शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

‘मनरेगा’मध्ये महाराष्ट्रासह २३ राज्यांचा अतिरिक्त खर्च 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 07:53 IST

ग्रामीण विकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, बजेटपेक्षा अधिक खर्च करणाऱ्या राज्यांत सर्वाधिक २,३८० कोटी रुपये आंध्र प्रदेश, २,२२८ कोटी रुपये तामिळनाडूने खर्च केले आहेत.

- नितीन अग्रवाल लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोरोना काळात ग्रामीण भागात रोजगाराचे मोठे साधन होते महात्मा गांधी ग्रामीण रोजगार गॅरंटी योजना (मनरेगा). मात्र, या मनरेगाची तिजोरीच रिकामी झाल्याचे चित्र आहे. या योजनेवर ७२,२८९ कोटी रुपये खर्च झाला आहे. महाराष्ट्रासह २३ राज्य सरकारांनी अतिरिक्त ८,८०७ कोटी रुपये खर्च केले आहेत. २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे अद्याप पाच महिने बाकी असताना ही परिस्थिती आहे. 

ग्रामीण विकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, बजेटपेक्षा अधिक खर्च करणाऱ्या राज्यांत सर्वाधिक २,३८० कोटी रुपये आंध्र प्रदेश, २,२२८ कोटी रुपये तामिळनाडूने खर्च केले आहेत. याशिवाय प. बंगालने १,५८२, मध्य प्रदेशने ९४६ आणि केरळने अतिरिक्त ५३४ कोटी रुपये खर्च केले आहेत. ‘मनरेगा’च्या आकडेवारीनुसार, २३ राज्यांचे योजनेचे खाते नकारात्मक स्थितीत आहे. या राज्यांत कर्नाटक, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल, बिहार, पंजाब, गुजरातचाही समावेश आहे. महाराष्ट्रात बजेटपेक्षा ७३.४१ कोटी रुपये अतिरिक्त खर्च दाखविला आहे.

याशिवाय जम्मू-काश्मीर आणि पुद्दुचेरीमध्ये अतिरिक्त १४५ आणि १७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. केंद्र सरकारकडून अतिरिक्त निधी देण्यात आला नाही तर याचा परिणाम मनरेगात काम करणाऱ्या कामगारांच्या वेतनावर होईल. तर मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, अनेक राज्यांनी जाणूनबूजून मागणी वाढवली आहे. या योजनेंतर्गत काम करण्यासाठी काहीही अडथळा नाही. राज्य आपल्याकडून अस्थायी स्वरुपात वेतन करु शकतात.