शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

युक्रेनहून परतलेल्यांना वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश शक्य नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 07:30 IST

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडली भूमिका

नवी दिल्ली : युक्रेनमधील युद्धामुळे तेथून भारतात परतलेल्या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना देशातील वैद्यकीय महाविद्यालयात सामावून घेता येणार नाही. अशा रीतीने प्रवेश देण्यास राष्ट्रीय वैद्यकीय आयोग कायदा परवानगी देत नाही, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिल्यास त्याचा वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जावरही परिणाम होऊ शकतो, असे केंद्र सरकारने म्हटले. 

युक्रेनमध्ये सुरू असलेले वैद्यकीय शिक्षण युद्धामुळे अर्धवट टाकून भारतात परतावे लागलेल्या विद्यार्थ्यांना देशातील वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश द्यावा, अशी मागणी करणाऱ्या काही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्या याचिकांबाबत केंद्रीय आरोग्य खात्याने न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात भूमिका स्पष्ट केली आहे. 

सरकारने म्हटले आहे की, नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तसेच युक्रेनमधील फी खिशाला परवडणारी असल्यामुळे शेकडो भारतीय विद्यार्थी युक्रेनच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिकायला गेले होते. तेथून मायदेशात परतलेल्या विद्यार्थ्यांना देशातील वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश देता येणार नाही. या प्रतिज्ञापत्रात सरकारने म्हटले की, त्यांना येथे प्रवेश दिला तर त्या निर्णयाविरोधात अनेक याचिका दाखल होण्याची शक्यता आहे. भारतातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत फीचे प्रमाण अधिक असून ती सर्वांनाच परवडणे शक्य नाही. 

‘मागच्या दाराने वैद्यकीय प्रवेश नाही’केंद्र सरकारने सांगितले की, युक्रेनमधील युद्धस्थितीमुळे तेथील वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडून भारतात परत यावे लागलेल्या विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणच्या महाविद्यालयांत शिक्षण पुढे सुरू ठेवण्यासाठी आमची हरकत नसल्याचे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने म्हटले होते. पण आयोगाची ना-हरकत म्हणजे मागच्या दाराने वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मिळालेला प्रवेश असा अर्थ कोणीही काढू नये. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार