 

न्या. सूर्यकांत यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की, जर मृत इसम अस्वस्थ असता तर त्याला पाटण्याला जाण्यासाठी वैध रेल्वे तिकीट खरेदी करणे जवळजवळ अशक्य झाले असते आणि तो स्वतः ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करू शकला नसता.

महिलेचा ठावठिकाणा चुकीचा

सर्वोच्च न्यायालयाने रेल्वेला दावा याचिका दाखल केल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत विधवेला ४ लाख रुपये वार्षिक सहा टक्के व्याजासह भरपाई देण्याचे निर्देश दिले. पण तिच्या दुर्दैवाने, तिचे स्थानिक वकील तिला आदेश देऊ शकले नाहीत, कारण त्यांचे निधन झाले. दुसरीकडे रेल्वेने आदेशाचे पालन करण्याचा प्रयत्न केला आणि देवी यांना वेगवेगळे पत्र लिहिले, परंतु योग्य पत्ता नसल्याने तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

व्याजासह भरपाई देण्यास असमर्थ असलेल्या रेल्वेने २ फेब्रुवारी २०२३ रोजी महिलेला भरपाई देण्याच्या आदेशाचे पालन करण्यात आपली असहाय्यता दर्शवत सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. महिलेने भरपाई मिळविण्यासाठी बँकेचे तपशील दिलेले नाहीत, असे रेल्वेने रोजी पाटणा उच्च न्यायालयालाही सांगितले. सूर्यकांत, दीपांकर दत्ता आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने असे नमूद केले की, दुर्दैवी अपघात झाला तेव्हा तिच्या कुटुंबाच्या परिस्थितीमुळे ती राहत असलेल्या ठिकाणाहून स्थलांतरित झाली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Widow's 23-Year Fight for Justice After Husband's Train Death Ends

Web Summary : After a 23-year legal battle, the Supreme Court ordered railway compensation for a widow whose husband died in a 2002 train accident. Lower courts had rejected her claim, but the Supreme Court overturned those rulings, citing the absurdity of their reasoning and directing the railway to pay ₹4 lakh with interest.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे