शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 06:30 IST

वर्षानुवर्षे संघर्ष केल्यानंतर रेल्वेकडून योग्य भरपाई मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ठोस पाऊल उचलले. २३ वर्षानंतर तिला न्याय मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: रेल्वे अपघातात पती गमावलेल्या एका दुर्घटनेत जखमी झालेल्या विधवेसाठी, वर्षानुवर्षे संघर्ष केल्यानंतर रेल्वेकडून तिला योग्य भरपाई मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ठोस पाऊल उचलले आहे. २३ वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने तिला न्याय मिळाला आहे.

सायनोक्ता देवीचे पती विजय सिंग यांच्याकडे २१ मार्च २००२ रोजी भागलपूर दानापूर इंटरसिटी एक्स्प्रेसने पाटण्याला जाण्यासाठी बख्तियारपूर स्थानकावरून निघाले असता डब्यात प्रचंड गर्दीमुळे ते मूळ स्थानकावरच धावत्या ट्रेनमधून चुकून खाली पडले आणि त्यांचा तत्काळ मृत्यू झाला. त्यांच्याकडे प्रवासाचे वैध तिकीट होते. त्यानंतर पुढील दोन दशके कायदेशीर लढाई सुरू राहिली, कारण रेल्वे दावा लवाद आणि पाटणा उच्च न्यायालयाने मृताची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे कारण देत देवीचा भरपाईचा दावा फेटाळून लावला. 

उच्च न्यायालयाने तिचा दावा फेटाळल्याच्या आदेशामुळे उद्विग्न होऊन तिने तिच्या वकील फौजिया शकील यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे दावा लवाद आणि पाटणा उच्च न्यायालयाने दिलेले तर्क फेटाळले आणि आदेशांना पूर्णपणे हास्यास्पद, काल्पनिक आणि रेकॉर्डवरील निर्विवाद तथ्यांच्या विरुद्ध असे म्हणत रद्द केले होते. 

मृत व्यक्ती अस्वस्थ होती आणि त्याला एका अज्ञात ट्रेनने धडक दिली होती. या कारणावरून अपिलकर्त्याचा दावा लवाद आणि उच्च न्यायालयाने स्वीकारला नाही, हे सत्य समोर येते," असे सर्वोच्च न्यायालयाने २ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या आपल्या आदेशात नमूद केले होते. 

न्या. सूर्यकांत यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की, जर मृत इसम अस्वस्थ असता तर त्याला पाटण्याला जाण्यासाठी वैध रेल्वे तिकीट खरेदी करणे जवळजवळ अशक्य झाले असते आणि तो स्वतः ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करू शकला नसता.

महिलेचा ठावठिकाणा चुकीचा

सर्वोच्च न्यायालयाने रेल्वेला दावा याचिका दाखल केल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत विधवेला ४ लाख रुपये वार्षिक सहा टक्के व्याजासह भरपाई देण्याचे निर्देश दिले. पण तिच्या दुर्दैवाने, तिचे स्थानिक वकील तिला आदेश देऊ शकले नाहीत, कारण त्यांचे निधन झाले. दुसरीकडे रेल्वेने आदेशाचे पालन करण्याचा प्रयत्न केला आणि देवी यांना वेगवेगळे पत्र लिहिले, परंतु योग्य पत्ता नसल्याने तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

व्याजासह भरपाई देण्यास असमर्थ असलेल्या रेल्वेने २ फेब्रुवारी २०२३ रोजी महिलेला भरपाई देण्याच्या आदेशाचे पालन करण्यात आपली असहाय्यता दर्शवत सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. महिलेने भरपाई मिळविण्यासाठी बँकेचे तपशील दिलेले नाहीत, असे रेल्वेने रोजी पाटणा उच्च न्यायालयालाही सांगितले. सूर्यकांत, दीपांकर दत्ता आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने असे नमूद केले की, दुर्दैवी अपघात झाला तेव्हा तिच्या कुटुंबाच्या परिस्थितीमुळे ती राहत असलेल्या ठिकाणाहून स्थलांतरित झाली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Widow's 23-Year Fight for Justice After Husband's Train Death Ends

Web Summary : After a 23-year legal battle, the Supreme Court ordered railway compensation for a widow whose husband died in a 2002 train accident. Lower courts had rejected her claim, but the Supreme Court overturned those rulings, citing the absurdity of their reasoning and directing the railway to pay ₹4 lakh with interest.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे