शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘मनरेगा’मध्ये महाराष्ट्रासह २३ राज्यांचा अतिरिक्त खर्च 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 07:53 IST

ग्रामीण विकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, बजेटपेक्षा अधिक खर्च करणाऱ्या राज्यांत सर्वाधिक २,३८० कोटी रुपये आंध्र प्रदेश, २,२२८ कोटी रुपये तामिळनाडूने खर्च केले आहेत.

- नितीन अग्रवाल लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कोरोना काळात ग्रामीण भागात रोजगाराचे मोठे साधन होते महात्मा गांधी ग्रामीण रोजगार गॅरंटी योजना (मनरेगा). मात्र, या मनरेगाची तिजोरीच रिकामी झाल्याचे चित्र आहे. या योजनेवर ७२,२८९ कोटी रुपये खर्च झाला आहे. महाराष्ट्रासह २३ राज्य सरकारांनी अतिरिक्त ८,८०७ कोटी रुपये खर्च केले आहेत. २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे अद्याप पाच महिने बाकी असताना ही परिस्थिती आहे. 

ग्रामीण विकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, बजेटपेक्षा अधिक खर्च करणाऱ्या राज्यांत सर्वाधिक २,३८० कोटी रुपये आंध्र प्रदेश, २,२२८ कोटी रुपये तामिळनाडूने खर्च केले आहेत. याशिवाय प. बंगालने १,५८२, मध्य प्रदेशने ९४६ आणि केरळने अतिरिक्त ५३४ कोटी रुपये खर्च केले आहेत. ‘मनरेगा’च्या आकडेवारीनुसार, २३ राज्यांचे योजनेचे खाते नकारात्मक स्थितीत आहे. या राज्यांत कर्नाटक, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल, बिहार, पंजाब, गुजरातचाही समावेश आहे. महाराष्ट्रात बजेटपेक्षा ७३.४१ कोटी रुपये अतिरिक्त खर्च दाखविला आहे.

याशिवाय जम्मू-काश्मीर आणि पुद्दुचेरीमध्ये अतिरिक्त १४५ आणि १७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. केंद्र सरकारकडून अतिरिक्त निधी देण्यात आला नाही तर याचा परिणाम मनरेगात काम करणाऱ्या कामगारांच्या वेतनावर होईल. तर मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, अनेक राज्यांनी जाणूनबूजून मागणी वाढवली आहे. या योजनेंतर्गत काम करण्यासाठी काहीही अडथळा नाही. राज्य आपल्याकडून अस्थायी स्वरुपात वेतन करु शकतात.