शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

नेहरू-गांधी कुटुंबाच्या नावाला असामान्य महत्त्व, अधीर रंजन चौधरी यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 05:45 IST

राजकारणातही ब्रँड इक्विटी असते. जर आपण सध्या भाजपकडे पाहिले, तर मोदी आणि शहा यांच्याशिवाय पक्ष व्यवस्थित चालू शकतो? काँग्रेस पक्षातही गांधी कुटुंबच आमची ब्रँड इक्विटी आहे. हे एक कठोर वास्तव आहे.

कोलकाता : गांधी-नेहरू कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीला पक्षाचे नेतृत्व करणे अवघड होईल, कारण या कुटुंबाची एक ब्रँड इक्विटी (नावाचे महत्त्व, दायित्व) आहे, असे मत काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, काँग्रेससारखा मजबूत विचारसरणीचा पक्षच भाजपचा जातीयवादी रथ रोखू शकतो.चौधरी यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, प्रादेशिक पक्ष ज्या प्रकारे काम करीत आहेत त्यावरून ते आगामी काळात आपले महत्त्व हरवून बसतील. याचाच अर्थ देश द्विधु्रवी राजकारणाकडे आगेकूच करील. अशी राजकीय परिस्थिती आल्यानंतर आम्ही पुन्हा सत्तेत येऊ शकतो. त्यामुळे काँग्रेसचे भविष्य उज्ज्वल आहे. चौधरी म्हणाले की, प्रादेशिक पक्षांमध्ये वैचारिक प्रेरणेचा अभाव आहे. तथापि, काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांना व्यापक समर्थन आहे.चौधरी म्हणाले की, पक्षाचे नेतृत्व स्वीकारण्यास सोनिया गांधी अनिच्छुक होत्या; पण राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्ष संकटात असल्याचे पाहून त्यांनी ज्येष्ठ नेत्यांची विनंती मान्य केली. ते म्हणाले की, सोनिया गांधी यांनी संकटाच्या काळात पक्षाचे नेतृत्व केलेले आहे. कठीण काळात म्हणजे २००४ आणि २००९ मध्ये दोन वेळा काँग्रेसने सरकार स्थापन केले होते. गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीने पक्षाचे नेतृत्व करणे अवघड होईल. (वृत्तसंस्था)राजकारणातही ब्रँड इक्विटी असतेराजकारणातही ब्रँड इक्विटी असते. जर आपण सध्या भाजपकडे पाहिले, तर मोदी आणि शहा यांच्याशिवाय पक्ष व्यवस्थित चालू शकतो? काँग्रेस पक्षातही गांधी कुटुंबच आमची ब्रँड इक्विटी आहे. हे एक कठोर वास्तव आहे.काश्मिरातील कलम ३७० हटविल्याच्या मुद्यावर चौधरी म्हणाले की, केंद्रशासित प्रदेशाचे राज्यांमध्ये रूपांतर झालेले आम्ही पाहिले आहे; पण एखाद्या राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रूपांतर होण्याची ही पहिलीच वेळ आहे.काँग्रेसला व्यापक समर्थनआगामी काळात प्रादेशिक पक्षांचे महत्त्व कमी होईल, असे सांगतानाच व्यापक समर्थन असलेल्या काँग्रेसला उज्ज्वल भवितव्य आहे, असा आशावाद काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीतून व्यक्त केला.

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूMahatma Gandhiमहात्मा गांधी