शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
3
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
4
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
5
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
6
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
7
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
8
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
9
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
10
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
11
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
12
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
13
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
14
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
15
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
16
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
17
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
18
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
19
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
20
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता

ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:14 IST

२०२१ मध्ये मी बंगळुरूला शिफ्ट झालो. त्यानंतर पुन्हा निवडणूक आयोगाकडे मी मतदार कार्ड ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज दिला असं आदित्य श्रीवास्तव याने सांगितले.

मुंबई - लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल यांनी पुराव्यासह भाजपा आणि निवडणूक आयोग हातमिळवणी करत मतांची चोरी करत असल्याचा दावा केला. त्यात दुबार मतदार यादीचा उल्लेख करत उदाहरण म्हणून राहुल गांधी यांनी आदित्य श्रीवास्तव हे नाव पुढे आणले. आदित्य श्रीवास्तव मुंबई, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील लखनौ येथे मतदार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं. त्यावर आता आदित्य श्रीवास्तव समोर आला आहे.

आदित्य श्रीवास्तव म्हणाला की, मी उत्तर प्रदेशातील लखनौ इथला रहिवासी आहे. २०१६ पासून मी मुंबईत राहत होतो. २०२१ साली बंगळुरू येथे शिफ्ट झालो. कोरोना काळात मुंबई सोडून बंगळुरू येथे राहण्यास आलो. जेव्हा मी मुंबईत नोकरी करत होतो तेव्हा मी तिथला मतदार होतो. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत मी मुंबईत मतदान केले होते. मी आधी लखनौ येथे राहायला होतो. तिथून मतदान कार्ड मुंबईत ट्रान्सफर केले. २०१७-१८ या काळात मी मतदार म्हणून मुंबईत नोंदणी केली. त्यामुळे माझा मतदार क्रमांक तोच आहे असं सांगत राहुल गांधी यांनी माझी माहिती सार्वजनिक करायला नको होती अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. इंडिया टीव्हीशी त्यांनी फोनवरून संवाद साधला.

तसेच २०२१ मध्ये मी बंगळुरूला शिफ्ट झालो. त्यानंतर पुन्हा निवडणूक आयोगाकडे मी मतदार कार्ड ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज दिला. मुंबई सोडल्यानंतर मी पुन्हा तिथे मतदान करण्यासाठी गेलो नाही. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत माझी माहिती नको द्यायला हवी होती. त्यामुळे माझ्या कुटुंबाची, वडिलांची सर्व माहिती समोर आली आहे. मी मतदान कार्ड ट्रान्सफर करण्यासाठी फॉर्म भरला होता. माझ्याकडे नवीन मतदार कार्ड आले. मी त्याच नंबरचे कार्ड ट्रान्सफर केले होते. जर माझे मतदार कार्ड ट्रान्सफर झाले असेल तर जुने हटवण्यात आले आहे असंही आदित्य श्रीवास्तव यांनी म्हटलं. 

काय म्हणाले होते राहुल गांधी?

राहुल गांधी यांनी कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील मतदार यादी दाखवून एकाच व्यक्तीचं नाव वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि मतदान केंद्रांवर नोंदवलं असल्याचा दावा केला. राहुल गांधी यांनी यासंदर्भात आदित्य श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीचं उदाहरण दिलं. त्याचा EPIC क्रमांक FPP6437040 असल्याचे सांगितले. आदित्य श्रीवास्तव या व्यक्तीच्या इपिक क्रमांकाचा उल्लेख करत ही व्यक्ती कर्नाटकसोबतच उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील मतदार असल्याचा दावा केला. राहुल गांधी यांनी त्या व्यक्तीचं छायाचित्र आणि इपिक क्रमांकाही दाखवला होता. राहुल गांधी यांच्या या दाव्यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसVotingमतदान