शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:14 IST

२०२१ मध्ये मी बंगळुरूला शिफ्ट झालो. त्यानंतर पुन्हा निवडणूक आयोगाकडे मी मतदार कार्ड ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज दिला असं आदित्य श्रीवास्तव याने सांगितले.

मुंबई - लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल यांनी पुराव्यासह भाजपा आणि निवडणूक आयोग हातमिळवणी करत मतांची चोरी करत असल्याचा दावा केला. त्यात दुबार मतदार यादीचा उल्लेख करत उदाहरण म्हणून राहुल गांधी यांनी आदित्य श्रीवास्तव हे नाव पुढे आणले. आदित्य श्रीवास्तव मुंबई, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील लखनौ येथे मतदार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं. त्यावर आता आदित्य श्रीवास्तव समोर आला आहे.

आदित्य श्रीवास्तव म्हणाला की, मी उत्तर प्रदेशातील लखनौ इथला रहिवासी आहे. २०१६ पासून मी मुंबईत राहत होतो. २०२१ साली बंगळुरू येथे शिफ्ट झालो. कोरोना काळात मुंबई सोडून बंगळुरू येथे राहण्यास आलो. जेव्हा मी मुंबईत नोकरी करत होतो तेव्हा मी तिथला मतदार होतो. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत मी मुंबईत मतदान केले होते. मी आधी लखनौ येथे राहायला होतो. तिथून मतदान कार्ड मुंबईत ट्रान्सफर केले. २०१७-१८ या काळात मी मतदार म्हणून मुंबईत नोंदणी केली. त्यामुळे माझा मतदार क्रमांक तोच आहे असं सांगत राहुल गांधी यांनी माझी माहिती सार्वजनिक करायला नको होती अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. इंडिया टीव्हीशी त्यांनी फोनवरून संवाद साधला.

तसेच २०२१ मध्ये मी बंगळुरूला शिफ्ट झालो. त्यानंतर पुन्हा निवडणूक आयोगाकडे मी मतदार कार्ड ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज दिला. मुंबई सोडल्यानंतर मी पुन्हा तिथे मतदान करण्यासाठी गेलो नाही. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत माझी माहिती नको द्यायला हवी होती. त्यामुळे माझ्या कुटुंबाची, वडिलांची सर्व माहिती समोर आली आहे. मी मतदान कार्ड ट्रान्सफर करण्यासाठी फॉर्म भरला होता. माझ्याकडे नवीन मतदार कार्ड आले. मी त्याच नंबरचे कार्ड ट्रान्सफर केले होते. जर माझे मतदार कार्ड ट्रान्सफर झाले असेल तर जुने हटवण्यात आले आहे असंही आदित्य श्रीवास्तव यांनी म्हटलं. 

काय म्हणाले होते राहुल गांधी?

राहुल गांधी यांनी कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील मतदार यादी दाखवून एकाच व्यक्तीचं नाव वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि मतदान केंद्रांवर नोंदवलं असल्याचा दावा केला. राहुल गांधी यांनी यासंदर्भात आदित्य श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीचं उदाहरण दिलं. त्याचा EPIC क्रमांक FPP6437040 असल्याचे सांगितले. आदित्य श्रीवास्तव या व्यक्तीच्या इपिक क्रमांकाचा उल्लेख करत ही व्यक्ती कर्नाटकसोबतच उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील मतदार असल्याचा दावा केला. राहुल गांधी यांनी त्या व्यक्तीचं छायाचित्र आणि इपिक क्रमांकाही दाखवला होता. राहुल गांधी यांच्या या दाव्यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसVotingमतदान