शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

वकिलांच्या मोदींकडे अवाच्या सव्वा मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 05:36 IST

बार कौन्सिल ऑफ इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून देशातील वकिलांच्या कल्याणासाठी अनेक ‘माफक’ मागण्या केल्या आहेत.

नवी दिल्ली : बार कौन्सिल ऑफ इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून देशातील वकिलांच्या कल्याणासाठी अनेक ‘माफक’ मागण्या केल्या असून, त्यासाठी अर्थसंकल्पात दरवर्षी ५० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची विनंती केली आहे. कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. मन्ननकुमार मिश्रा यांनी पत्रात लिहिले आहे की, ही रक्कम कौन्सिल किंवा राज्य बार कौन्सिलच्या खात्यांत जमा करावेत, असे आमचे म्हणणे नाही.प्रत्येक राज्यात अ‍ॅडव्होकेट जनरलच्या अध्यक्षतेखाली ‘ट्रस्टीशिप कंपनी’ स्थापन करून तिच्याद्वारे ती वकिलांच्या कल्याणासाठी खर्च व्हावी, एवढेच आमचे म्हणणे आहे. या पैशाचा विनियोग कसा करावा हे ठरविण्यासाठी प्रत्येक राज्यात सात सदस्यीय समिती नेमावी.दरवर्षीच्या अर्थ संकल्पातील तरतूद व त्यावरील व्याजातून आमच्या ‘गरजा’ भागू शकतील, असे नमूद करून मिश्रा लिहितात की,केंद्राकडून मिळणारी ही रक्कम राज्यांच्या बार कौन्सिलला तेथील वकिलांच्या संख्येच्या प्रमाणात वाटून द्यावी.>फक्त एवढेच हवे!प्रत्येक वकील व त्याच्या कुटुंबाला २० लाख रुपयांचा विमा.सर्व आजारांवर कुठेही उपचारांसाठी विमामूल्य मेडिक्लेम विमा.नव्याने वकिली सुरू करणाऱ्यांना पाच वर्षे दरमहा १० हजार रुपये स्टायपेंड.अकाली मृत्यू झाल्यास वा अपंगत्व आल्यास दरमहा ५० हजार रुपये पेन्शन.वकिलांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा.वकिलांना घर, वाहन, लायब्ररी यासाठी बिनव्याजी कर्ज.न्यायाधिकरणांवर निवृत्त न्यायाधीशांनाच न नेमता वकिलांचीही नेमणूक.