शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

‘मनरेगा’मध्ये महाराष्ट्रासह २३ राज्यांचा अतिरिक्त खर्च 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 07:53 IST

ग्रामीण विकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, बजेटपेक्षा अधिक खर्च करणाऱ्या राज्यांत सर्वाधिक २,३८० कोटी रुपये आंध्र प्रदेश, २,२२८ कोटी रुपये तामिळनाडूने खर्च केले आहेत.

- नितीन अग्रवाल लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोरोना काळात ग्रामीण भागात रोजगाराचे मोठे साधन होते महात्मा गांधी ग्रामीण रोजगार गॅरंटी योजना (मनरेगा). मात्र, या मनरेगाची तिजोरीच रिकामी झाल्याचे चित्र आहे. या योजनेवर ७२,२८९ कोटी रुपये खर्च झाला आहे. महाराष्ट्रासह २३ राज्य सरकारांनी अतिरिक्त ८,८०७ कोटी रुपये खर्च केले आहेत. २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे अद्याप पाच महिने बाकी असताना ही परिस्थिती आहे. 

ग्रामीण विकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, बजेटपेक्षा अधिक खर्च करणाऱ्या राज्यांत सर्वाधिक २,३८० कोटी रुपये आंध्र प्रदेश, २,२२८ कोटी रुपये तामिळनाडूने खर्च केले आहेत. याशिवाय प. बंगालने १,५८२, मध्य प्रदेशने ९४६ आणि केरळने अतिरिक्त ५३४ कोटी रुपये खर्च केले आहेत. ‘मनरेगा’च्या आकडेवारीनुसार, २३ राज्यांचे योजनेचे खाते नकारात्मक स्थितीत आहे. या राज्यांत कर्नाटक, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल, बिहार, पंजाब, गुजरातचाही समावेश आहे. महाराष्ट्रात बजेटपेक्षा ७३.४१ कोटी रुपये अतिरिक्त खर्च दाखविला आहे.

याशिवाय जम्मू-काश्मीर आणि पुद्दुचेरीमध्ये अतिरिक्त १४५ आणि १७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. केंद्र सरकारकडून अतिरिक्त निधी देण्यात आला नाही तर याचा परिणाम मनरेगात काम करणाऱ्या कामगारांच्या वेतनावर होईल. तर मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, अनेक राज्यांनी जाणूनबूजून मागणी वाढवली आहे. या योजनेंतर्गत काम करण्यासाठी काहीही अडथळा नाही. राज्य आपल्याकडून अस्थायी स्वरुपात वेतन करु शकतात.